शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाचा अहवाल सादर करा, ३ जानेवारी २०१८पर्यंतची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 02:24 IST

पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाच्या मुद्द्यावरून शेकाप नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली आहे.

पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाच्या मुद्द्यावरून शेकाप नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली आहे. या प्रकरणावर पुणे येथील हरित लवादात शुक्रवारी सुनावणी पार पडली. या वेळी न्यायालयाने यासंदर्भात राष्ट्रीय प्रदूषण महामंडळ व राज्य प्रदूषण महामंडळाला याठिकाणी होणा-या प्रदूषणाची माहिती घेऊन ३ जानेवारी २०१८पर्यंत प्रतिज्ञापत्र करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.तळोजा औद्योगिक वसाहतीमधील जल, वायुप्रदूषणाकडे दुर्लक्ष करणा-या केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक महामंडळ, पनवेल महानगरपालिका, रायगड जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य वन मंत्रालय, केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ आदींना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये प्रथमच अशा प्रकारची याचिका हरित लवादाकडे दाखल करण्यात आल्याने सर्वांचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे. न्यायमूर्ती यू.पी. साळवी व डॉ. नागीण नंदा यांच्या बेंचसमोर आज या प्रकरणी युक्तिवाद केल्यानंतर यासंदर्भात न्यायालयाने केंद्रीय प्रदूषण महामंडळ व राज्य प्रदूषण महामंडळाला या यासंदर्भात एकत्रित पाहणी करून कोणकोणत्या कंपन्या जल, वायू प्रदूषण करीत आहेत यासंदर्भात प्रतिज्ञापत्र हरित लवादाकडे ३ जानेवारी २०१८ रोजी सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी याचिकाकर्ते नगरसेवक अरविंद म्हात्रे यांचे वकील डॉ. सुधाकर आव्हाड या प्रकरणी बाजू लवादासमोर मांडत आहेत. नजीकच्या काळात पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी तळोजा औद्योगिक वसाहतीत अचानक भेट देऊन येथील बंद असलेल्या सीईटीपी प्लांटमुळे या केंद्राशी निगडित संचालक मंडळावर गुन्हा दाखल केला होता.तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाचा विषय हरित लवादाकडे गेल्यानंतर याठिकाणचे सात कारखाने बंद पाडण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळाने घेतला होता. ३ जानेवारीपर्यंत लवादाने प्रदूषण करणाºया कंपन्यांचे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्यामुळे तळोजा औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखान्यांवर संक्र ांत येण्याची शक्यता आहे. या ठिकाणच्या प्रदूषणाने आपली पातळी ओलांडली आहे. याठिकाणचे जीवनमान धोक्यात आले असून, प्रदूषण करणाºया कंपन्यांवर कारवाई झाली नाही तर लवकरच पनवेलचे दिल्ली होण्यास वेळ लागणार नसल्याचे याचिकाकर्ते अरविंद म्हात्रे यांनी सांगितले.तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये प्रथमच अशा प्रकारची याचिका हरित लवादाकडे दाखल करण्यात आल्याने सर्वांचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.या ठिकाणच्या प्रदूषणाने आपली पातळी ओलांडली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई