शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाचा अहवाल सादर करा, ३ जानेवारी २०१८पर्यंतची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 02:24 IST

पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाच्या मुद्द्यावरून शेकाप नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली आहे.

पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाच्या मुद्द्यावरून शेकाप नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली आहे. या प्रकरणावर पुणे येथील हरित लवादात शुक्रवारी सुनावणी पार पडली. या वेळी न्यायालयाने यासंदर्भात राष्ट्रीय प्रदूषण महामंडळ व राज्य प्रदूषण महामंडळाला याठिकाणी होणा-या प्रदूषणाची माहिती घेऊन ३ जानेवारी २०१८पर्यंत प्रतिज्ञापत्र करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.तळोजा औद्योगिक वसाहतीमधील जल, वायुप्रदूषणाकडे दुर्लक्ष करणा-या केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक महामंडळ, पनवेल महानगरपालिका, रायगड जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य वन मंत्रालय, केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ आदींना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये प्रथमच अशा प्रकारची याचिका हरित लवादाकडे दाखल करण्यात आल्याने सर्वांचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे. न्यायमूर्ती यू.पी. साळवी व डॉ. नागीण नंदा यांच्या बेंचसमोर आज या प्रकरणी युक्तिवाद केल्यानंतर यासंदर्भात न्यायालयाने केंद्रीय प्रदूषण महामंडळ व राज्य प्रदूषण महामंडळाला या यासंदर्भात एकत्रित पाहणी करून कोणकोणत्या कंपन्या जल, वायू प्रदूषण करीत आहेत यासंदर्भात प्रतिज्ञापत्र हरित लवादाकडे ३ जानेवारी २०१८ रोजी सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी याचिकाकर्ते नगरसेवक अरविंद म्हात्रे यांचे वकील डॉ. सुधाकर आव्हाड या प्रकरणी बाजू लवादासमोर मांडत आहेत. नजीकच्या काळात पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी तळोजा औद्योगिक वसाहतीत अचानक भेट देऊन येथील बंद असलेल्या सीईटीपी प्लांटमुळे या केंद्राशी निगडित संचालक मंडळावर गुन्हा दाखल केला होता.तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाचा विषय हरित लवादाकडे गेल्यानंतर याठिकाणचे सात कारखाने बंद पाडण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळाने घेतला होता. ३ जानेवारीपर्यंत लवादाने प्रदूषण करणाºया कंपन्यांचे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्यामुळे तळोजा औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखान्यांवर संक्र ांत येण्याची शक्यता आहे. या ठिकाणच्या प्रदूषणाने आपली पातळी ओलांडली आहे. याठिकाणचे जीवनमान धोक्यात आले असून, प्रदूषण करणाºया कंपन्यांवर कारवाई झाली नाही तर लवकरच पनवेलचे दिल्ली होण्यास वेळ लागणार नसल्याचे याचिकाकर्ते अरविंद म्हात्रे यांनी सांगितले.तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये प्रथमच अशा प्रकारची याचिका हरित लवादाकडे दाखल करण्यात आल्याने सर्वांचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.या ठिकाणच्या प्रदूषणाने आपली पातळी ओलांडली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई