शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

पालेभाज्यांचे दर झाले अव्वाच्या सव्वा!

By admin | Updated: January 4, 2016 01:59 IST

महाराष्ट्रातील काही भागांत झालेल्या अवकाळी पावसाचा व अतिथंडीचा फटका भाज्यांना बसला असल्यामुळे पालेभाज्यांचे दर अव्वाच्या सव्वा झाले आहे.

ठाणे : महाराष्ट्रातील काही भागांत झालेल्या अवकाळी पावसाचा व अतिथंडीचा फटका भाज्यांना बसला असल्यामुळे पालेभाज्यांचे दर अव्वाच्या सव्वा झाले आहे. या महागड्या भाज्यांनी सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळविले असून कोथिंबीरने अर्धशतक गाठले आहे. टोमॅटो, गवार, वांगीही महागाईच्या टोपलीत जाऊन बसली आहे. या दरांमुळे गिऱ्हाइकांबरोबर विक्रेत्यांमध्येही नाराजीचा सूर उमटत आहे. ठाण्याच्या बाजारपेठांमध्ये भाज्यांच्या दरांनी उच्चांकच गाठला आहे. मालाची आवक घटली असल्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत. कधी दिलासा तर कधी महागाईचा धक्का देणाऱ्या कोथिंबीरचे दर सर्व पालेभाज्यांमध्ये जास्तच कडाडले आहेत. कोथिंबीरबरोबर मेथीचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. येत्या काही दिवसांत हे दर असेच राहतील, अशी शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे. फळभाज्यांमध्ये इतर भाज्या स्वस्त असल्या तरी टोमॅटो, वांगी आणि गवार मात्र प्रचंड महागली आहे. त्यामुळे खरेदीचे प्रमाणदेखील घटले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.