शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
2
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी
3
Netherlands vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने श्रीलंकेचा उडवला धुव्वा
4
Fact Check : बीबीसीचा 'हा' व्हिडीओ २०२४ च्या निवडणुकीतील नाही; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
5
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
6
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
7
'त्या' घटनेनंतर पुन्हा एक अब्जाधीश टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणार; जाणून घ्या कोण आहेत?
8
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
9
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास रॉकेट बनतील 'हे' 'Modi Stocks', होऊ शकते बंपर वाढ
10
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले
11
तलावाच्या खोदकामात JCB च्या खोऱ्यात अडकलं पोतं; उघडून पाहताच पैशाचं घबाड
12
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'
13
"तुम्हाला जमत नसेल तर गृहखातं माझ्याकडे द्या’’, सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला 
14
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
15
T20 World Cup 2024 : ...म्हणून यंदाही भारताचाच दबदबा; IND vs PAK मध्ये टीम इंडिया ठरू शकते वरचढ
16
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
17
"नरेंद्र मोदी आपले निवृत्त जीवन...", पंतप्रधानांच्या दौऱ्यावर जयराम रमेश यांची खोचक टीका
18
३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी; पुणे अपघात प्रकरणात सरकारचा निर्णय
19
राज्यातील १०४७ पोलिसांना मतदान करण्याची परवानगी द्या, खासदाराची निवडणूक आयोगाला विनंती
20
'या' आलिशान क्रूझवर होतेय अनंत-राधिका यांची प्री वेडिंग सेरेमनी; किंमत, खासियत पाहून व्हाल अवाक्

विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षण घेऊन मायदेशात परतावे- तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:21 PM

कर्जतमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

कर्जत : कर्जतसारख्या शैक्षणिक हब बनत असलेल्या तालुक्यातील विद्यार्थी दहावी आणि बारावीमध्ये उत्तम गुण मिळवीत आहेत. त्या विद्यार्थ्यांनी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यावे, मात्र त्यानंतर देशाची सेवा करण्यासाठी पुन्हा भारतात परतावे, असे आवाहन खासदार सुनील तटकरे यांनी केले. कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने दहिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते.तटकरे म्हणाले, कर्जत तालुक्यातील आमदार सुरेश लाड यांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याची २० वर्षांपूर्वी सुरू केलेली परंपरा आजही कायम आहे. मधल्या काळात पाच वर्षे सुरेश लाड हे आमदार देखील नव्हते. मात्र विद्यार्र्थ्यांचे कौतुक करण्याच्या कार्यक्रमात कधी खंड पडला नसल्याचे त्यांनी सांगितले. दहावी आणि बारावीनंतर पुढे काय, यावर मार्गदर्शन मेळावेही आयोजित करण्यात येत आहेत.कर्जत परिसरात मोठ्या प्रमाणात अभियांत्रिकी महाविद्यालये येत आहेत. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे आणि पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जावे, मात्र परदेशात शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी पुन्हा आपल्या देशात येऊन देशाचा आलेख कसा उंचावेल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याला ज्येष्ठ कार्यकर्ते वि. रा. देशमुख, माजी सभापती तानाजी चव्हाण, अशोक भोपतराव, माजी नगराध्यक्ष शरद लाड, अजय सावंत, रजनी गायकवाड, कांगणे, स्मिता पतंगे, हिराताई दुबे आदी प्रमुख उपस्थित होते. दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ४३ विद्यार्थ्यांचा तसेच १०० टक्के निकाल लागलेल्या चार माध्यमिक शाळांचा विशेष सत्कार करण्यात आला. बारावीच्या परीक्षेत ९ कनिष्ठ महाविद्यालयातील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरे