शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पदपथावरील विद्युत वाहिनीचा शॉक लागून विद्यार्थी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 23:23 IST

पदपथावर उघड्या विद्युत वायरवर पाय पडल्याने शॉक लागून विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

नवी मुंबई : पदपथावर उघड्या विद्युत वायरवर पाय पडल्याने शॉक लागून विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. घणसोली सेक्टर ७ येथे शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेत मुलाचे दोन्ही पाय भाजले आहेत. यापूर्वी देखील उघड्यावर पडलेल्या विद्युत वायरींमुळे शॉक लागण्याच्या घटना घडलेल्या असतानाही त्याकडे महावितरणचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.घणसोली सेक्टर ७ येथील सिम्प्लेक्स वसाहतीमध्ये शनिवारी दुपारी ही दुर्घटना घडली आहे. तिथल्या ओम साईधाम सोसायटीमध्ये राहणारा साई वाडकर (८) हा पहिलीचा विद्यार्थी पदपथावरून घरी चालला होता. यावेळी पदपथावर उघड्यावर पडलेल्या विद्युत वायरवर त्याचा पाय पडला. त्याच ठिकाणी वायर तुटलेली असल्याने साईला शॉक लावून वायरनेही पेट घेतला. यामध्ये त्याचे दोन्ही पाय जळाले असता, त्याठिकाणी उपस्थित काही नागरिकांनी त्याला वायरपासून बाजूला केले. यानंतर त्याला ऐरोलीच्या बर्न सेंटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत त्याचे दोन्ही पाय जळाले असून सुदैवाने थोडक्यात प्राण वाचले आहेत. रुग्णालयाकडून रबाळे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात जावून जखमी साईची विचारपूस केली. याचदरम्यान पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी येत असल्याचे समजताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सदर वायर भूमिगत करून टाकली. यामागे पुरावा नष्ट करण्याचा त्यांचा उद्देश असल्याचा आरोप जखमी साईचे वडील अनिल वाडकर यांनी केला आहे. त्यामुळे मुलासोबत घडलेल्या दुर्घटनेप्रकरणी जबाबदार सर्वांवर कारवाईची देखील मागणी त्यांनी केली आहे. घणसोली परिसरात अद्यापही जागोजागी महावितरणने असे मृत्यूचे सापळे रचले आहेत. रस्त्यालगत, पदपथावर उघड्या वायर पडलेल्या असून त्यापासून पादचाºयांच्या जीविताला धोका उद्भवत आहे. वर्षभरापूर्वी अशाच प्रकारातून घणसोली गावात एका मुलाचा प्राण देखील गमावला आहे. त्यानंतरही महावितरणकडून उघड्या डीपी बंदिस्त करण्याकडे व वायर भूमिगत करण्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.>शहरात अनेक ठिकाणी उघड्या विद्युत डीपी व खुल्यावर पडलेल्या विद्युत वायरी पाहायला मिळत आहेत. वर्षानुवर्षे उघड्यावर पडलेल्या या वायरी उंदरांकडून कुरतडल्या गेल्याने अथवा त्यावरुन वाहने गेल्याने तुटण्याचे प्रकार घडतात. त्याठिकाणी एखाद्या पादचाºयाला शॉक लागण्याची शक्यता असते. तर पावसाळ्यात अशा बहुतांश ठिकाणी शॉर्टसर्किट होवून वीजपुरवठा खंडित होण्याचेही प्रकार घडत असतात.