शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

‘स्वच्छ भारत’साठी विद्यार्थ्यांची फौज

By admin | Updated: December 8, 2015 00:57 IST

रायगड जिल्ह्यातील स्वच्छ भारत मिशन पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ४० महाविद्यालयातील पाच हजार एनएसएस विद्यार्थ्यांची फौज या महत्त्वाकांक्षी मिशनमध्ये

आविष्कार देसाई, अलिबागरायगड जिल्ह्यातील स्वच्छ भारत मिशन पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ४० महाविद्यालयातील पाच हजार एनएसएस विद्यार्थ्यांची फौज या महत्त्वाकांक्षी मिशनमध्ये उतरली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे हात आणखीन बळकट झाले आहेत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ही यंग ब्रिगेड आता स्वच्छता मिशनबाबत प्रबोधन करणार आहे. जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनातील विविध विभाग, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील १५ पंचायत समिती, ८२४ ग्रामपंचायती प्रयत्न करीत आहेत. ६८ टक्के उद्दिष्ट गाठले असले, तरी २०१९ प्रयत्न हे मिशन पूर्ण करणे तसे जिल्हा परिषदेसाठी आव्हानच आहे. विविध बैठका, जनजागृती कार्यक्रम, कार्यशाळा, पोस्टर, बॅनर, मोठ-मोठे होर्डिंग्ज ठिकठिकाणी जनजागृती करण्यासाठी लावले जात आहेत. जास्तीत जास्त जनतेपर्यंत स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जिल्हा परिषद विविध सेवाभावी संस्थांनाही या मिशनमध्ये समाविष्ट करुन घेत आहे.महाविद्यालयातील एनएसएस कार्यक्रम अधिकारी आणि एनएसएस विद्यार्थ्यांनी या मिशनमध्ये स्वत:ला सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी केले होते. त्याला रायगड जिल्ह्यातील ४० महाविद्यालयातील पाच हजार एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी साद दिली. त्यांच्यासाठी सोमवारी रायगड जिल्हा परिषदेच्या सभागृहात एका कार्यशाळचेही आयोजन केले होते. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने ग्रामपंचायतींसाठी तयार केलेल्या पाणी गुणवत्ता मार्गदर्शिकेचे प्रकाशन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी केले.