शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

‘स्वच्छ भारत’साठी विद्यार्थ्यांची फौज

By admin | Updated: December 8, 2015 00:57 IST

रायगड जिल्ह्यातील स्वच्छ भारत मिशन पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ४० महाविद्यालयातील पाच हजार एनएसएस विद्यार्थ्यांची फौज या महत्त्वाकांक्षी मिशनमध्ये

आविष्कार देसाई, अलिबागरायगड जिल्ह्यातील स्वच्छ भारत मिशन पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ४० महाविद्यालयातील पाच हजार एनएसएस विद्यार्थ्यांची फौज या महत्त्वाकांक्षी मिशनमध्ये उतरली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे हात आणखीन बळकट झाले आहेत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ही यंग ब्रिगेड आता स्वच्छता मिशनबाबत प्रबोधन करणार आहे. जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनातील विविध विभाग, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील १५ पंचायत समिती, ८२४ ग्रामपंचायती प्रयत्न करीत आहेत. ६८ टक्के उद्दिष्ट गाठले असले, तरी २०१९ प्रयत्न हे मिशन पूर्ण करणे तसे जिल्हा परिषदेसाठी आव्हानच आहे. विविध बैठका, जनजागृती कार्यक्रम, कार्यशाळा, पोस्टर, बॅनर, मोठ-मोठे होर्डिंग्ज ठिकठिकाणी जनजागृती करण्यासाठी लावले जात आहेत. जास्तीत जास्त जनतेपर्यंत स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जिल्हा परिषद विविध सेवाभावी संस्थांनाही या मिशनमध्ये समाविष्ट करुन घेत आहे.महाविद्यालयातील एनएसएस कार्यक्रम अधिकारी आणि एनएसएस विद्यार्थ्यांनी या मिशनमध्ये स्वत:ला सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी केले होते. त्याला रायगड जिल्ह्यातील ४० महाविद्यालयातील पाच हजार एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी साद दिली. त्यांच्यासाठी सोमवारी रायगड जिल्हा परिषदेच्या सभागृहात एका कार्यशाळचेही आयोजन केले होते. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने ग्रामपंचायतींसाठी तयार केलेल्या पाणी गुणवत्ता मार्गदर्शिकेचे प्रकाशन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी केले.