शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

माणिकगडचे ऐतिहासिक वैभव जपण्याची धडपड; दुर्गभेटीसह जंगलसफारीसाठी पर्यटकांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2020 00:24 IST

शिवप्रेमी करताहेत श्रमदानातून संवर्धनाचे काम, माणिकगड हे आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेले पर्यटनस्थळ व ऐतिहासिक ठिकाण आहे. शिवप्रेमींच्या प्रयत्नांमुळे राज्यातील दुर्गप्रेमींपर्यंत गडाची माहिती पोहोचू लागली आहे.

नामदेव मोरेनवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील दुर्लक्षित असलेल्या किल्ल्यांमध्ये माणिकगडचा समावेश असतो. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या गडाचे ऐतिहासिक वैभव जपण्यासाठी शिवप्रेमींनी प्रयत्न सुरू केले आहेत. श्रमदानातून संवर्धनाचे काम सुरू करण्यात आले आहे. गडास भेट देणारे पर्यटक व दुर्गप्रेमींची संख्या वाढत असून, जंगलसफारीसाठीही या किल्ल्यास पसंती दिली जात आहे.

राज्यातील प्रमुख औद्योगिक वसाहत असलेल्या रसायनी-पातळगंगा परिसरात माणिकगडचा समावेश होतो. घाटावरून व कोकणातून होणाऱ्या व्यवसाय व रहदारीवर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आलेल्या किल्ल्यांमध्ये याचाही समावेश होतो. गडाच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलामुळे व खळाळत्या झरे, धबधब्यांमुळे पावसाळ्यात हजारो पर्यटक या परिसरात येतात. वडगाव, वाशीवली व ठाकूरवाडीतून जवळपास तीन तासांची पायपीट करून गडावर जातात. गडावरील ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष, टाकी, दरवाजा हा ठेवा नष्ट होण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिक नागरिक व स्वराज्याचे वैभव या समूहातील सदस्यांनी तीन वर्षांपासून गडसंवर्धनाचे काम सुरू केले आहे. पाण्याच्या टाक्यांमधील गाळ काढला आहे. चुन्याच्या घाण्याच्या परिसराची साफसफाई केली आहे. दरवाजाजवळ सफाई केली आहे. गडावर माहिती फलक लावण्यात आला आहे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिर परिसराचीही स्वच्छता करण्यात आली आहे.

माणिकगड हे आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेले पर्यटनस्थळ व ऐतिहासिक ठिकाण आहे. शिवप्रेमींच्या प्रयत्नांमुळे राज्यातील दुर्गप्रेमींपर्यंत गडाची माहिती पोहोचू लागली आहे.माणिकगडचे महत्त्व : माणिकगड हा साधारणत: १६५७-५८ च्या दरम्यान स्वराज्यात सामील झाला. शाहू महाराजांच्या काळात मानाजी आंग्रे यांचा गडावर अंमल होता. सद्य:स्थितीमध्ये गडावर जुन्या बांधकामाचे अवशेष आढळतात. चुन्याचा घाणा, तटबंदी, बुरूज, ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या तसेच इतर अवशेषांसह पायथ्याशी सुस्थितीतील हनुमान मंदिर आहे.‘स्वराज्याचे वैभव’ या बॅनरखाली समविचारी शिवप्रेमींनी तीन वर्षांपूर्वी माणिकगड संवर्धनाचे काम सुरू केले आहे. पावसाळा संपला की महिन्यातून किमान दोन दुर्गसंवर्धन मोहिमा आयोजित केल्या जातात. माहिती फलक लावणे, टाकी साफ करणे व इतर कामे केली जात आहेत. या कामांत स्थानिक नागरिकांचेही उत्तम सहकार्य लाभत आहे. - संदेश तिर्लोटकर, सदस्य, स्वराज्याचे वैभव

टॅग्स :Fortगड