शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
2
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
3
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
4
अफगाणिस्तानातून कोणकोणत्या नद्या पाकिस्तानच्या दिशेने वाहतात? तालिबानने प्रवाहच रोखला तर काय होईल?
5
भारतीय नर्सला सिंगापूरमध्ये १४ महिन्यांचा कारावास अन् २ चाबकाचे फटके; असं नेमकं काय घडलं?
6
IND vs AUS 3rd ODI : 'या' पठ्ठ्यानं कोच गंभीरचा विश्वास ठरवला सार्थ! ऑस्ट्रेलियनं संघ २३६ धावांवर ऑलआउट
7
जैन बोर्डिंगचा व्यवहार १ तारखेच्या अगोदर रद्द नाही झाला तर संपूर्ण देशभर मोठे आंदोलन; जैन मुनींचा इशारा
8
पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडला; UN मध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताच भारतानं दाखवला आरसा
9
Shreyas Iyer Brilliant Catch : श्रेयसनं घेतला जबरदस्त कॅच! पण ऑस्ट्रेलियन बॅटरसह त्यानंही सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?
10
ट्रम्प आता चीनशी पंगा घेणार...! जिनपिंग यांना थेट तैवानवरून जाब विचारणार, आशियाच्या दौऱ्यावर निघाले
11
Pandav Panchami 2025: आजच्या काळात काय आहे पांडव पंचमीचे महत्त्व? तिलाच 'लाभ पंचमी' का म्हणतात?
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर; मोदी सरकारनं 'या' प्रस्तावाला दिली मंजुरी, जाणून घ्या
13
VIRAL : एका आठवड्यात पैसे परत करेन म्हणणारी 'ऑनलाइन' मैत्रीण पालटली! १५ हजारांची मदत करणार्‍यालाच सुनावलं
14
पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात...
15
कॅनडाच्या 'त्या' जाहिरातीत असं काय होतं की डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड झाला? व्यापार करार रोखला!
16
Health Tips: ऑक्टोबर हीट कमी करण्यासाठी सकाळी अंशपोटी प्या 'हे' मॅजिक ड्रिंक 
17
विवाहित महिला पुतण्याच्या प्रेमात पडली, लिव्ह-इनमध्ये राहिली; वाद सुरू होताच आयुष्य संपवलं! आता पती म्हणाला...
18
IND vs AUS : DSP सिराजला 'रिमांड'वर घेण्याच्या मूडमध्ये होता हेड; पण त्याच्यावरच आली ‘अरेस्ट’ होण्याची वेळ
19
Manifestation Tips: पैसा, मनःशांती, समाधान, जे हवं ते सगळं मिळेल; फक्त रोज करा 'हे' तीन उपाय
20
परेश रावल यांनी 'दृश्यम ३'ला दिला नकार; कारण सांगत म्हणाले, "स्क्रिप्ट खूप चांगली आहे पण..."

माणिकगडचे ऐतिहासिक वैभव जपण्याची धडपड; दुर्गभेटीसह जंगलसफारीसाठी पर्यटकांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2020 00:24 IST

शिवप्रेमी करताहेत श्रमदानातून संवर्धनाचे काम, माणिकगड हे आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेले पर्यटनस्थळ व ऐतिहासिक ठिकाण आहे. शिवप्रेमींच्या प्रयत्नांमुळे राज्यातील दुर्गप्रेमींपर्यंत गडाची माहिती पोहोचू लागली आहे.

नामदेव मोरेनवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील दुर्लक्षित असलेल्या किल्ल्यांमध्ये माणिकगडचा समावेश असतो. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या गडाचे ऐतिहासिक वैभव जपण्यासाठी शिवप्रेमींनी प्रयत्न सुरू केले आहेत. श्रमदानातून संवर्धनाचे काम सुरू करण्यात आले आहे. गडास भेट देणारे पर्यटक व दुर्गप्रेमींची संख्या वाढत असून, जंगलसफारीसाठीही या किल्ल्यास पसंती दिली जात आहे.

राज्यातील प्रमुख औद्योगिक वसाहत असलेल्या रसायनी-पातळगंगा परिसरात माणिकगडचा समावेश होतो. घाटावरून व कोकणातून होणाऱ्या व्यवसाय व रहदारीवर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आलेल्या किल्ल्यांमध्ये याचाही समावेश होतो. गडाच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलामुळे व खळाळत्या झरे, धबधब्यांमुळे पावसाळ्यात हजारो पर्यटक या परिसरात येतात. वडगाव, वाशीवली व ठाकूरवाडीतून जवळपास तीन तासांची पायपीट करून गडावर जातात. गडावरील ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष, टाकी, दरवाजा हा ठेवा नष्ट होण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिक नागरिक व स्वराज्याचे वैभव या समूहातील सदस्यांनी तीन वर्षांपासून गडसंवर्धनाचे काम सुरू केले आहे. पाण्याच्या टाक्यांमधील गाळ काढला आहे. चुन्याच्या घाण्याच्या परिसराची साफसफाई केली आहे. दरवाजाजवळ सफाई केली आहे. गडावर माहिती फलक लावण्यात आला आहे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिर परिसराचीही स्वच्छता करण्यात आली आहे.

माणिकगड हे आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेले पर्यटनस्थळ व ऐतिहासिक ठिकाण आहे. शिवप्रेमींच्या प्रयत्नांमुळे राज्यातील दुर्गप्रेमींपर्यंत गडाची माहिती पोहोचू लागली आहे.माणिकगडचे महत्त्व : माणिकगड हा साधारणत: १६५७-५८ च्या दरम्यान स्वराज्यात सामील झाला. शाहू महाराजांच्या काळात मानाजी आंग्रे यांचा गडावर अंमल होता. सद्य:स्थितीमध्ये गडावर जुन्या बांधकामाचे अवशेष आढळतात. चुन्याचा घाणा, तटबंदी, बुरूज, ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या तसेच इतर अवशेषांसह पायथ्याशी सुस्थितीतील हनुमान मंदिर आहे.‘स्वराज्याचे वैभव’ या बॅनरखाली समविचारी शिवप्रेमींनी तीन वर्षांपूर्वी माणिकगड संवर्धनाचे काम सुरू केले आहे. पावसाळा संपला की महिन्यातून किमान दोन दुर्गसंवर्धन मोहिमा आयोजित केल्या जातात. माहिती फलक लावणे, टाकी साफ करणे व इतर कामे केली जात आहेत. या कामांत स्थानिक नागरिकांचेही उत्तम सहकार्य लाभत आहे. - संदेश तिर्लोटकर, सदस्य, स्वराज्याचे वैभव

टॅग्स :Fortगड