शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भेसळयुक्त खवा, पनीर खाल्ल्यास पोटाचा त्रास; काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 13:32 IST

Navi Mumbai : दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी एकमेकांना भेट म्हणून गोड पदार्थ तसेच भेटवस्तू दिल्या जातात. त्यामुळे दिवाळीच्या सणाला मिठाईला प्रचंड मागणी असते.

- योगेश पिंगळे

नवी मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाईला मागणी वाढते. तसेच या काळात पनीर आणि खव्यामध्ये देखील भेसळ होण्याची शक्यता देखील अधिक असते. पनीर आणि खवा खाल्यावर पोटाचा त्रास जाणवू शकतो, त्यामुळे या काळात काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी एकमेकांना भेट म्हणून गोड पदार्थ तसेच भेटवस्तू दिल्या जातात. त्यामुळे दिवाळीच्या सणाला मिठाईला प्रचंड मागणी असते. दिवाळीच्या निमित्ताने मिठाई, कंदील, रांगोळ्यांनी बाजारपेठा फुलून जातात. खरेदीची लगबग सुरू होते. वेगवेगळ्या प्रकारची मिठाई किंवा गोड पदार्थ घरोघरी विकत आणले जातात. अशावेळी पदार्थांमध्ये भेसळयुक्त पदार्थ आपण न पाहता घेतले तर त्याचे शरीरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. 

अधिक नफा कमविण्यासाठी मिठाई, दूध किंवा पनीरमध्ये भेसळ करतात. बऱ्याचवेळा दुधामध्ये युरिया मिसळल्याचे धक्कादायक प्रकारही समोर आले आहेत. सणांमध्ये वाढलेली मागणी आणि मिळणारा नफा या दोन्हीचा विचार करून व्यापारी अशा प्रकारे भेसळ होण्याची शक्यता असते त्यामुळे बाजारातून वस्तू घेताना ग्राहकांनी मात्र सतर्क राहणे आवश्यक आहे, अन्यथा ते जीवावरही बेतू शकते. त्यामुळे या काळात काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

दुधाच्या उत्पादनांमध्ये भेसळदूध आणि दुधापासून बनवलेल्या उत्पादनांममध्ये पनीर, खवा, रबडी, गोड दही इत्यादी साफ आणि शुद्ध दिसण्यासाठी अनेक पदार्थ मिसळले जातात. या भेसळीमुळे विविध शारीरिक आजारांना सामोरे जावे लागू शकते.

घरीच ओळखा भेसळअस्सल पनीर लोण्यासारखे मुलायम असते. भेसळयुक्त पनीर खूप घट्ट, चिवट असू शकते. भेसळयुक्त पनीर तोडण्यासाठी खेचावे लागते. बाहेरून आणलेले पनीर पाण्यात उकळून थंड करावे. थंड झाल्यानंतर त्यातल्या एका तुकड्यावर आयोडीन टिंचरचे काही थेंब घालावेत. त्यानंतर पनीरचा रंग निळा झाला, तर ते पनीर भेसळयुक्त असल्याचे निष्पन्न होते.

वाढू शकतात पोटाचा विकारभेसळयुक्त पनीर, खवा यासारखे पदार्थ खाल्ले गेल्याने एकप्रकारे विषबाधाच होते. याचे शरीरावर पित्त, गॅसेस याबरोबरच पोटात मळमळणे, जुलाब आदी त्रास होऊ शकतो. दिवाळीच्या काळात मिठाईला जास्त मागणी असल्याने पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.    - डॉ. शरीफ तडवी,     चेस्ट फिजिशियन

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईHealthआरोग्य