शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

विसर्जनानंतर वाहत आलेल्या मूर्तींचे करतात पुन्हा विसर्जन

By admin | Updated: September 23, 2015 03:52 IST

दीड दिवसापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत समुद्रात विसर्जन केलेल्या गणेशमूर्ती दुसऱ्या दिवशी भरती बरोबर समुद्र किनारी वाहत येतात.

पंकज राऊत, बोईसरदीड दिवसापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत समुद्रात विसर्जन केलेल्या गणेशमूर्ती दुसऱ्या दिवशी भरती बरोबर समुद्र किनारी वाहत येतात. त्या सर्व मूर्तींना एकत्र करून खोल समुद्रात जाणाऱ्या बोटीवाल्यांकडे सुपूर्द करून खऱ्या अर्थाने परीपूर्ण विसर्जनाचे काम अनेक वर्षापासून चिंचणी येथील प्रमोद दवणे करीत आहेत.भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला श्री गणरायाचे घरोघरी गल्लोगल्ली मोठ्या उत्साहात व तेवढ्याच जल्लोषात स्वागत करून गणरायाला आकर्षित मखरामध्ये विराजमान केले जाते. त्याची षोडशोपचार पूजा अर्चा नित्यनेमाने सर्वत्र होते. दिड, पाच, सात, ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपतींचे विसर्जन होत असते. गणपतीच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत निर्विघ्नपणे सर्व कार्य पार पाडल्याच्या समाधानात प्रत्येकजण दैनंदिन कामात व्यस्त होतात. परंतु त्याच वेळी प्रमोद दवणे हे पहाटे चिंचणी ते दांडापाड्यापर्यंत समुद्र किनाऱ्यावर फिरून आदल्या दिवशी विसर्जन केलेल्या मूर्तीपैकी भरतीवाटे किनारी लागलेल्या मूर्ती एकत्र करून खोल समुद्रात जाणाऱ्या बोटीवाल्यांकडे सुपूर्द करतात आणि खऱ्या अर्थाने बाप्पाचे विसर्जन करतात. (वार्ताहर)