शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

हिवाळी अधिवेशनापूर्वी बाजार समित्यांचे राज्यव्यापी आंदोलन; माथाडी नेत्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 01:39 IST

केंद्र शासनाच्या कृषीसह कामगार कायद्याला विरोध

नवी मुंबई : केंद्र शासनाच्या कृषी व कामगार कायद्यामुळे बाजार समित्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. व्यापार कमी होऊन माथाडी कामगारांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे. या कायद्याविरोधात हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा व वेळ पडल्यास सर्व बाजार समित्या बेमुदत बंद करण्याचा इशारा माथाडी नेत्यांनी दिला आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी व कामगार प्रतिनिधींची बैठक माथाडी भवनमध्ये आयोजित केली होती. या बैठकीमध्ये व्यापारी, कामगार व बाजार समित्यांच्या अस्तित्वासाठी तीव्र लढा उभारण्याचे निश्चित करण्यात आले. आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, केंद्राच्या कायद्याविरोधात रणशिंग फुंकण्याची वेळ आली आहे. जे कामगारांच्या हिताच्या विरोधात निर्णय घेतील, त्यांच्या विरोधात तीव्र लढा उभारण्यात येईल. हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्यातील सर्व बाजार समिती प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात येईल. एकाच वेळी सर्व बाजार समित्या बंद ठेवून शासनाचे लक्ष वेधले जाईल. सरकार कोणतेही असो, कामगारांच्या विरोधात निर्णय घेतले तर रस्त्यावर उतरून लढा देण्याचा इशारा शिंदे यांनी या वेळी दिला.

माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनीही लढायचेच असेल, तर आताच लढा सुरू करू या. दिवाळी होईपर्यंत वाट पाहण्याची आवश्यकता नाही. केंद्रात काँग्रेसचे सरकार असतानाही बाजार समित्यांच्या विराेधातील निर्णय घेण्यात आला होता. सरकार कोणाचेही असो, आपला कोणी वाली नाही. कामगारांच्या हितासाठी लढा देऊ या. सर्व बाजार समित्यांना एकत्रित करू या. केंद्राच्या कायद्याविरोधात राज्याने कायदा करून यातून मार्ग काढावा, असेही पाटील यांनी सुचविले. या वेळी कीर्ती राणा, अशोक बढिया, शंकर पिंगळे, संतोष अहिरे, नाना धोंडे व इतरांनीही मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास माथाडी संघटनेचे अध्यक्ष एकनाथ जाधव, चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई