शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

‘बर्ड फ्लू’बाबत राज्य सरकार उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 00:21 IST

आशिष शेलार यांची टीका : नवी मुंबईतील भाजपच्या नेत्यांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : कोरोनाचे भय कायम असतानाच आता ‘बर्ड फ्लू’च्या साथीने डोके वर काढले आहे; परंतु राज्य सरकारला याचे कोणतेही गांभीर्य नाही, याबाबत सरकार उदासीन असल्याची टीका माजी मंत्री तथा भाजपचे नवी मुंबई विभागाचे निरीक्षक आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली आहे.नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तारीख कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

भाजपच्या नवी मुंबई प्रभारीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आशिष शेलार यांनी बुधवारी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी उपस्थित भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे स्थानिक नेते, माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांशी संघटनात्मक स्तरावर चर्चा करायला आपण येथे आल्याचे त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. नवी मुंबई भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. कारण भाजपमध्ये या गोष्टींना थारा नाही. नवी मुंबईमध्ये भाजपची ताकद मोठी आहे. आम्ही विरोधी पक्षांशी दोन हात करायला तयार आहोत. कारण गणेश नाईक, मंदा म्हात्रे आणि रमेश पाटील यांच्या रूपाने नवी मुंबईत आमचे तीन सक्षम आमदार आहेत. शिवाय संघटन करणारे कार्यकर्ते जोरदार काम करीत असल्याचे शेलार यांनी सांगितले.याप्रसंगी नवी मुंबई प्रभारी संजय उपाध्याय, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, अशोक गुरखे, दीपक पवार, सुनील पाटील, काशीनाथ पाटील, जिल्हा महामंत्री नीलेश म्हात्रे, विजय घाटे, दत्ता घंगाळे, विकास सोरटे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई