शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

वाशी खाडीपुलांवरील आत्महत्यांवर स्टेनलेस स्टीलच्या जाळीचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 02:58 IST

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या सर्वात जुन्या वाशी खाडीपुलावरून उडी मारून आत्महत्या करणाºयांचे वा तसा प्रयत्न करणा-यांचे प्रमाण अलीकडे वाढीस लागले होते. मात्र, असे प्रकार रोखण्यासाठी आता सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे.

- नारायण जाधवठाणे : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या सर्वात जुन्या वाशी खाडीपुलावरून उडी मारून आत्महत्या करणा-यांचे वा तसा प्रयत्न करणा-यांचे प्रमाण अलीकडे वाढीस लागले होते. मात्र, असे प्रकार रोखण्यासाठी आता सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे.नव्या वर्षात येथील जुन्या पुलासह नव्या पुलाच्या दोन्ही बाजूला समांतर अशी स्टेनलेस स्टीलची जाळी बसविण्यात येणार आहे. ती बसविल्यानंतर या पुलांवरून उडी मारून आत्महत्या करणाºयांचे प्रमाण पूर्ण थांबणार आहे. नव्या वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल.वाशी खाडीपूल हा खाडीवरील सर्वात लांब पूल असून त्याची लांबी १८६३ मीटर इतकी आहे. यातील जुन्या पुलाचे बांधकाम १९७३ मध्ये झाले. मात्र, कालांतराने हा पूल जीर्ण झाल्याने त्याला लागूनच एकीकडे रेल्वे पूल आणि दुसºया बाजूला समांतर अशा नव्या खाडीपुलाचे काम सुरू झाले. नव्या खाडीपुलाचे काम १९८७ ते १९९७ मध्ये झाल्यानंतर तो वाहतुकीसाठी सुरू झाला. नवीन सहापदरी पूल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर जुना खाडीपूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद केला. मात्र, खाडीवरील या पुलावरून पायी चालणे, वाहन चालविण्याचा आनंद घेणे याचे सुरुवातीला सर्वांना आकर्षण होते. हेच आकर्षण पुढे काही नैराश्य आलेल्यांसाठी शाप बनू लागले. काही जण जुन्या पुलावर येऊन तेथून खाडीत उडी घेऊन आत्महत्या करू लागले. यात नजीकच्या वाशीगावातील मच्छीमार तरुणांमुळे काहींचे प्राण वाचविण्यात यश आले असले तरी त्यात काहींचा जीव गेला आहे. यामुळे पोलिसांकडून या पुलाच्या दोन्ही बाजूस जाळी किंवा ग्रिल बसविण्याची मागणी होत होती.दोन्ही पुलांच्या दोन्ही बाजूस १,८६३ मीटरची जाळीअलीकडे आत्महत्या करणा-यांचे वा तसा प्रयत्न करणा-यांचे प्रमाण वाढल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थानिक अधिकाºयांनी यात पुढाकार घेऊन तसा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविला. त्यास सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर या पुलाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत बांगर यांनी पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.सध्या त्याचे डिझाइन तयार झाले असून दोन्ही पुलांच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी १८६३ मीटरची जाळी बसविण्यात येणार आहे. या कामावर सुुरुवातील तीन ते साडेतीन कोटी खर्च होणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई