शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजारांच्या टप्प्यावर कर्णधार बदलला, पालिका आयुक्तांची बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 23:51 IST

अभिजीत बांगर यांची २३ जूनला पहिल्यांदा नवी मुंबईत बदली केली, तेव्हा रुग्णसंख्या ५,०७२ होती.

नवी मुंबई : शहरातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यामुळे महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. २२ दिवसांमध्ये दुसऱ्यांदा बदलीनाट्य घडविण्यात आले आहे. अभिजीत बांगर यांची २३ जूनला पहिल्यांदा नवी मुंबईत बदली केली, तेव्हा रुग्णसंख्या ५,०७२ होती. दुसऱ्यांदा नियुक्ती होईपर्यंत हा आकडा तब्बल ९,९१७ झाला असून, दहा हजारांच्या टप्प्यावरून शहर कोरोनामुक्त करण्याचे आव्हान नवीन आयुक्तांसमोर उभे राहिले आहे.नवी मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. सुनियोजित शहरही कोरोनामुक्त करण्यात यश येत नसल्यामुळे, शासनाने २३ जूनला आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली केली होती, परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मनधरणी करूनही बदली थांबविली होती. राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेत्यांकडेही बदली थांबविण्यासाठी स्थानिक पदाधिकाºयांनी आग्रह धरला होता. अखेर ४८ तासांमध्ये बदली रद्द करण्यात आली. पहिल्यांदा बदली नाट्य झाले, तेव्हा नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ५,०७२ एवढी होती. कोरोनामुळे १७७ जणांचे बळी गेले होते. पुढील २२ दिवसांमध्ये या रुग्णांमध्ये जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. १४ जुलैला रुग्णसंख्या ९,९१७ झाली असून, मृतांचा आकडा ३१० झाला आहे. मधल्या २२ दिवसांमध्ये तब्बल ४,८४५ रुग्ण वाढले असून, १३३ जणांचा मृत्यू झाला आहे. बदली नाट्यामुळे प्रशासनामध्ये अस्थिरता निर्माण झाली असून, त्याचा परिणाम कोरोना नियंत्रणाच्या कामावर झाल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.कोरोनाचे आकडे दहा हजारांपर्यंत पोहोचले असताना, नवीन आयुक्त अभिजीत बांगर पदभार स्वीकारत आहेत. प्रशासनाची विस्कटलेली घडी बसविण्याचे आव्हान आयुक्तांसमोर असणार आहे. अनेक अधिकारी नवीन असल्यामुळे त्यांना नवी मुंबईमधील परिस्थितीची पूर्णत: माहितीच नाही. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाºयांची संख्या कमी आहे. सर्वसाधारण रुग्णालय बंद असल्यामुळे कोरोनाव्यतिरिक्त आजारांसाठीही नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. खासगी रुग्णालयांकडून नागरिकांची लुबाडणूक सुरू आहे. लॉकडाऊन सुरू केला आहे, परंतु त्याची कोटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही. अनधिकृत फेरीवाल्यांवर कडक कारवाई होत नाही. नियम तोडणाºयांचा फटका नियम पाळणाºया नागरिकांना बसू लागला आहे.कोपरखैरणे, नेरुळ, ऐरोली, घणसोली या चार नोडमधील परिस्थिती हाताबाहेर गेली असून, आयुक्त ती पूर्वपदावर आणण्यासाठी काय करणार, याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.कोण आहेत अभिजीत बांगर ?नवनियुक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रामध्ये एम.ए.ची पदवी घेतली आहे. ते २००८च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. रायगडमधील माणगाव विभागाचे सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघरचे पहिले जिल्हाधिकारी, नागपूर महानगरपालिका आयुक्त, नागपूर विभागात अतिरिक्त विभागीय आयुक्तपदावर त्यांनी काम केले आहे.

दहा हजारांच्या टप्प्यावर कर्णधार बदलला, पालिका आयुक्तांची बदली : नवी मुंबई कोरोनामुक्त करण्याचे आव्हान नवी मुंबई : शहरातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यामुळे महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. २२ दिवसांमध्ये दुसऱ्यांदा बदलीनाट्य घडविण्यात आले आहे. अभिजीत बांगर यांची २३ जूनला पहिल्यांदा नवी मुंबईत बदली केली, तेव्हा रुग्णसंख्या ५,०७२ होती. दुसऱ्यांदा नियुक्ती होईपर्यंत हा आकडा तब्बल ९,९१७ झाला असून, दहा हजारांच्या टप्प्यावरून शहर कोरोनामुक्त करण्याचे आव्हान नवीन आयुक्तांसमोर उभे राहिले आहे.नवी मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. सुनियोजित शहरही कोरोनामुक्त करण्यात यश येत नसल्यामुळे, शासनाने २३ जूनला आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली केली होती, परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मनधरणी करूनही बदली थांबविली होती. राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेत्यांकडेही बदली थांबविण्यासाठी स्थानिक पदाधिकाºयांनी आग्रह धरला होता. अखेर ४८ तासांमध्ये बदली रद्द करण्यात आली. पहिल्यांदा बदली नाट्य झाले, तेव्हा नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ५,०७२ एवढी होती. कोरोनामुळे १७७ जणांचे बळी गेले होते. पुढील २२ दिवसांमध्ये या रुग्णांमध्ये जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. १४ जुलैला रुग्णसंख्या ९,९१७ झाली असून, मृतांचा आकडा ३१० झाला आहे. मधल्या २२ दिवसांमध्ये तब्बल ४,८४५ रुग्ण वाढले असून, १३३ जणांचा मृत्यू झाला आहे. बदली नाट्यामुळे प्रशासनामध्ये अस्थिरता निर्माण झाली असून, त्याचा परिणाम कोरोना नियंत्रणाच्या कामावर झाल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.कोरोनाचे आकडे दहा हजारांपर्यंत पोहोचले असताना, नवीन आयुक्त अभिजीत बांगर पदभार स्वीकारत आहेत. प्रशासनाची विस्कटलेली घडी बसविण्याचे आव्हान आयुक्तांसमोर असणार आहे. अनेक अधिकारी नवीन असल्यामुळे त्यांना नवी मुंबईमधील परिस्थितीची पूर्णत: माहितीच नाही. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाºयांची संख्या कमी आहे. सर्वसाधारण रुग्णालय बंद असल्यामुळे कोरोनाव्यतिरिक्त आजारांसाठीही नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. खासगी रुग्णालयांकडून नागरिकांची लुबाडणूक सुरू आहे. लॉकडाऊन सुरू केला आहे, परंतु त्याची कोटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही. अनधिकृत फेरीवाल्यांवर कडक कारवाई होत नाही. नियम तोडणाºयांचा फटका नियम पाळणाºया नागरिकांना बसू लागला आहे.कोपरखैरणे, नेरुळ, ऐरोली, घणसोली या चार नोडमधील परिस्थिती हाताबाहेर गेली असून, आयुक्त ती पूर्वपदावर आणण्यासाठी काय करणार, याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.कोण आहेत अभिजीत बांगर ?नवनियुक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रामध्ये एम.ए.ची पदवी घेतली आहे. ते २००८च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. रायगडमधील माणगाव विभागाचे सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघरचे पहिले जिल्हाधिकारी, नागपूर महानगरपालिका आयुक्त, नागपूर विभागात अतिरिक्त विभागीय आयुक्तपदावर त्यांनी काम केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई