शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
2
CBSE board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; १० वीचा निकालही लवकरच लागण्याची शक्यता 
3
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
4
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
5
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी
6
सूरजचे असंख्य चाहते असूनही 'झापुक झुपूक' अपयशी का झाला? अंकिता वालावलकर म्हणाली- "त्याचे फॅन.."
7
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
8
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
9
टाटाने आणले Altroz चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल; मिळतील एकापेक्षा एक दमदार फिचर्स, पाहा...
10
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
11
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
12
म्युच्युअल फंडातील 'हे' शुल्क खातात तुमची कमाई; खर्च कमी करण्यासाठी काय करायचं?
13
देशातील परिस्थितीवर आलिया भटची इतक्या दिवसांनी पोस्ट; म्हणाली, "प्रत्येक वर्दीच्या मागे..."
14
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
15
गुन्हेगार अन् पीडितला एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
16
कधीच न पाहिलेला फोटो शेअर करत दिग्दर्शकाची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, म्हणाला...
17
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
18
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
19
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
20
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?

दहा हजारांच्या टप्प्यावर कर्णधार बदलला, पालिका आयुक्तांची बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 23:51 IST

अभिजीत बांगर यांची २३ जूनला पहिल्यांदा नवी मुंबईत बदली केली, तेव्हा रुग्णसंख्या ५,०७२ होती.

नवी मुंबई : शहरातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यामुळे महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. २२ दिवसांमध्ये दुसऱ्यांदा बदलीनाट्य घडविण्यात आले आहे. अभिजीत बांगर यांची २३ जूनला पहिल्यांदा नवी मुंबईत बदली केली, तेव्हा रुग्णसंख्या ५,०७२ होती. दुसऱ्यांदा नियुक्ती होईपर्यंत हा आकडा तब्बल ९,९१७ झाला असून, दहा हजारांच्या टप्प्यावरून शहर कोरोनामुक्त करण्याचे आव्हान नवीन आयुक्तांसमोर उभे राहिले आहे.नवी मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. सुनियोजित शहरही कोरोनामुक्त करण्यात यश येत नसल्यामुळे, शासनाने २३ जूनला आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली केली होती, परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मनधरणी करूनही बदली थांबविली होती. राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेत्यांकडेही बदली थांबविण्यासाठी स्थानिक पदाधिकाºयांनी आग्रह धरला होता. अखेर ४८ तासांमध्ये बदली रद्द करण्यात आली. पहिल्यांदा बदली नाट्य झाले, तेव्हा नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ५,०७२ एवढी होती. कोरोनामुळे १७७ जणांचे बळी गेले होते. पुढील २२ दिवसांमध्ये या रुग्णांमध्ये जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. १४ जुलैला रुग्णसंख्या ९,९१७ झाली असून, मृतांचा आकडा ३१० झाला आहे. मधल्या २२ दिवसांमध्ये तब्बल ४,८४५ रुग्ण वाढले असून, १३३ जणांचा मृत्यू झाला आहे. बदली नाट्यामुळे प्रशासनामध्ये अस्थिरता निर्माण झाली असून, त्याचा परिणाम कोरोना नियंत्रणाच्या कामावर झाल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.कोरोनाचे आकडे दहा हजारांपर्यंत पोहोचले असताना, नवीन आयुक्त अभिजीत बांगर पदभार स्वीकारत आहेत. प्रशासनाची विस्कटलेली घडी बसविण्याचे आव्हान आयुक्तांसमोर असणार आहे. अनेक अधिकारी नवीन असल्यामुळे त्यांना नवी मुंबईमधील परिस्थितीची पूर्णत: माहितीच नाही. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाºयांची संख्या कमी आहे. सर्वसाधारण रुग्णालय बंद असल्यामुळे कोरोनाव्यतिरिक्त आजारांसाठीही नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. खासगी रुग्णालयांकडून नागरिकांची लुबाडणूक सुरू आहे. लॉकडाऊन सुरू केला आहे, परंतु त्याची कोटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही. अनधिकृत फेरीवाल्यांवर कडक कारवाई होत नाही. नियम तोडणाºयांचा फटका नियम पाळणाºया नागरिकांना बसू लागला आहे.कोपरखैरणे, नेरुळ, ऐरोली, घणसोली या चार नोडमधील परिस्थिती हाताबाहेर गेली असून, आयुक्त ती पूर्वपदावर आणण्यासाठी काय करणार, याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.कोण आहेत अभिजीत बांगर ?नवनियुक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रामध्ये एम.ए.ची पदवी घेतली आहे. ते २००८च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. रायगडमधील माणगाव विभागाचे सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघरचे पहिले जिल्हाधिकारी, नागपूर महानगरपालिका आयुक्त, नागपूर विभागात अतिरिक्त विभागीय आयुक्तपदावर त्यांनी काम केले आहे.

दहा हजारांच्या टप्प्यावर कर्णधार बदलला, पालिका आयुक्तांची बदली : नवी मुंबई कोरोनामुक्त करण्याचे आव्हान नवी मुंबई : शहरातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यामुळे महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. २२ दिवसांमध्ये दुसऱ्यांदा बदलीनाट्य घडविण्यात आले आहे. अभिजीत बांगर यांची २३ जूनला पहिल्यांदा नवी मुंबईत बदली केली, तेव्हा रुग्णसंख्या ५,०७२ होती. दुसऱ्यांदा नियुक्ती होईपर्यंत हा आकडा तब्बल ९,९१७ झाला असून, दहा हजारांच्या टप्प्यावरून शहर कोरोनामुक्त करण्याचे आव्हान नवीन आयुक्तांसमोर उभे राहिले आहे.नवी मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. सुनियोजित शहरही कोरोनामुक्त करण्यात यश येत नसल्यामुळे, शासनाने २३ जूनला आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली केली होती, परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मनधरणी करूनही बदली थांबविली होती. राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेत्यांकडेही बदली थांबविण्यासाठी स्थानिक पदाधिकाºयांनी आग्रह धरला होता. अखेर ४८ तासांमध्ये बदली रद्द करण्यात आली. पहिल्यांदा बदली नाट्य झाले, तेव्हा नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ५,०७२ एवढी होती. कोरोनामुळे १७७ जणांचे बळी गेले होते. पुढील २२ दिवसांमध्ये या रुग्णांमध्ये जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. १४ जुलैला रुग्णसंख्या ९,९१७ झाली असून, मृतांचा आकडा ३१० झाला आहे. मधल्या २२ दिवसांमध्ये तब्बल ४,८४५ रुग्ण वाढले असून, १३३ जणांचा मृत्यू झाला आहे. बदली नाट्यामुळे प्रशासनामध्ये अस्थिरता निर्माण झाली असून, त्याचा परिणाम कोरोना नियंत्रणाच्या कामावर झाल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.कोरोनाचे आकडे दहा हजारांपर्यंत पोहोचले असताना, नवीन आयुक्त अभिजीत बांगर पदभार स्वीकारत आहेत. प्रशासनाची विस्कटलेली घडी बसविण्याचे आव्हान आयुक्तांसमोर असणार आहे. अनेक अधिकारी नवीन असल्यामुळे त्यांना नवी मुंबईमधील परिस्थितीची पूर्णत: माहितीच नाही. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाºयांची संख्या कमी आहे. सर्वसाधारण रुग्णालय बंद असल्यामुळे कोरोनाव्यतिरिक्त आजारांसाठीही नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. खासगी रुग्णालयांकडून नागरिकांची लुबाडणूक सुरू आहे. लॉकडाऊन सुरू केला आहे, परंतु त्याची कोटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही. अनधिकृत फेरीवाल्यांवर कडक कारवाई होत नाही. नियम तोडणाºयांचा फटका नियम पाळणाºया नागरिकांना बसू लागला आहे.कोपरखैरणे, नेरुळ, ऐरोली, घणसोली या चार नोडमधील परिस्थिती हाताबाहेर गेली असून, आयुक्त ती पूर्वपदावर आणण्यासाठी काय करणार, याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.कोण आहेत अभिजीत बांगर ?नवनियुक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रामध्ये एम.ए.ची पदवी घेतली आहे. ते २००८च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. रायगडमधील माणगाव विभागाचे सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघरचे पहिले जिल्हाधिकारी, नागपूर महानगरपालिका आयुक्त, नागपूर विभागात अतिरिक्त विभागीय आयुक्तपदावर त्यांनी काम केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई