शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
3
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
4
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
5
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
6
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
7
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
8
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
9
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
10
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
11
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
12
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
13
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
14
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
15
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
16
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
17
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
18
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
19
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
20
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान

नवी मुंबईत राबविणार एसआरए योजना, सर्वांना सहकार्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 00:07 IST

SRA scheme : नवी मुंबईमध्ये दिघा ते बेलापूरपर्यंत अनेक ठिकाणी झोपडपट्टी आहेत. सर्वेक्षण झालेल्या झोपड्यांच्या पुनर्बांधणीसाठी शासनाने एमएमआर रिजनसाठी स्वतंत्र प्राधिकरण तयार केले आहे.

नवी मुंबई : शासनाने मुंबई महानगरपालिका प्रदेश क्षेत्रातील ८ पालिका व ७ नगरपालिकांसाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्राधिकरणाच्या माध्यमातून नवी मुंबईमध्येही झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यात येणार आहे. कायद्याच्या कक्षेत राहून झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे मिळवून देण्यात येणार असून, यासाठी राजकारण न करता, सर्वांनी सकारात्मक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले आहे.

नवी मुंबईमध्ये दिघा ते बेलापूरपर्यंत अनेक ठिकाणी झोपडपट्टी आहेत. सर्वेक्षण झालेल्या झोपड्यांच्या पुनर्बांधणीसाठी शासनाने एमएमआर रिजनसाठी स्वतंत्र प्राधिकरण तयार केले आहे. २६ ऑगस्टला याविषयी निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईबाहेरील विभागांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण क्षेत्र लागू करण्यासाठी अभ्यासगटाची शिफारस तत्त्वत: स्वीकारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, राज्यातील इतर प्रमुख शहरातील झोपडपट्ट्यांना झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्यासाठी प्रधान गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र अभ्यासगट नेमला आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार आहे.

नवी मुंबईमध्येही या योजनेंतर्गत झाेपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे विजय चौगुले यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. यासाठी चिंचपाडा व इतर काही झोपडपट्टी परिसरातील विकासाची ब्ल्यू प्रिंटही तयार केली आहे. पुनर्विकास कसा असेल, याविषयी सादरीकरणही यावेळी दाखविण्यात आले. शासनाच्या योजनेमुळे कायद्याच्या चौकटीत राहून झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करणे शक्य होणार आहे. ऐरोलीचे आजी-माजी आमदार व इतर सर्वांनीच यासाठी सकारात्मक भूमिका ठेवावी. पुनर्वसन योजना पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वांनी पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त केले.

दिघामधील प्रश्न सोडविण्यासाठी तेथेही एसआरएच्या माध्यमातून विकास करता यावा, यासाठी न्यायालयात भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी ऐरोलीचे शिवसेना जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, माजी नगरसेवक मनोज हळदणकर, जगदीश गवते व इतर पदाधिकारी होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई