शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
3
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
4
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
5
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
6
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
7
Tariffs on Furniture: ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका?
8
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
9
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
10
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?
11
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
12
Jalebi Recipe: रसरशीत जिलेबी करण्यासाठी शेफने सांगितली खास टीप; १० मिनिटांत होईल तयार 
13
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
14
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
15
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
16
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
17
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
18
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
19
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
20
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI

साडेबारा टक्के भूखंड वाटपाला गती

By admin | Updated: October 5, 2016 03:22 IST

साडेबारा टक्के भूखंडांच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याच्या दृष्टीने सह व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांनी कंबर कसली आहे

कमलाकर कांबळे , नवी मुंबई साडेबारा टक्के भूखंडांच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याच्या दृष्टीने सह व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांनी कंबर कसली आहे. विविध कारणांमुळे प्रलंबित राहिलेल्या प्रकरणांची पात्रता तपासणीसाठी ४00 प्रकरणे सध्या विचाराधीन आहेत. त्यापैकी काही संचिका सोडतीच्या प्रक्रियेत तर काही पुनर्रावलोकनाच्या टप्प्यात आहेत. मंगळवारी ठाणे जिल्ह्यातील १५२ संचिकांची यादी पात्रता तपासणीसाठी जाहीर करण्यात आली आहे. एकूणच सिडकोने रखडलेल्या साडेबारा टक्के भूखंड वाटप योजनेला पुन्हा गती दिल्याने प्रकल्पग्रस्तांसह गुंतवणूकदार आणि विकासकांनी समाधान व्यक्त केले आहे.नवी मुंबईच्या उभारणीसाठी नवी मुंबई, उरण आणि पनवेल परिसरातील ९५ गावांतील जमिनी संपादित करण्यात आल्या. या संपादित जमिनीच्या मोबदल्यात संबंधित प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के विकसित भूखंडाचे वाटप केले जाते. १९९४ पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. परंतु विविध कारणांमुळे सुरुवातीपासूनच ही योजना वादग्रस्त ठरली आहे. विकासक आणि दलालांनी संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून या योजनेच्या आडून नियमबाह्यरीत्या मोठ्या प्रमाणात भूखंड लाटले आहेत. याचा पूर्वानुभव लक्षात घेवून सिडकोच्या संबंधित विभागाकडून प्रलंबित प्रकरणे निकाली काढताना अत्यंत सावधगिरी बाळगली जात आहे. एकूणच सिडकोच्या कुप्रसिध्दीला कारणीभूत ठरलेला हा विभागच बंद करण्याची योजना व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी आखली आहे. प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार सह व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांनी रखडलेल्या भूखंड वाटप प्रक्रियेला गती दिली आहे. सध्या ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील विविध कारणांमुळे प्रलंबित राहिलेल्या संचिकांचे पुनर्रावलोकन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील १५२ संचिकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात संचिकानिहाय इरादीत भूखंडाचा तपशील देण्यात आला आहे. संबंधित संचिकाधारकांनी याबाबत काही आक्षेप असल्यास किंवा दुबार भूखंड वाटप झाले असल्यास त्यासंदर्भात पंधरा दिवसांत संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील आणखी २६८ संचिका पात्रता फेरीत आहेत. या संचिकांची भूखंड पात्रता सिध्द करण्यासाठी संबंधित प्रकल्पग्रस्त व त्यांच्या वारसाचे बांधकाम अहवाल मागविण्यात आले आहेत.