शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

विमानतळाच्या कामाला गती द्या! मुख्यमंत्र्यांचे निर्देश; नवी मुंबई विमानतळासंदर्भात तीन सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 01:37 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने गती घेतली आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या प्रकल्पासंदर्भातील तीन सामंजस्य करार करण्यात आले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी दिले.

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने गती घेतली आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या प्रकल्पासंदर्भातील तीन सामंजस्य करार करण्यात आले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी दिले.देशातील पहिले ग्रीन फिल्ड विमानतळ म्हणून नवी मुंबई विमानतळाची उभारणी करण्यात येणार आहे. जवळपास २,२२६ हेक्टर जागेवर हे विमानतळ उभारण्यात येणार आहे, तर वैमानिक क्षेत्राची जागा ११६० हेक्टर इतकी असणार आहे. या प्रकल्पाचा खर्च सुमारे १६,००० कोटींच्या घरात आहे. पहिल्या टप्प्याचे काम २०१९ सालापर्यंत पूर्ण करण्याचा सिडकोचा मानस आहे. त्यादृष्टीने कामाला गती देण्यात आली आहे. या नवी मुंबई विमानतळासाठी भागीदार कंपनी म्हणून मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीबरोबर मिळून सिडको व इतर भागीदारांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रा. लिमिटेड या विशेष उद्देश वहन (एसपीव्ही) कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीबरोबर सोमवारी सवलत करारनामा, राज्य शासनाच्या पाठिंब्याचा करार व भागधारकांचा करार आदी तीन महत्त्वपूर्ण करार करण्यात आले. या वेळी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे-वर्मा, मुख्य दक्षता अधिकारी विनय कोरगावकर, जीव्हीकेचे संजय रेड्डी, मुंबई विमानतळ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जैन आदी उपस्थित होते.यांनी केल्या स्वाक्षºया!सामंजस्य करावारवर सिडकोच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीच्या वतीने जीव्हीके कंपनीचे प्रमुख जीव्हीके रेड्डी यांनी करारावर स्वाक्षºया केल्या.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस