शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

महापालिकेच्या विशेष महासभेत फक्त चर्चेचे गुऱ्हाळ

By admin | Updated: September 15, 2015 23:27 IST

शहरातील कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेविषयी चर्चा करण्यासाठी आयोजित विशेष सभा रात्री साडेदहा वाजेपर्यंत सुरू होती. दहा तास सुरू असलेल्या चर्चेमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी

नवी मुंबई : शहरातील कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेविषयी चर्चा करण्यासाठी आयोजित विशेष सभा रात्री साडेदहा वाजेपर्यंत सुरू होती. दहा तास सुरू असलेल्या चर्चेमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी आरोग्य विभागावर भ्रष्टाचारासह गटबाजीचे आरोप केले. मात्र या चर्चेतून काहीही निष्पन्न झाले नाही. प्रशासनाने आरोपांचे व लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तरच दिले नाही. नवी मुंबईमध्ये डेंग्यू, मलेरियाचे थैमान सुरू झाले आहे. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. पूर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडली असून त्यावर चर्चा करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रससह विरोधकांनी आरोग्य विभागास भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. अधिकाऱ्यांमध्ये गटबाजी सुरू आहे. डॉक्टर व्यवस्थित काम करत नाहीत. हिरानंदानीमध्ये योग्य उपचार मिळत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. दुपारी १२ वाजता सुरू झालेली सभा रात्री साडेदहा वाजेपर्यंत सुरू होती. एक तासाची सुटी वगळता जवळपास दहा तास चर्चा सुरू होती. सर्वांनी आरोग्य यंत्रणेमधील चुका निदर्शनास आणून दिल्या. अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणला. विशेष सभेतील चर्चा संपत आल्यानंतर आयुक्त दिनेश वाघमारे सभागृहातून निघून दालनात जावून बसले. महापौरांनी मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दीपक परोपकारी यांना उत्तर देण्यासाठी बोलावले परंतु ते ५ मिनिटे फक्त उभे राहिले. त्यांची दोलायमान स्थिती पाहून महापौरांनी सर्व सदस्यांच्या प्रश्नांवर सविस्तर उत्तर तयार करा. या सभेविषयी सविस्तर अहवाल १६ सप्टेंबरला सर्वांसमोर सादर करा असे सांगून सभा संपल्याचे जाहीर केले. प्रशासनाने काहीच उत्तर दिले नसल्यामुळे दिवसभर चर्चा कशासाठी केली असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला. आरोग्य विभागाची तपासणी करण्यासाठी चौकशी समिती नेमली पाहिजे. रुग्णालयामध्ये जेनेरिक औषधांचे केंद्र सुरू झाले पाहिजे. आरोग्य विभागाने प्रत्येक वर्षी काय काम केले, किती नागरिकांना लाभ मिळवून दिला त्याचा अहवाल सादर केला पाहिजे. - जयवंत सुतार, सभागृह नेतेमहापालिकेची आरोग्य यंत्रणा फक्त नावापुरती शिल्लक आहे. शहरवासीयांना योग्य उपचार मिळत नाहीत. साथीचे आजार नियंत्रणात येत नाहीत. पालिका रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयांची प्रयोगशाळा झाली असून प्रशासन जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे. - विजय चौगुले, विरोधी पक्षनेते डॉक्टर सर्व टेंडरवाले झाले आहेत. ऐरोलीतील रुग्णालयाला मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी परवानगी जाणीवपूर्वक दिली नव्हती. आरोग्याचा पूर्णपणे खेळखंडोबा झाला आहे. - अविनाश लाड, उपमहापौर आरोग्य विभागास कधीही निधीची कमतरता भासू दिली नाही. या विभागाचे सर्व प्रस्ताव तत्काळ मंजूर केले. परंतु प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे रुग्णालये वेळेत सुरू झाली नाहीत. प्रशासनास यापुढेही सर्व मदत केली जाईल. परंतु त्यांनी एकमेकांमधील मतभेद दूर करून चांगले काम केले पाहिजे. -सूरज पाटील, नगरसेवक