शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

लेख: नवी मुंबईला जे जमते, ते इतरांना का नाही .. ?

By अतुल कुलकर्णी | Updated: April 3, 2023 08:26 IST

स्वच्छतेची मानसिकता एका रात्रीतून येत नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. नवी मुंबईमध्ये २०१८ पासून या प्रयत्नांना सुरुवात झाली.

अधिकाऱ्यांनी ठरवले तर काय होऊ शकते, यासाठी महाराष्ट्रात अनेक उदाहरणे देता येतील. दूरगामी विचार करणाऱ्या अनेक उत्तम अधिकाऱ्यांची महाराष्ट्राला परंपरा लाभली आहे. त्यांनी आपापल्या काळात 'भाइल स्टोन' काम करून ठेवले आहे. अशा अधिकाऱ्यांची यादी केली तर ती खूप मोठी होईल. महाराष्ट्र त्या दृष्टीने भाग्यवान आहे. राजकारण्यांच्या हातातले बाहुले व्हायचे की, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची, याचा निर्णय त्या त्या अधिकाऱ्यांनी स्वतः घ्यायचा असतो. एकदा त्यांनी स्वतःच्या मनाशी ठरवले की, मग त्यांचे विचार, आचार आणि काम त्याच दिशेने होऊ लागते.

१ ऑक्टोबर २०२२ मध्ये जाहीर झालेल्या स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात नवी मुंबई भारतात तिसऱ्या क्रमांकावर आले. २०१८ मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून डॉ. रामास्वामी एन. यांनी पदभार स्वीकारला. त्यावेळी देशातून स्वच्छ शहरांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. नवी मुंबईच्या सुंदर दिसण्याला व्हिजन देण्याच्या कामाचे बीजारोपण रामास्वामी यांनी केले. कोविडमुळे काम रेंगाळले. मात्र, त्यांच्या जागी आलेल्या अभिजित बांगर यांनी ते काम पुढे नेले. तरुण, तडफदार अधिकारी अशी बांगर यांची ओळख आहे. संयमी वागणे आणि मनात एखादी गोष्ट पक्की करून त्याचे नियोजन करणे हा त्यांचा स्वभाव. त्यामुळे त्यांनी नवी मुंबईला सुंदर करण्याच्या कामाला त्यांनी वेग दिला. बांगर यांची बदली ठाणे महापालिकेचे आयुक्त म्हणून झाली. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त झाले. ३० सप्टेंबर २०१२ रोजी नार्वेकर यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आणि १ ऑक्टोबरला स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणाचा निकाल जाहीर झाला. नवे आयुक्त म्हणून राजेश नार्वेकर पुरस्कार घ्यायला दिल्लीला जाऊ शकले असते. मात्र, तसे न करता तुम्हीच पुरस्कार घेतला पाहिजे, असे सांगून बांगर यांनाच त्यांनी दिल्लीला पाठवले.

हे सांगण्याचे कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वी प्रख्यात उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी, नवी मुंबईतील एका उड्डाणपुलाखाली मुले खेळत आहेत. सुंदर रंगरंगोटी केलेली आहे. कुठेही कचरा नाही, असा एक व्हिडीओ ट्रीट केला. नवी मुंबईतील एका हॉस्पिटलने शहरांचा हॅपीनेस इंडेक्स शोधला. त्यात नवी मुंबईचा हॅपीनेस इंडेक्स ८०% च्या वर असल्याचे समोर आले.

नवी मुंबईचे वेगळेपण सांगायला या दोन घटना पुरेशा आहेत, बांगर यांच्या जागी आलेल्या राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबईच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी अनेक गोष्टी केल्या. कोणावरही आरडाओरड न करता. सुरू शांतपणे मात्र तितक्याच खंबीरपणाने त्यांनी कामांना वेग दिला. ज्या ज्या ठिकाणी महापालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागा • आहेत. त्या शोधून तेथे चांगले काय करता येईल याचा आराखडा आखला. त्यामुळेच आज नवी मुंबईत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्रतीके दिसत आहेत रस्त्यावर कचरा दिसत नाही. लोकांच्या मानसिकतेत बदल होताना दिसत आहे.

आपण परदेशात गेल्यानंतर कागदात किंवा प्लास्टिकमध्ये काही खायला नेले असेल तर ते खाऊन झाल्यावर कागद गुंडाळून स्वतःच्या खिशात ठेवतो. हॉटेलवर आल्यानंतर डस्टबिनमध्ये टाकतो. तेच आपण भारतात आल्यानंतर मात्र दिसेल तिथे कचरा टाकतो. ज्या रस्त्यावर आपण कचरा टाकणार आहोत, ते रस्ते स्वच्छ असतील तर आपणही कचरा करण्यापूर्वी दोन वेळा विचार करतो. ही मानसिकता एका रात्रीतून येत नाही. त्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. नवी मुंबईमध्ये २०१८ पासून या प्रयत्नांना सुरुवात झाली. चार-पाच वर्षांत या मानसिकतेने एक निश्चित दिशा धरली आहे.

नवी मुंबईला जे जमले ते मुंबईसह इतर महापालिकांना का जमत नाही? कल्याण डोंबिवलीमध्ये डॉ. विजय सूर्यवंशी आयुक्त असताना जे काम झाले ते आज होताना दिसत नाही. पनवेल महापालिकेत थोडे बहुत प्रयत्न सुरू आहेत.

अभिजित बांगर स्वतः ठाण्यात गेले आहेत. चंद्रशेखर यांच्यासारख्या अधिकाऱ्याने बाळासाहेब ठाकरे पाठीशी होते म्हणून. ठाण्यातील अनेक अतिक्रमणे भुईसपाट केली. बांगर यांच्या पाठीशी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे चेल्या-चपाट्यांना दाद न देता काम करण्याची मुभा बांगर यांना आहे. नवी मुंबईत जे केले ते ठाण्यामध्ये करून दाखवण्याची धमक त्यांच्यात आहे.

मुंबईचे काय?

१. मुंबई महापालिका श्रीमंत आणि मोठी १ महापालिका आहे. मात्र, मुंबईत सुशोभीकरणाच्या नावाखाली केवळ खडबडीत गालांना पावडर चोपडणे सुरु आहे. जी डेंटीच्या निमित्ताने मुंबईचे बकालपण पडदे आणि फ्लेक्स लावून झाकले जात आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत.

२. मुंबईचा डान्सबार करून टाकला आहे. वाटेल तशी लायटिंग ठिकठिकाणी मुंबईत केली आहे. असे म्हणत राज ठाकरे यांनी मुंबईत चालू असलेल्या कामांचे नेमके वर्णन केले आहे.

३. कुठलाही गाजावाजा किंवा बडेजाव न करता नवी मुंबईत जे झाले ते मुंबईत करण्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे. दुर्दैवाने त्याचाच अभाव दिसत आहे.

४. ठिकठिकाणी पडलेले कचऱ्यांचे ढीग, वाटेल तेथे फेरीवाल्यांनी थाटलेली दुकाने, त्यातून होणारा कचरा यावर जरी- नियंत्रण ठेवण्याची इच्छाशक्ती मुंबई महापालिकेने दाखवली तरीही ५०% मुंबई स्वच्छ दिसू लागेल. तुम्हाला काय वाटते...?

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMumbaiमुंबईmahim-acमाहीम