शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

एसपी सिंगलाचे रेवस-करंजा पुलाचे कंत्राटही वादाच्या भोवऱ्यात

By नारायण जाधव | Updated: June 26, 2023 15:44 IST

धरमतर खाडीत २.४ किमीचा आहे पूल : ७९८ कोटींचे आहे काम

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पर्यटकांचे आकर्षण असलेल्या निसर्गरम्य अलिबागला नवी मुंबई आणि मुंबई महानगरीशी जोडणाऱ्या रेवस ते उरण नजीकच्या करंजा बंदराला जोडणारा सागरी पुलाचे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कारण या पुलाचे बांधकामाचे कंत्राट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बहुचर्चित एस.पी. सिंगला कन्स्ट्रक्शन्स कंपनीला दिले आहे. ही कंपनी बांधत असलेला बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात गंगा नदीवरील पूल काम पूर्ण होण्याआधीच कोसळला आहे. यामुळे या कंपनीच्या राज्यातील सर्व कामांची चौकशीची मागणी होत आहे. त्यात या पुलाच्या कंत्राटाचाही समावेश आहे.

एस.पी. सिंगला कन्स्ट्रक्शन्स कंपनीला राजधानी मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा गोरेगाव- मुलुंड उन्नत मार्ग, गोरेगाव हा ६ पदरी उड्डाणपुलाचे ६ अब्ज ६६ कोटी ६ लाख ७८ हजार इतक्या रकमेचे हे कंत्राट दिले आहे. मात्र, गंगा नदीवरील पूल कोसळल्यानंतर या दुर्घनटनेची पुनरावृत्ती टाळायची असेल तर एस. पी. सिंगला कन्स्ट्रक्शन कंपनीला काळ्या यादीत टाकून दक्षता समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल यांना दिले आहे. याच कंपनीला रस्ते विकास महामंडळाने धरमतर खाडीवरील रेवस - कारंजा दरम्यानच्या २.०४ किमी लांबीचा पूल बांधण्याचे ७९७ कोटी ७७ लाखांचे कंत्राट दिले आहे.

१०० कोटी कमी दराने घेतले कामया पुलाच्या बांधकामासाठी एकूण सहा कंपन्या इच्छुक हाेत्या. त्यातील ११.१३ टक्के कमी दराने निविदा भरणाऱ्या एस.पी. सिंगलाचे कंत्राट मंजूर केले आहे. या कंत्राटाची मूळ किंमत ८९७ कोटी ६८ लाख इतकी असून त्यापेक्षा एस.पी. सिंगलाने १०० कोटी कमी दराने ते घेतल्याने त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

हे होते स्पर्धक सहा कंत्राटदारएसपी सिंगला कन्स्ट्रक्शन्स (एसपीएससीएल) ७९७.७७ कोटीलार्सन अँड टुब्रो ८७३.१० कोटीजे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स ८८८.०० कोटीरेल विकास निगम लिमिटेड ९२२.५० कोटीॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर ११०२.५० कोटीअशोका बिल्डकॉन १२८९.७० कोटीदोन्ही पुलांमध्ये हे साम्यबिहारच्या भागलपूर येथे गंगा नदीवरील निर्माणाधीन ४०० मीटर पूल कोसळला आहे. बिहारमधील पूल गंगा नदीवर बांधण्यात येत होता. तर रेवस-करंजा पूल खाडीवर बांधण्यात येत आहे. दोन्ही पूल पाण्यात बांधण्यात येत आहेत, हे यातील प्रमुख साम्य आहे.

बिहारमध्ये गुन्हा दाखलगंगा नदीवर पुलाचे बांधकाम पूर्ण होण्याआधीच पूल कोसळल्याने त्याच्या बांधकाम दर्जाविषयी शंका उपस्थित करण्यात येत आहेत. या दुर्घटनेनंतर बिहार सरकारने एस.पी. सिंगला कन्स्ट्रक्शन्स कंपनी विरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. यामुळे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने बिहारची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कंपनीविरोधातील चौकशी पूर्ण होईपर्यंत रेवस-करंजाच्या कामास स्थगिती द्यावी, किंवा कंत्राट रद्द करून नव्याने निविदा मागवाव्यात, अशी मागणी होत आहे.