शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

स्वच्छता सर्वेक्षण संपताच; पुन्हा फेरीवाल्यांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:25 IST

पदपथांवरील अतिक्रमणाचा पादचाऱ्यांना अडथळा

नवी मुंबई : स्वच्छता सर्वेक्षण संपताच शहरातील पदपथांवर पुन्हा अनधिकृत बाजार बसू लागले आहेत, त्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत असतानाही पालिकेकडून कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. परिणामी, केवळ सर्वेक्षणापुरती शहरात स्वच्छता राखली जात असल्याचाही संशय व्यक्त होऊ लागला आहे.

नवी मुंबईला स्वच्छतेत देशात अव्वल स्थान प्राप्त करून देण्यासाठी महापालिकेतर्फे प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता सार्वजनिक स्थळांची स्वच्छता केली जात असून, रस्त्यालगतच्या भिंतीही रंगवण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच पदपथही फेरीवाल्यांच्या विळख्यातून सोडवण्यात आले होते.

मात्र, हा खटाटोप केवळ स्वच्छता सर्वेक्षणासाठी करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे, त्यामुळेच सर्वेक्षण संपताच पुन्हा पदपथांवर बाजार बसू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. यावरून प्रशासनालाच शहर स्वच्छतेबाबत गांभीर्य नसून, केवळ स्पर्धेसाठी दिखावा होत असल्याचा संशय बळावू लागला आहे. तर फेरीवाल्यांकडून पदपथ बळकावले जात असल्याचा मनस्ताप पादचाºयांना करावा लागत आहे.

पदपथांवर झालेल्या अतिक्रमणामुळे पादचाºयांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. यामध्ये त्यांच्या जीविताला अपघाताचा धोका सतावत आहे.असे दृश्य वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, नेरुळ परिसरात पाहायला मिळत आहे. या फेरीवाल्यांवर ठोस कारवाईसाठी विभाग कार्यालयामार्फत तीव्र मोहीम राबवली जाण्याची गरज सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे; परंतु प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचारी यांच्याच अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे फेरीवाले सोकावले असल्याचा आरोप होत आहे.

पदपथ, मोकळी जागा या ठिकाणी बसणारे हे अनधिकृत फेरीवाले शहराबाहेरून येत असल्याचेही उघडपणे दिसून येत आहे. त्यांच्यामुळे शहराच्या स्वच्छतेचाही बोजवारा उडत आहे. यानंतरही त्यांना कायमचे हटवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याने अधिकाºयांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे स्मार्ट सिटी म्हणून ओळखली जाणारी नवी मुंबई भविष्यात फेरीवाल्यांचे शहर म्हणून ओळखली जाण्याची भीती सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबईMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार