शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

स्वच्छता सर्वेक्षण संपताच; पुन्हा फेरीवाल्यांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:25 IST

पदपथांवरील अतिक्रमणाचा पादचाऱ्यांना अडथळा

नवी मुंबई : स्वच्छता सर्वेक्षण संपताच शहरातील पदपथांवर पुन्हा अनधिकृत बाजार बसू लागले आहेत, त्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत असतानाही पालिकेकडून कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. परिणामी, केवळ सर्वेक्षणापुरती शहरात स्वच्छता राखली जात असल्याचाही संशय व्यक्त होऊ लागला आहे.

नवी मुंबईला स्वच्छतेत देशात अव्वल स्थान प्राप्त करून देण्यासाठी महापालिकेतर्फे प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता सार्वजनिक स्थळांची स्वच्छता केली जात असून, रस्त्यालगतच्या भिंतीही रंगवण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच पदपथही फेरीवाल्यांच्या विळख्यातून सोडवण्यात आले होते.

मात्र, हा खटाटोप केवळ स्वच्छता सर्वेक्षणासाठी करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे, त्यामुळेच सर्वेक्षण संपताच पुन्हा पदपथांवर बाजार बसू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. यावरून प्रशासनालाच शहर स्वच्छतेबाबत गांभीर्य नसून, केवळ स्पर्धेसाठी दिखावा होत असल्याचा संशय बळावू लागला आहे. तर फेरीवाल्यांकडून पदपथ बळकावले जात असल्याचा मनस्ताप पादचाºयांना करावा लागत आहे.

पदपथांवर झालेल्या अतिक्रमणामुळे पादचाºयांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. यामध्ये त्यांच्या जीविताला अपघाताचा धोका सतावत आहे.असे दृश्य वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, नेरुळ परिसरात पाहायला मिळत आहे. या फेरीवाल्यांवर ठोस कारवाईसाठी विभाग कार्यालयामार्फत तीव्र मोहीम राबवली जाण्याची गरज सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे; परंतु प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचारी यांच्याच अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे फेरीवाले सोकावले असल्याचा आरोप होत आहे.

पदपथ, मोकळी जागा या ठिकाणी बसणारे हे अनधिकृत फेरीवाले शहराबाहेरून येत असल्याचेही उघडपणे दिसून येत आहे. त्यांच्यामुळे शहराच्या स्वच्छतेचाही बोजवारा उडत आहे. यानंतरही त्यांना कायमचे हटवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याने अधिकाºयांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे स्मार्ट सिटी म्हणून ओळखली जाणारी नवी मुंबई भविष्यात फेरीवाल्यांचे शहर म्हणून ओळखली जाण्याची भीती सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबईMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार