शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

स्वच्छता सर्वेक्षण संपताच; पुन्हा फेरीवाल्यांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:25 IST

पदपथांवरील अतिक्रमणाचा पादचाऱ्यांना अडथळा

नवी मुंबई : स्वच्छता सर्वेक्षण संपताच शहरातील पदपथांवर पुन्हा अनधिकृत बाजार बसू लागले आहेत, त्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत असतानाही पालिकेकडून कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. परिणामी, केवळ सर्वेक्षणापुरती शहरात स्वच्छता राखली जात असल्याचाही संशय व्यक्त होऊ लागला आहे.

नवी मुंबईला स्वच्छतेत देशात अव्वल स्थान प्राप्त करून देण्यासाठी महापालिकेतर्फे प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता सार्वजनिक स्थळांची स्वच्छता केली जात असून, रस्त्यालगतच्या भिंतीही रंगवण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच पदपथही फेरीवाल्यांच्या विळख्यातून सोडवण्यात आले होते.

मात्र, हा खटाटोप केवळ स्वच्छता सर्वेक्षणासाठी करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे, त्यामुळेच सर्वेक्षण संपताच पुन्हा पदपथांवर बाजार बसू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. यावरून प्रशासनालाच शहर स्वच्छतेबाबत गांभीर्य नसून, केवळ स्पर्धेसाठी दिखावा होत असल्याचा संशय बळावू लागला आहे. तर फेरीवाल्यांकडून पदपथ बळकावले जात असल्याचा मनस्ताप पादचाºयांना करावा लागत आहे.

पदपथांवर झालेल्या अतिक्रमणामुळे पादचाºयांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. यामध्ये त्यांच्या जीविताला अपघाताचा धोका सतावत आहे.असे दृश्य वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, नेरुळ परिसरात पाहायला मिळत आहे. या फेरीवाल्यांवर ठोस कारवाईसाठी विभाग कार्यालयामार्फत तीव्र मोहीम राबवली जाण्याची गरज सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे; परंतु प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचारी यांच्याच अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे फेरीवाले सोकावले असल्याचा आरोप होत आहे.

पदपथ, मोकळी जागा या ठिकाणी बसणारे हे अनधिकृत फेरीवाले शहराबाहेरून येत असल्याचेही उघडपणे दिसून येत आहे. त्यांच्यामुळे शहराच्या स्वच्छतेचाही बोजवारा उडत आहे. यानंतरही त्यांना कायमचे हटवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याने अधिकाºयांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे स्मार्ट सिटी म्हणून ओळखली जाणारी नवी मुंबई भविष्यात फेरीवाल्यांचे शहर म्हणून ओळखली जाण्याची भीती सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबईMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार