शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

सोनसाखळी चोरट्यांचा धुडगूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 01:34 IST

शहरात एकाच दिवशी सोनसाखळीचोरीचे चार गुन्हे घडले आहेत. वाढत्या सोनसाखळीचोरीच्या गुन्ह्यांमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

नवी मुंबई : शहरात एकाच दिवशी सोनसाखळीचोरीचे चार गुन्हे घडले आहेत. वाढत्या सोनसाखळीचोरीच्या गुन्ह्यांमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तर गुन्हेगार पुन्हा डोके वर काढू लागल्याने पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.मागील काही दिवसांपासून काही प्रमाणात नियंत्रणात आलेल्या सोनसाखळीचोरीच्या घटना पुन्हा घडू लागल्या आहेत. शुक्रवारी एकाच दिवशी शहरात चार ठिकाणी सोनसाखळीचोरी झाली आहे. त्यापैकी नेरुळ हद्दीत एकाच वेळी दोन महिलांचे मंगळसूत्र चोरून चोरट्यांनी पळ काढला आहे, यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. जया कोणार व अतिका सलाम अशी दोन महिलांची नावे आहेत. दोघीही रात्री ८ वाजण्याच्या सुमारास रस्त्यालगत भाजी खरेदी करत होत्या. या वेळी पाठीमागून आलेल्या अज्ञाताने दोघींच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळ काढला. यामध्ये त्यांचे एकूण ५७ हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याची नोंद नेरुळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याचदरम्यान रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत रस्ता ओलांडणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र खेचून चोरट्याने पळ काढला आहे. तर गुरुवारी ऐरोली सेक्टर ९ येथील रस्त्याने पायी चाललेल्या संगीता मारी यांचे मंगळसूत्र चोरीला गेले आहे. त्या रस्त्याने चालत जात असताना पाठीमागून चालत आलेल्या व्यक्तीने मंगळसूत्र खेचून काही अंतरावर मोटारसायकलवर उभ्या असलेल्या साथीदारासह पळ काढला. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर सीबीडी येथे उषा अहिरे (५९) या वृद्धेचे मंगळसूत्र चोरीला गेले आहे. शुक्रवारी रात्री ११. ३० वाजण्याच्या सुमारास त्या पतीसह रस्त्याने चालल्या होत्या. या वेळी पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांचे मंगळसूत्र खेचून पळ काढला.सोनसाखळीचोरीच्या घटनांमध्ये अनेकदा महिला जखमीही होतात. शिवाय महिलांच्या भावनांशी संबंधित दागिना चोरीला जात असल्याने अशा गुन्ह्यांकडे पोलिसांनीही गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. मात्र, मागील काही महिन्यांत सातत्याने सोनसाखळीचोरीचे गुन्हे घडू लागले आहेत. यामध्ये शहराबाहेरील सराईत टोळीचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, त्यांच्यावर कायद्याचा धाक निर्माण करण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याचा संताप महिलावर्गाकडून व्यक्त होत आहे.