शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दलालांच्या विळख्यातून आरटीओला सोडवा; रिक्षाचालकांचा धडक मोर्चा, अडवणूक होत असल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 03:15 IST

आरटीओ कार्यालयाला दलालांच्या विळख्यातून मुक्त करून, रिक्षाचालकांची पिळवणूक थांबवण्याच्या मागणीसह प्रलंबित मागण्यांसाठी रिक्षाचालकांच्या वतीने शुक्रवारी धडक मोर्चा काढण्यात आला.

नवी मुंबई : आरटीओ कार्यालयाला दलालांच्या विळख्यातून मुक्त करून, रिक्षाचालकांची पिळवणूक थांबवण्याच्या मागणीसह प्रलंबित मागण्यांसाठी रिक्षाचालकांच्या वतीने शुक्रवारी धडक मोर्चा काढण्यात आला. नवी मुंबई रिक्षा टॅक्सी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने त्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आरटीओ अधिका-यांना मागण्यांचे निवेदन देत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.रिक्षाचे परमिट सर्वांसाठी खुले केल्याने शहरातील रिक्षांच्या संख्येत वाढत आहे. अशातच बोगस रिक्षांचेही प्रमाण अधिक असल्याने गरजू रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. यामुळे प्रामाणिक रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्याकरिता बोगस रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मागणी रिक्षा संघटनांची आहे. त्याशिवाय ओला-उबेरबाबत आरटीओने ठोस भूमिका घेण्याचीही त्यांची मागणी आहे. अशा अनेक मागण्यांकडे आरटीओ दुर्लक्ष करत असून, रिक्षाचालकांचीच पिळवणूक करत असल्याचा संघटनांचा आरोप आहे. एखाद्या कामासाठी आरटीओ कार्यालयात गेलेल्या रिक्षाचालकाची चिरीमीरीसाठी अडवणूक केली जाते. मात्र, तेच काम दलालामार्फत गेल्यास बिनाचौकशीचे केले जाते. अशा प्रवृत्तीच्या अधिकाºयांवर कारवाईच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.समितीचे संस्थापक मारुती कोंडे, अध्यक्ष भरत नाईक, सरचिटणीस सुनील बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली एपीएमसी येथील आरटीओ कार्यालयावर हा मोर्चा निघाला. त्यामध्ये दोनशेहून अधिक रिक्षा चालकांनी सहभाग घेतला होता. या वेळी स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, दशरथ भगत यांनीही मोर्चात सहभागी होऊन पाठिंबा दर्शवला.बैठकीतही तोडगा नाहीमोर्चाच्या शेवटी आंदोलकांचे शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी गेले असता, आरटीओ अधिकारी संजय डोळे कार्यालयात उपस्थित नव्हते. यामुळे त्यांनी सहायक अधिकाºयांना मागणीचे निवेदन दिले; परंतु चर्चेसाठी वरिष्ठ अधिकारी नसल्याने त्यांनी केवळ निवेदन स्वीकारण्याचे काम केले. यामुळे रिक्षाचालकांच्या मागण्यांच्या अनुषंगाने मोर्चा काढूनही त्यावर चर्चा होऊ न शकल्याची नाराजी मारुती कोंडे यांनी व्यक्त केली.शिवसेनेने फिरवली पाठरिक्षाचालकांच्या मागण्यांच्या अनुषंगाने कृती समितीमार्फत काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये शिवसेना पुरस्कृत संघटना वगळता इतर सर्व संघटनांनी सहभाग घेतला होता. परिवहनमंत्री शिवसेनेचे असल्याने त्यांनी याच मुद्द्यांवरून स्वतंत्र मोर्चा काढून, श्रेय लाटण्याच्या हालचाली चालवल्याची चर्चा रिक्षाचालकांमध्ये आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई