शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

टेकडीचे सपाटीकरण : उलवेतील ब्लास्टिंगमुळे रहिवाशांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 02:39 IST

नवी मुंबई विमानतळाच्या कामासाठी उलवा टेकडीचे सपाटीकरणाचे काम सुरू आहे. टेकडीच्या सपाटीकरणासाठी मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग घडविले जात असून स्थानिकांच्या जीवावर हे ब्लास्टिंग बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वैभव गायकरपनवेल : नवी मुंबई विमानतळाच्या कामासाठी उलवा टेकडीचे सपाटीकरणाचे काम सुरू आहे. टेकडीच्या सपाटीकरणासाठी मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग घडविले जात असून स्थानिकांच्या जीवावर हे ब्लास्टिंग बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शनिवारी ब्लास्टिंगमुळे उडालेल्या दगडांमुळे येथील सिद्धार्थनगरमधील रहिवासी व ब्लास्टिंगचे काम करणारे अभियंते, कामगार गंभीर जखमी झाल्याने या गावांचा पुनर्वसनाचा मुद्दा पुढे आला आहे.ब्लास्टिंगमुळे प्रकल्पबाधित गावातल्या घरांना मोठे हादरे बसत आहेत. वारंवार ब्लास्टिंगमुळे येथील ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून सिडकोने प्रथम ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. चार दिवसांपूर्वी वरचा ओवळा ग्रामस्थांनी सिडकोच्या निषेधार्थ ब्लास्टिंगच्या ठिकाणी मोर्चा काढून काम बंद पाडले होते. घरांना बसणाºया रोजच्या हादºयांमुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते. यावेळी स्वत: सिडको अधिकाºयांनी यासंदर्भात बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. ग्रामस्थांनी काढलेल्या मोर्चात आमदार बाळाराम पाटील यांनी लोकांचे जीव गेल्यावर तुम्हाला जाग येणार का? अशा स्पष्ट शब्दात सिडको अधिकाºयांना सुनावले. आमदार बाळाराम पाटील यांच्या याच शब्दाची आठवण शनिवारी घडलेला घटनेने झाली. घटनेत पाच कामगार व सिद्धार्थनगरमधील रहिवासी जखमी झाले असून याप्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.विमानतळबाधित गावांमध्ये दहा गावांचा समावेश आहे. चिंचपाडा, कोपर,कोल्ही, वाघिवली, वरचा ओवळा, वाघिवली वाडा, गणेशपुरी, तरघर, कोंबडभुजे, उलवा अशी या दहा गावांची नावे आहेत. याठिकाणी सुरू असलेल्या ब्लास्टिंगच्या विरोधात या गावातील रहिवाशांनी वारंवार मोर्चे, आंदोलने, कामबंद आंदोलनाची भूमिका घेतली आहे. सिडकोला अनेक निवेदने देऊन देखील सिडको प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.आमदार बाळाराम पाटील यांनी याठिकाणी घडविल्या जाणाºया स्फोटामुळे स्थानिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असल्याचे स्पष्ट शब्दात सिडको अधिकाºयांना सांगितले होते. लोकांचे जीव गेल्यावर सिडको अधिकाºयांना जाग येईल का? अशी संतप्त भावना आमदार पाटील यांनी व्यक्त केली होती. मात्र, शनिवारी झालेल्या ब्लास्टिंगच्या घटनेत आमदार बाळाराम पाटील यांच्या शब्दाची आठवण नक्कीच सिडको अधिकाºयांना झाली असेल. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले, मात्र सुदैवाने अनेकांच्या जीविताचा धोका टळला.दहा गाव संघर्ष समितीची आधी पुनर्वसनची मागणीविमानतळबाधित दहा गावांच्या मिळून स्थापन झालेल्या संघर्ष समितीने शनिवारी घडलेल्या अपघाताची गंभीर दखल घेतली आहे. प्रकल्पबाधितांच्या प्रलंबित मागण्या सोडवून आधी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करा त्यानंतर काम सुरु करा, अशी भूमिका नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्पबाधित दहा गाव संघर्ष समितीने घेतली आहे. सोमवारी सिडकोला कामबंद ठेवण्यासाठी निवेदन देणार आहोत. सिडकोने चार दिवसांत यासंदर्भात निर्णय न घेतल्यास मोठे आंदोलन पुकारणार असल्याचे समितीचे अध्यक्ष नाथा पाटील यांनी सांगितले.आमदार बच्चू कडूंचे मुख्यमंत्र्यांना पत्र -प्रकल्पग्रस्तांचे योग्य ते पुनर्वसन व पुन:स्थापना न करता विमानतळ प्रकल्पपूर्व कामे सुरू करण्यात आलेली आहेत. सदर कामे करताना गावाशेजारी जीवघेणे स्फोट घडवून आणले जात असल्याने स्थानिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत विमानतळाची सर्व कामे थांबविण्याची विनंती अचलपूर विधानसभेचे आमदार व प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी २९ डिसेंबर २0१७ रोजी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली होती. मात्र या पत्राची कोणतीच दखल राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आली नाही.