शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

नालेसफाईनंतर गाळ रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 23:30 IST

कळंबोलीतील रहिवाशांमध्ये नाराजी : सिडकोचे दुर्लक्ष; ठेकेदाराकडून कामात कुचराई

कळंबोली : वसाहतीचे पनवेल महापालिकेकडे हस्तांतर करण्याआधी सिडकोने काही कामे हाती घेतली आहेत. कळंबोली वसाहतीत दहा कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी डागडुजी केली जात आहे. पावसाळी गटारांमधील गाळ-कचरा, माती काढण्यात आली आहे; परंतु गेल्या काही दिवसांपासून काढलेला गाळ रस्त्यावरच पडून आहेत. त्यामुळे ही माती पुन्हा गटारांमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ती सुकल्यामुळे सर्वत्र धूळ उडत आहे. सिडकोचे ठेकेदारावर नियंत्रण नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

कळंबोली वसाहतीला अनेक समस्यांनी वेढले आहे. अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पथदिवे बंदावस्थेत आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापनाची समस्या अद्याप निकाली निघालेली नाही. अशा अनेक अडचणीत कळंबोलीतील रहिवासी सध्या राहत आहेत. त्यातच इतर वसाहतीप्रमाणे कळंबोलीसुद्धा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार काही छोटी-मोठी कामे सिडको करून देणार आहे. त्यासाठी दहा कोटी रुपयांची निविदा काढून एजन्सी नेमण्यात आली आहे.

वसाहतीमध्ये पावसाळी पाणी वाहून नेणारे नाले बंदिस्त करण्यात येणार आहेत. त्यांची मान्सूनपूर्व साफसफाई व्यवस्थित होत नसल्याने ते सर्वच ठिकाणी तुंबत असल्याचे उघड झाले आहे. सिडकोने ही सर्व गटारे माती, चिखल, डेब्रिज, कचरा, प्लास्टिकमुक्त करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने कामाला सुरुवातही केली आहे.ठेकेदाराने सध्या कळंबोली टपाल कार्यालय ते अय्यप्पा मंदिर रस्त्यालगतच्या गटारांची सफाई करण्याचे काम हाती घेतले आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात माती-चिखल, गाळ काढण्यात आला असून रस्त्यावर त्याचे ढीग साचले आहेत. याशिवाय एनएमएमटी बस डेपो ते एसबीआय चौकापर्यंत नाले सफाई करण्यात आली आहे. त्यामधील गाळही उचलण्यात न आल्याने अनेक दिवसांपासून रस्त्यालगत पडून आहे. के एल टाइपच्या घरांसमोर सध्या मातीचे ढिगारे दिसू लागले आहेत.

काही ठिकाणी बाहेर काढण्यात आलेला चिखल सुकून गेला आहे. वाहनांची सततची वर्दळीमुळे ही धूळ उडत असून, त्याचा पादचारी आणि आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास होत आहे. तसेच बाहेर काढण्यात आलेली माती पुन्हा गटारांमध्ये जात आहे. माती आणि चिखल बाहेर काढल्यानंतर तो त्वरित उचलावा, अशी मागणी रहिवासी राजेंद्र बनकर यांनी केली आहे.

मद्याच्या बाटल्यांचा खचकळंबोली वसाहतीमध्ये पावसाळी गटारांमधील साफसफाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गटारे साफ करीत असताना माती, प्लास्टिक व इतर वस्तू निघतातच; परंतु सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेच्या समोरील गटारामध्ये मोठ्या प्रमाणात बीअर आणि दारूच्या बाटल्या निघाल्या.त्याचा ढीग पदपथावर पडून आहे. शाळेच्या परिसरात रात्रीच्या वेळी मद्यपी मद्यप्राशन करून बाटल्या गटारात फेकून देत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी कळंबोली विकास समितीचे अध्यक्ष प्रशांत रणवरे यांनी केली आहे.