शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

नालेसफाईनंतर गाळ रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 23:30 IST

कळंबोलीतील रहिवाशांमध्ये नाराजी : सिडकोचे दुर्लक्ष; ठेकेदाराकडून कामात कुचराई

कळंबोली : वसाहतीचे पनवेल महापालिकेकडे हस्तांतर करण्याआधी सिडकोने काही कामे हाती घेतली आहेत. कळंबोली वसाहतीत दहा कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी डागडुजी केली जात आहे. पावसाळी गटारांमधील गाळ-कचरा, माती काढण्यात आली आहे; परंतु गेल्या काही दिवसांपासून काढलेला गाळ रस्त्यावरच पडून आहेत. त्यामुळे ही माती पुन्हा गटारांमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ती सुकल्यामुळे सर्वत्र धूळ उडत आहे. सिडकोचे ठेकेदारावर नियंत्रण नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

कळंबोली वसाहतीला अनेक समस्यांनी वेढले आहे. अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पथदिवे बंदावस्थेत आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापनाची समस्या अद्याप निकाली निघालेली नाही. अशा अनेक अडचणीत कळंबोलीतील रहिवासी सध्या राहत आहेत. त्यातच इतर वसाहतीप्रमाणे कळंबोलीसुद्धा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार काही छोटी-मोठी कामे सिडको करून देणार आहे. त्यासाठी दहा कोटी रुपयांची निविदा काढून एजन्सी नेमण्यात आली आहे.

वसाहतीमध्ये पावसाळी पाणी वाहून नेणारे नाले बंदिस्त करण्यात येणार आहेत. त्यांची मान्सूनपूर्व साफसफाई व्यवस्थित होत नसल्याने ते सर्वच ठिकाणी तुंबत असल्याचे उघड झाले आहे. सिडकोने ही सर्व गटारे माती, चिखल, डेब्रिज, कचरा, प्लास्टिकमुक्त करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने कामाला सुरुवातही केली आहे.ठेकेदाराने सध्या कळंबोली टपाल कार्यालय ते अय्यप्पा मंदिर रस्त्यालगतच्या गटारांची सफाई करण्याचे काम हाती घेतले आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात माती-चिखल, गाळ काढण्यात आला असून रस्त्यावर त्याचे ढीग साचले आहेत. याशिवाय एनएमएमटी बस डेपो ते एसबीआय चौकापर्यंत नाले सफाई करण्यात आली आहे. त्यामधील गाळही उचलण्यात न आल्याने अनेक दिवसांपासून रस्त्यालगत पडून आहे. के एल टाइपच्या घरांसमोर सध्या मातीचे ढिगारे दिसू लागले आहेत.

काही ठिकाणी बाहेर काढण्यात आलेला चिखल सुकून गेला आहे. वाहनांची सततची वर्दळीमुळे ही धूळ उडत असून, त्याचा पादचारी आणि आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास होत आहे. तसेच बाहेर काढण्यात आलेली माती पुन्हा गटारांमध्ये जात आहे. माती आणि चिखल बाहेर काढल्यानंतर तो त्वरित उचलावा, अशी मागणी रहिवासी राजेंद्र बनकर यांनी केली आहे.

मद्याच्या बाटल्यांचा खचकळंबोली वसाहतीमध्ये पावसाळी गटारांमधील साफसफाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गटारे साफ करीत असताना माती, प्लास्टिक व इतर वस्तू निघतातच; परंतु सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेच्या समोरील गटारामध्ये मोठ्या प्रमाणात बीअर आणि दारूच्या बाटल्या निघाल्या.त्याचा ढीग पदपथावर पडून आहे. शाळेच्या परिसरात रात्रीच्या वेळी मद्यपी मद्यप्राशन करून बाटल्या गटारात फेकून देत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी कळंबोली विकास समितीचे अध्यक्ष प्रशांत रणवरे यांनी केली आहे.