शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

MIDC मधील रस्ता रूंदीकरणादरम्यान वाचविलेल्या वृक्षांची कत्तल

By नामदेव मोरे | Updated: March 10, 2024 14:53 IST

नेरूळ एलपी जवळील प्रकार : चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी

नामदेव मोरे

नवी मुंबई : ठाणे बेलापूर औद्योगीक वसाहतीमध्ये नेरूळ एलपी येथे रस्ता रूंदीकरण करताना वाचविलेल्या वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे.पदपथाला लागून असलेले वृक्ष तोडल्यामुळे परिसरातील नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी चौकशी करून संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.            

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. करावे येथे पाणथळ तलावाचे अस्तीत्व धोक्यात आले आहे. खारफुटीची कत्तल करण्यात आली आहे. दुसरीकडे एमआयडीसीमध्येही बेसुमार वृक्षतोड केली जात आहे. नेरूळ एलपी पुलाच्या समोर महानगरपालिकेने पदपथाला लागून वृक्षलागवड केली होती. अनेक वृक्ष २० ते २५ फुट उंच वाढले होते. महामार्गाला लागून असलेल्या जोड रस्त्याच्या रूंदीकरणाच्या दरम्यानही या वृक्षांचे अस्तीत्व कायम राहील याकडे लक्ष दिले होते. तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी रूंदीकरणादरम्यान येथील वृक्षतुटणार नाहीत याकडे लक्ष दिले होते. परंतु काही दिवसांपुर्वी अचानक येथील वृक्ष तोडण्यात आले आहेत. या ठिकाणी सुरू होत असलेल्या नवीन कंपनीच्या बांधकामाचा दर्शनी भाग दिसावा यासाठी वृक्षतोड केली जात असल्याची शंका स्थानीक रहिवाशांनी व्यक्त केली आहे.          

या वृक्षतोडीविषयी माजी परिवहन समिती सभापती चंद्रकांत आगोंडे यांनीही आक्षेप घेतला आहे. महानगरपालिका आयुक्त, एमआयडीसी प्रशासनाकडे याविषयी लेखी तक्रार नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे. वेळ पडल्यास न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही दिला आहे. पदपथाला लागून असलेले वृक्ष कोणत्याही स्थितीमध्ये तोडण्यात येवू नये अशी भुमीका त्यांनी घेतली आहे. वृक्ष तोड करण्यासाठी परवानगी दिलीच कशी. वृक्ष तोड करण्यापुर्वी स्थानीक नागरिकांकडून सुचना व हरकती मागविणे आवश्यक होते. तोडण्यात येणाऱ्या वृक्षांवर सुचना लावणे आवश्यक होते. परंतु अशा प्रकारच्या सुचना कधीच लावण्यात आल्या नव्हत्या. परवानगी न घेता वृक्ष तोड केली असेल तर तत्काळ गुन्हे दाखल करावे. परवानगी दिली असेल तर त्याचीही चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता भुखंडामधील वृक्ष तोडण्यासाठी परवानगी दिली आहे. बाहेरील वृक्षतोडीसाठी परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

महानगरपालिकेनेही दखल घ्यावीनेरूळ एलपी येथे केलेली वृक्षतोड एमआयडीसीच्या क्षेत्रामधील असली तरी वृक्षलागवड महानगरपालिकेने केली होती. यामुळे महानगरपालिका आयुक्तांनीही याविषयी दखल घ्यावी व संबंधीतांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

महानगरपालिकेने रस्ता रूंदीकरण करताना वृक्षतोड होणार नाही याची काळजी घेतली होती. ते वृक्ष अचानक तोडण्यात आले आहेत. पर्यावरणाच्या ऱ्हासास कोण जबाबदार आहे याची चौकशी करावी व संबंधीतांवर कडक कारवाई करावी. प्रशासनाने कारवाई केली नाही तर न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.चंद्रकांत आगोंडे, माजी परिवहन समिती सभापती,नवी मुंबई महानगरपालिका

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईforestजंगल