शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

सहा वाहनांची एकमेकांना धडक , सायन-पनवेल महामार्गावर विचित्र अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:48 IST

सायन-पनवेल महामार्गावर वाशी येथील उड्डाणपुलावर बुधवारी रात्री विचित्र अपघात घडला. मुंबईहून पनवेलकडे जाणारी सहा वाहने एकमेकांवर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर वाशी येथील उड्डाणपुलावर बुधवारी रात्री विचित्र अपघात घडला. मुंबईहून पनवेलकडे जाणारी सहा वाहने एकमेकांवर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना वाशीतील एमजीएम आणि नेरूळ येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या स्कॉर्पिओ चालकाचे नाव हर्षद पाटील (३४) असे असून तो उरणमधील नवीन शेवा येथे राहणारा आहे. बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हर्षद मुंबईहून स्कॉर्पिओ घेऊन उरण येथे जात होता. सायन-पनवेल मार्गावर वाशी येथील उड्डाणपुलावर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या हर्षदचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे पुढे जाणाऱ्या वॅगनरला त्याच्या स्कॉर्पिओची जोरदार धडक बसली. या जोरदार धडकेत वॅगनार कार थेट महामार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणाºया रस्त्यावर गेली, तर धडक देणारी स्कॉर्पिओ जागेवरच बंद पडली. स्कॉर्पिओ अचानक बंद पडल्याने मागून येणारी स्कोडा, गॅस टँकर, डंपर आणि आयटेन गाडीची एकमेकांना धडक बसली. या अपघातात डंपर चालकासह स्कोडा आणि आयटेन कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचे वृत्त समजताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघातातील जखमी पल्लवी नायर, दीपक चव्हाण आणि मोहम्मद शाबीर शेख या तिघांना नेरु ळ येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये तर आयटेनमधील अनुरागकुमार सक्सेना (५८), रेखा सक्सेना (५६) आणि डंपर चालक मेहजबीन नुर मोहम्मद शेख या तिघांना वाशीतील एमजीएम रु ग्णालयात दाखल केले. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या स्कॉर्पिओ चालकाला पोलिसांनी ताब्यात घेवून त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.महामार्गावर वाहतूककोंडीया अपघातात वॅगनार, स्कॉर्पिओ, स्कोडा, आयटेन या कारसह गॅसचा टँकर आणि डंपर या वाहनांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. टँकर आणि डंपरच्या मध्ये स्कोडा अडकल्याने तिचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे. या अपघातामुळे मध्यरात्रीच्या सुमारास वाशी उड्डाणपुलावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे दोन्ही मार्गावर काही काळ वाहतूककोंडी झाली. वाहतूक पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करीत अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्याने सकाळपर्यंत वाहतूक सुरळीत झाली.

टॅग्स :AccidentअपघातNavi Mumbaiनवी मुंबई