शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

मुंबईहून चाकरमान्यांसाठी उन्हाळ्यात विशेष सहा गाड्या; अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी कोकण रेल्वेचा निर्णय

By कमलाकर कांबळे | Updated: April 25, 2024 20:16 IST

कोकण रेल्वेने उन्हाळी हंगामासाठी विविध मार्गांवर विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. त्यानंतरसुद्धा अनेक मार्गावर प्रवाशांची गर्दी होत आहे.

नवी मुंबई : कोकण रेल्वेने उन्हाळी हंगामासाठी विविध मार्गांवर विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. त्यानंतरसुद्धा अनेक मार्गावर प्रवाशांची गर्दी होत आहे. ही बाब लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनल ते थिविमदरम्यान विशेष गाड्यांच्या आणखी १२ फेऱ्या चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. या गाड्या आठवड्यातून तीन दिवस चालविल्या जाणार आहेत.यात मुंबईहून पहिली गाडी २६ एप्रिल रोजी तर थिविम स्थानकातून २७ एप्रिलला धावणार आहे. या गाडीच्या एकूण सहा फेऱ्या असणार आहेत.

उन्हाळी सुट्टीसाठी कोकण रेल्वेने यापूर्वी साप्ताहिक तसेच द्विसाप्ताहिक गाड्या सुरू केल्या आहेत. विविध मार्गांवर धावणाऱ्या या विशेष गाड्यांचा प्रवाशांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे असले तरी काही मार्गावर प्रतीक्षा यादी वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनल ते थिविम दरम्यान २६ एप्रिल ते ५ मे यादरम्यान विशेष गाडीच्या १२ फेऱ्या चालविल्या जाणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनल - थिविम (०१०१७) ही गाडी प्रत्येक शुक्रवार, रविवार आणि मंगळवार अशी आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे.

त्याचप्रमाणे थिविम - लोकमान्य टिळक टर्मिनल (०१०१८) ही विशेष गाडी प्रत्येक शनिवार, सोमवार आणि बुधवार अशी आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. ही गाडी सायंकाळी ४:३५ वाजता थिविम स्थानकातून सुटेल तर दुसऱ्या दिवशी पहाटे ३:४५ वाजता ती लोकमान्य टिळक स्थानकावर पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकावर थांबेल, असे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.