शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

सायन-पनवेल मार्ग पुन्हा खड्ड्यांत, कामाच्या दर्जावर संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 23:27 IST

सायन-पनवेल मार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. उरण फाटा, शिरवणे तसेच एल.पी. पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने त्याठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावत आहे. यामुळे दोन्ही दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागत आहेत.सायन-पनवेल मार्गावर सातत्याने जागोजागी खड्डे पडत आहेत. रस्त्याच्या काही ठिकाणचे काँक्रीटीकरण वगळता नव्याने बनवण्यात आलेल्या पुलांचाही त्यात समावेश आहे. तर प्रतिवर्षी पावसाळ्यात सायन-पनवेल मार्गावरील पुलांची खड्ड्यांमुळे चाळण होत आहे. त्यात उरण फाटा येथील पूल, नेरुळचा एल.पी. पूल व शिरवणेतील पुलाचा समावेश आहे. या पुलांवरील खड्ड्यांमुळे त्याठिकाणी अनेक अपघात देखील झाले असून, त्यामध्ये कित्येकांना प्राण देखील गमवावे लागले आहेत. यानंतर खड्ड्यांचा मुद्दा ऐरणीवर आल्यावर तात्पुरत्या स्वरूपात डागडुजीची कामे केली जातात. मात्र त्यानंतर काही दिवसात पुन्हा सर्वत्र खड्डे पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यामुळे मागील दोन वर्षात सायन-पनवेल मार्गावर झालेल्या कामांच्या दर्जाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर याचा फटका छोट्या-मोठ्या वाहनमालकांना बसत असून, प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.मुंबई-पुण्याला जोडणारा सायन-पनवेल मार्ग महत्त्वपूर्ण असल्याने त्यावर शेकडो वाहनांची रहदारी सुरू असते. त्यात अत्यावश्यक सुविधांचा भाग असलेल्या रुग्णवाहिकांचाही समावेश आहे. मात्र सातत्याने होणाºया वाहतूककोंडीत रुग्णवाहिका देखील अडकून पडत असल्याने, त्यामधील रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाइकांना मनस्ताप होत आहे. तर याच वाहतूककोंडीमुळे एखाद्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यास उशीर झाल्यास त्याची प्राणज्योत मावळण्याचीही भीती व्यक्त होत आहे. वाशी खाडीपुलावर देखील खड्डे पडले असून त्यामध्ये वाहने अडकून नुकसान होत आहे. सोमवारी सकाळी मुंबईकडे जाणाºया एका सिमेंट मिक्सर वाहनाचे एक्सेल या खड्ड्यात आपटून तुटले. त्यामुळे रहदारीसाठी एक लेन बंद झाल्याने वाहतूककोंडी झाली होती. सुदैवाने चालकाने वाहनावर नियंत्रण मिळवल्याने भीषण अपघात झाला नाही. परंतु सायन-पनवेल मार्गावर सातत्याने जागोजागी खड्डे पडत असतानाही, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास प्रशासन हात आखडता घेत असल्याचा आरोप होत आहे.