शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

सायन-पनवेल मार्ग पुन्हा खड्ड्यांत, कामाच्या दर्जावर संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 23:27 IST

सायन-पनवेल मार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. उरण फाटा, शिरवणे तसेच एल.पी. पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने त्याठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावत आहे. यामुळे दोन्ही दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागत आहेत.सायन-पनवेल मार्गावर सातत्याने जागोजागी खड्डे पडत आहेत. रस्त्याच्या काही ठिकाणचे काँक्रीटीकरण वगळता नव्याने बनवण्यात आलेल्या पुलांचाही त्यात समावेश आहे. तर प्रतिवर्षी पावसाळ्यात सायन-पनवेल मार्गावरील पुलांची खड्ड्यांमुळे चाळण होत आहे. त्यात उरण फाटा येथील पूल, नेरुळचा एल.पी. पूल व शिरवणेतील पुलाचा समावेश आहे. या पुलांवरील खड्ड्यांमुळे त्याठिकाणी अनेक अपघात देखील झाले असून, त्यामध्ये कित्येकांना प्राण देखील गमवावे लागले आहेत. यानंतर खड्ड्यांचा मुद्दा ऐरणीवर आल्यावर तात्पुरत्या स्वरूपात डागडुजीची कामे केली जातात. मात्र त्यानंतर काही दिवसात पुन्हा सर्वत्र खड्डे पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यामुळे मागील दोन वर्षात सायन-पनवेल मार्गावर झालेल्या कामांच्या दर्जाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर याचा फटका छोट्या-मोठ्या वाहनमालकांना बसत असून, प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.मुंबई-पुण्याला जोडणारा सायन-पनवेल मार्ग महत्त्वपूर्ण असल्याने त्यावर शेकडो वाहनांची रहदारी सुरू असते. त्यात अत्यावश्यक सुविधांचा भाग असलेल्या रुग्णवाहिकांचाही समावेश आहे. मात्र सातत्याने होणाºया वाहतूककोंडीत रुग्णवाहिका देखील अडकून पडत असल्याने, त्यामधील रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाइकांना मनस्ताप होत आहे. तर याच वाहतूककोंडीमुळे एखाद्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यास उशीर झाल्यास त्याची प्राणज्योत मावळण्याचीही भीती व्यक्त होत आहे. वाशी खाडीपुलावर देखील खड्डे पडले असून त्यामध्ये वाहने अडकून नुकसान होत आहे. सोमवारी सकाळी मुंबईकडे जाणाºया एका सिमेंट मिक्सर वाहनाचे एक्सेल या खड्ड्यात आपटून तुटले. त्यामुळे रहदारीसाठी एक लेन बंद झाल्याने वाहतूककोंडी झाली होती. सुदैवाने चालकाने वाहनावर नियंत्रण मिळवल्याने भीषण अपघात झाला नाही. परंतु सायन-पनवेल मार्गावर सातत्याने जागोजागी खड्डे पडत असतानाही, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास प्रशासन हात आखडता घेत असल्याचा आरोप होत आहे.