शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

सायन-पनवेल महामार्ग जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 02:15 IST

सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सायन-पनवेल महामार्ग जलमय झाला होता.

पनवेल : सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सायन-पनवेल महामार्ग जलमय झाला होता. महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. विशेष म्हणजे पावसाच्या पाण्याचा निचरा करणारे कल्वर्ट अनेक ठिकाणी बंद असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मान्सूनपूर्व नियोजन न झाल्याने महामार्गावर पाणी साचल्याचा आरोप वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.सायन-पनवेल मार्गाच्या रुंदीकरणासाठी १२00 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र त्यानंतरसुध्दा या महामार्गावर वाहनधारकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महामार्गावर कळंबोली, कामोठे दरम्यान सोमवारी तीनही लेन पाण्याखाली गेल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. पाण्यातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात अनेक वाहने रस्त्यावरच बंद पडल्याचे प्रकार घडले. तसेच महार्गावरील खारघर, हिरानंदानी, बेलपाडा, उरण फाटा या ठिकाणीही पाणी साचले होते. पहिल्याच पावसात महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अगोदरच वाहनधारकांची कसरत होत आहे. यातच मागील दोन दिवसांपासून पावसाने झोडपल्याने महामार्गाची चाळण झाली आहे. तुर्भे उड्डाणपुलाजवळ मोठा खड्डा पडला आहे. त्यात पावसाचे पाणी साचून त्याचे मोठ्या डबक्यात रूपांतर झाले आहे. वाहनधारकांना याचा अंदाज येत नसल्याने त्यात वाहने आपटून लहान-मोठे अपघात होत आहे. दरम्यान, सोमवारी तुर्भे उड्डाणपुलासह सानपाडा पुलावरही वाहतूककोंडीचा फटका बसला. मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने याठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.सायन-पनवेल महामार्गावरील बहुतांशी पथदिवे बंद आहेत. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. मागील दीड वर्षात या महामार्गावर जवळपास २५0 अपघात घडले असून, त्यात १00 पेक्षा अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यासंदर्भात ठोस उपाययोजना आखण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.रेल्वेस्थानकाच्या भुयारात पाणीसानपाडा रेल्वेस्थानकात देखील पाणी साचल्याने वाहतुकीच्या मार्गात अडथळा निर्माण झाला होता. प्रतिवर्षी या भुयारी मार्गात खड्डे पडून त्यात पाणी साचते. अशीच परिस्थिती ठाणे-बेलापूर मार्गावर महापे येथे नव्याने बांधलेल्या भुयारी मार्गात देखील निर्माण होत आहे. तर कोपरखैरणे, घणसोली रेल्वेस्थानकाचे पादचारी भुयारी मार्ग देखील पाण्याखाली गेल्याने प्रवाशांची गैरसोय झाली होती.महत्त्वाचे रस्ते पाण्याखालीवाशी-कोपरखैरणे मार्गावर वाशी सेक्टर ९, तुर्भे, मॅफ्को मार्केट, सानपाडा यासह अनेक सखल भागातील मार्गावर एक ते दोन फुटापर्यंत पाणी साचले होते. रस्त्यालगतच्या नाल्यातून पाण्याचा निचरा न झाल्याने ते रस्त्यावरून वाहत होते. यामुळे बहुतांश ठिकाणी वाहतूक ठप्प होवून वाहने बंद पडण्याचे प्रकार घडत होते. काही ठिकाणी सफाई कामगारांनी धाव घेवून तुंबलेली गटारे मोकळी करून पाण्याचा मार्ग मोकळा केला, तर दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर सर्वच ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आली.खांदा वसाहतीत स्थानिक नगरसेवकांनी यंदा नालेसफाईकरिता पाठपुरावा केला. त्यामुळे नाल्यातील गाळ काढून पावसाच्या पाण्याला मार्ग करून देण्यात आला. तसेच ज्या ठिकाणी पाणी साचत होते तिथे गटारांची कामे करण्यात आली. त्यामुळे या ठिकाणी गेले दोन दिवस पाणी साचले नाही. सिडकोने चांगले काम केले असल्याची प्रतिक्रि या नगरसेवक संजय भोपी यांनी ‘लोकमत’ला दिली.