शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

सायन-पनवेल बनला समस्यांचा महामार्ग, वाहतूककोंडीमुळे प्रवासी त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 02:22 IST

या महामार्गावर शनिवारी सायंकाळी ५ वाजता उरण फाटा ते तुर्भे वाहतूक चौकीपर्यंत जवळपास पाच किलोमीटरपर्यंत चक्काजाम झाले होते.

- नामदेव मोरेनवी मुंबई : वाहतूककोंडी सोडविण्यासाठी शासनाने दहा वर्षांपूर्वी सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण सुरू केले. खारघर टोलनाका सुरू करूनही पाच वर्षे पूर्ण झाली असून, रुंदीकरणाची सर्व कामे मात्र अद्याप पूर्ण झालेली नाहीत. रखडलेल्या कामांमुळे वारंवार वाहतूककोंडी व अपघात होत असून, प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.महामार्गावर शनिवारी सायंकाळी ५ वाजता उरण फाटा ते तुर्भे वाहतूक चौकीपर्यंत जवळपास पाच किलोमीटरपर्यंत चक्काजाम झाले होते. उरण फाटा येथे उड्डाणपुलाच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे वारंवार वाहतूककोंडी होत आहे. जवळपास एक महिना हे काम सुरू राहणार असल्यामुळे वाहतुकीची समस्या कायम राहणार असल्याचेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. शनिवार व रविवार दोन दिवस सुट्ट्या असल्यामुळे पुणे व कोकणाकडे जाणाऱ्या नागरिकांमुळे वाहनांची संख्या वाढली आहे. सायंकाळी महामार्गावरील वाहनांची संख्या वाढल्यामुळे पुण्याकडे जाणाºया मार्गावर वाहतूककोंडी झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या मार्गावरून प्रवास करणाºया नागरिकांना २००८ पासूनच या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वाहतूककोंडी व अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने जवळपास १२०० कोटी रुपये खर्च करून महामार्गाचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला. सानपाडा, उरण फाटा येथे उड्डाणपूल बांधला आहे. वाशी, शिरवणे येथेही छोटे पूल बांधले आहेत. आवश्यक त्या ठिकाणी स्कायवॉक व भुयारी पादचारी मार्गांचे नियोजन करण्यात आले होते. महामार्गाचे ८० टक्के काम सुरू झाल्याचा दावा करून ६ जानेवारी २०१५ मध्ये खारघरमध्ये टोलनाका सुरू करण्यात आला.महामार्गावर टोलनाका सुरू होऊन पाच वर्षे पूर्ण झाली आहेत; परंतु या काळात शिल्लक राहिलेली २० टक्के कामे पूर्ण झालेली नाहीत. महामार्गावरील विद्युत दिवे बहुतांश वेळा बंदच असतात. अंधार असल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. नेरुळ, उरणफाटा, खारघर, कळंबोलीमध्ये महामार्गावर पादचारी भुयारी मार्ग तयार केले आहेत; परंतु अद्याप या भुयारी मार्गांचा वापर सुरू केलेला नाही. भुयारी मार्गाची रचना चुकली असल्याचा दावा प्रवासी करू लागले आहेत. पावसाळ्यामध्ये महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असल्यामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीव गमवावा लागत होता. यामुळे खड्डे पडणाºया ठिकाणी काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला.काँक्रीटीकरणाचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही. सद्यस्थितीमध्ये उरण फाटा पुलावरील कॉँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे प्रतिदिन या बेलापूर ते नेरुळ दरम्यान वाहतूककोंडी होत असून, ही समस्या अजून किती दिवस सुरू राहणार, असा प्रश्न प्रवासी विचारू लागले आहेत.उरण फाटा येथे दुरुस्तीचे काम सुरू आहे. महामार्गावर वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. दोन दिवस सुट्ट्यांमुळे शनिवारी पुणे व कोकणाकडे जाणाºया वाहनांची संख्या वाढल्यामुळे नेरुळ ते जुईनगर दरम्यान वाहतूककोंडी झाली होती.- किसन गायकवाड, वाहतूक पोलीस निरीक्षकसायन-पनवेल महामार्गावरील समस्या1उरण फाटा उड्डाणपुलाची दुरुस्ती सुरू असल्यामुळे सकाळी व सायंकाळी वाहतूककोंडी होत आहे.2महामार्गावर अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्यामुळे अपघात होत आहेत.3नेरुळ, उरणफाटा, खारघर, कळंबोली परिसरातील पादचारी भुयारी मार्गांचे काम अर्धवट.4तुर्भे पोलीस स्टेशनजवळील स्कायवॉकचे काम अपूर्णच.5महामार्गाच्या दोन्ही बाजूने पावसाळी पाणी जाण्यासाठी गटार नाही.6रोडच्या दोन्ही बाजूला साचणारे मातीचे ढीग साफ करणारी यंत्रणा नसल्यामुळे धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे.7अवजड वाहतूकदार नियमांचे उल्लंघन करत असल्याने वाहतूककोंडीमध्ये भर पडत आहे.8वाशी, सानपाडा, नेरुळ, सीबीडीसह कळंबोलीमध्ये रात्री खासगी बसचालकांमुळे चक्काजाम होत आहे.9महामार्गावर एसटी बसची प्रतीक्षा करणाºया प्रवाशांसाठी निवारा शेडची कमतरता. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकMumbaiमुंबईNavi Mumbaiनवी मुंबई