शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

सायन-पनवेल बनला समस्यांचा महामार्ग, वाहतूककोंडीमुळे प्रवासी त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 02:22 IST

या महामार्गावर शनिवारी सायंकाळी ५ वाजता उरण फाटा ते तुर्भे वाहतूक चौकीपर्यंत जवळपास पाच किलोमीटरपर्यंत चक्काजाम झाले होते.

- नामदेव मोरेनवी मुंबई : वाहतूककोंडी सोडविण्यासाठी शासनाने दहा वर्षांपूर्वी सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण सुरू केले. खारघर टोलनाका सुरू करूनही पाच वर्षे पूर्ण झाली असून, रुंदीकरणाची सर्व कामे मात्र अद्याप पूर्ण झालेली नाहीत. रखडलेल्या कामांमुळे वारंवार वाहतूककोंडी व अपघात होत असून, प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.महामार्गावर शनिवारी सायंकाळी ५ वाजता उरण फाटा ते तुर्भे वाहतूक चौकीपर्यंत जवळपास पाच किलोमीटरपर्यंत चक्काजाम झाले होते. उरण फाटा येथे उड्डाणपुलाच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे वारंवार वाहतूककोंडी होत आहे. जवळपास एक महिना हे काम सुरू राहणार असल्यामुळे वाहतुकीची समस्या कायम राहणार असल्याचेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. शनिवार व रविवार दोन दिवस सुट्ट्या असल्यामुळे पुणे व कोकणाकडे जाणाऱ्या नागरिकांमुळे वाहनांची संख्या वाढली आहे. सायंकाळी महामार्गावरील वाहनांची संख्या वाढल्यामुळे पुण्याकडे जाणाºया मार्गावर वाहतूककोंडी झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या मार्गावरून प्रवास करणाºया नागरिकांना २००८ पासूनच या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वाहतूककोंडी व अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने जवळपास १२०० कोटी रुपये खर्च करून महामार्गाचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला. सानपाडा, उरण फाटा येथे उड्डाणपूल बांधला आहे. वाशी, शिरवणे येथेही छोटे पूल बांधले आहेत. आवश्यक त्या ठिकाणी स्कायवॉक व भुयारी पादचारी मार्गांचे नियोजन करण्यात आले होते. महामार्गाचे ८० टक्के काम सुरू झाल्याचा दावा करून ६ जानेवारी २०१५ मध्ये खारघरमध्ये टोलनाका सुरू करण्यात आला.महामार्गावर टोलनाका सुरू होऊन पाच वर्षे पूर्ण झाली आहेत; परंतु या काळात शिल्लक राहिलेली २० टक्के कामे पूर्ण झालेली नाहीत. महामार्गावरील विद्युत दिवे बहुतांश वेळा बंदच असतात. अंधार असल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. नेरुळ, उरणफाटा, खारघर, कळंबोलीमध्ये महामार्गावर पादचारी भुयारी मार्ग तयार केले आहेत; परंतु अद्याप या भुयारी मार्गांचा वापर सुरू केलेला नाही. भुयारी मार्गाची रचना चुकली असल्याचा दावा प्रवासी करू लागले आहेत. पावसाळ्यामध्ये महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असल्यामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीव गमवावा लागत होता. यामुळे खड्डे पडणाºया ठिकाणी काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला.काँक्रीटीकरणाचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही. सद्यस्थितीमध्ये उरण फाटा पुलावरील कॉँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे प्रतिदिन या बेलापूर ते नेरुळ दरम्यान वाहतूककोंडी होत असून, ही समस्या अजून किती दिवस सुरू राहणार, असा प्रश्न प्रवासी विचारू लागले आहेत.उरण फाटा येथे दुरुस्तीचे काम सुरू आहे. महामार्गावर वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. दोन दिवस सुट्ट्यांमुळे शनिवारी पुणे व कोकणाकडे जाणाºया वाहनांची संख्या वाढल्यामुळे नेरुळ ते जुईनगर दरम्यान वाहतूककोंडी झाली होती.- किसन गायकवाड, वाहतूक पोलीस निरीक्षकसायन-पनवेल महामार्गावरील समस्या1उरण फाटा उड्डाणपुलाची दुरुस्ती सुरू असल्यामुळे सकाळी व सायंकाळी वाहतूककोंडी होत आहे.2महामार्गावर अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्यामुळे अपघात होत आहेत.3नेरुळ, उरणफाटा, खारघर, कळंबोली परिसरातील पादचारी भुयारी मार्गांचे काम अर्धवट.4तुर्भे पोलीस स्टेशनजवळील स्कायवॉकचे काम अपूर्णच.5महामार्गाच्या दोन्ही बाजूने पावसाळी पाणी जाण्यासाठी गटार नाही.6रोडच्या दोन्ही बाजूला साचणारे मातीचे ढीग साफ करणारी यंत्रणा नसल्यामुळे धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे.7अवजड वाहतूकदार नियमांचे उल्लंघन करत असल्याने वाहतूककोंडीमध्ये भर पडत आहे.8वाशी, सानपाडा, नेरुळ, सीबीडीसह कळंबोलीमध्ये रात्री खासगी बसचालकांमुळे चक्काजाम होत आहे.9महामार्गावर एसटी बसची प्रतीक्षा करणाºया प्रवाशांसाठी निवारा शेडची कमतरता. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकMumbaiमुंबईNavi Mumbaiनवी मुंबई