शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

सायन-पनवेल बनला समस्यांचा महामार्ग, वाहतूककोंडीमुळे प्रवासी त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 02:22 IST

या महामार्गावर शनिवारी सायंकाळी ५ वाजता उरण फाटा ते तुर्भे वाहतूक चौकीपर्यंत जवळपास पाच किलोमीटरपर्यंत चक्काजाम झाले होते.

- नामदेव मोरेनवी मुंबई : वाहतूककोंडी सोडविण्यासाठी शासनाने दहा वर्षांपूर्वी सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण सुरू केले. खारघर टोलनाका सुरू करूनही पाच वर्षे पूर्ण झाली असून, रुंदीकरणाची सर्व कामे मात्र अद्याप पूर्ण झालेली नाहीत. रखडलेल्या कामांमुळे वारंवार वाहतूककोंडी व अपघात होत असून, प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.महामार्गावर शनिवारी सायंकाळी ५ वाजता उरण फाटा ते तुर्भे वाहतूक चौकीपर्यंत जवळपास पाच किलोमीटरपर्यंत चक्काजाम झाले होते. उरण फाटा येथे उड्डाणपुलाच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे वारंवार वाहतूककोंडी होत आहे. जवळपास एक महिना हे काम सुरू राहणार असल्यामुळे वाहतुकीची समस्या कायम राहणार असल्याचेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. शनिवार व रविवार दोन दिवस सुट्ट्या असल्यामुळे पुणे व कोकणाकडे जाणाऱ्या नागरिकांमुळे वाहनांची संख्या वाढली आहे. सायंकाळी महामार्गावरील वाहनांची संख्या वाढल्यामुळे पुण्याकडे जाणाºया मार्गावर वाहतूककोंडी झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या मार्गावरून प्रवास करणाºया नागरिकांना २००८ पासूनच या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वाहतूककोंडी व अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने जवळपास १२०० कोटी रुपये खर्च करून महामार्गाचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला. सानपाडा, उरण फाटा येथे उड्डाणपूल बांधला आहे. वाशी, शिरवणे येथेही छोटे पूल बांधले आहेत. आवश्यक त्या ठिकाणी स्कायवॉक व भुयारी पादचारी मार्गांचे नियोजन करण्यात आले होते. महामार्गाचे ८० टक्के काम सुरू झाल्याचा दावा करून ६ जानेवारी २०१५ मध्ये खारघरमध्ये टोलनाका सुरू करण्यात आला.महामार्गावर टोलनाका सुरू होऊन पाच वर्षे पूर्ण झाली आहेत; परंतु या काळात शिल्लक राहिलेली २० टक्के कामे पूर्ण झालेली नाहीत. महामार्गावरील विद्युत दिवे बहुतांश वेळा बंदच असतात. अंधार असल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. नेरुळ, उरणफाटा, खारघर, कळंबोलीमध्ये महामार्गावर पादचारी भुयारी मार्ग तयार केले आहेत; परंतु अद्याप या भुयारी मार्गांचा वापर सुरू केलेला नाही. भुयारी मार्गाची रचना चुकली असल्याचा दावा प्रवासी करू लागले आहेत. पावसाळ्यामध्ये महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असल्यामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीव गमवावा लागत होता. यामुळे खड्डे पडणाºया ठिकाणी काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला.काँक्रीटीकरणाचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही. सद्यस्थितीमध्ये उरण फाटा पुलावरील कॉँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे प्रतिदिन या बेलापूर ते नेरुळ दरम्यान वाहतूककोंडी होत असून, ही समस्या अजून किती दिवस सुरू राहणार, असा प्रश्न प्रवासी विचारू लागले आहेत.उरण फाटा येथे दुरुस्तीचे काम सुरू आहे. महामार्गावर वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. दोन दिवस सुट्ट्यांमुळे शनिवारी पुणे व कोकणाकडे जाणाºया वाहनांची संख्या वाढल्यामुळे नेरुळ ते जुईनगर दरम्यान वाहतूककोंडी झाली होती.- किसन गायकवाड, वाहतूक पोलीस निरीक्षकसायन-पनवेल महामार्गावरील समस्या1उरण फाटा उड्डाणपुलाची दुरुस्ती सुरू असल्यामुळे सकाळी व सायंकाळी वाहतूककोंडी होत आहे.2महामार्गावर अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्यामुळे अपघात होत आहेत.3नेरुळ, उरणफाटा, खारघर, कळंबोली परिसरातील पादचारी भुयारी मार्गांचे काम अर्धवट.4तुर्भे पोलीस स्टेशनजवळील स्कायवॉकचे काम अपूर्णच.5महामार्गाच्या दोन्ही बाजूने पावसाळी पाणी जाण्यासाठी गटार नाही.6रोडच्या दोन्ही बाजूला साचणारे मातीचे ढीग साफ करणारी यंत्रणा नसल्यामुळे धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे.7अवजड वाहतूकदार नियमांचे उल्लंघन करत असल्याने वाहतूककोंडीमध्ये भर पडत आहे.8वाशी, सानपाडा, नेरुळ, सीबीडीसह कळंबोलीमध्ये रात्री खासगी बसचालकांमुळे चक्काजाम होत आहे.9महामार्गावर एसटी बसची प्रतीक्षा करणाºया प्रवाशांसाठी निवारा शेडची कमतरता. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकMumbaiमुंबईNavi Mumbaiनवी मुंबई