शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

सामान्यांनी दिवाळीची खरेदी आताच करायची काय?, डाळी महाग; पुढील काही महिन्यांत आणखी भाववाढीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 12:31 IST

जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

नवी मुंबई : डाळी, कडधान्य हा सर्वसामान्य नागरिकांचा रोजचा आधार. भाजीपाला रोज खरेदी करणे शक्य होत नसल्यामुळे डाळी, कडधान्यावरच अनेकांना जीवन जगावे लागते. पण आता यांच्या किमतीही प्रचंड वाढत आहेत. पुढील काही महिन्यात यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे दिवाळीची खरेदी आताच करायची काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. रोज भाजीपाला खरेदी करणे सामान्य नागरिकांना परवडत नाही. एवढा पैसाही त्यांच्याजवळ नसतो. यामुळे डाळी, कडधान्याला सर्वाधिक पसंती दिली जाते. परंतु मागील काही महिन्यांपासून या वस्तूंचे दर वाढत आहेत. होलसेल मार्केटमध्ये तूरडाळ ९५ ते १४५ रुपये किलो झाली आहे. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर १५० ते १८० रुपयांवर पोहोचले आहेत. होलसेल मार्केटमध्ये उडीदडाळ ८० ते १२५ व मूगडाळ ८० ते १२८ रुपये किलो झाली आहे. डाळीही प्रतिकिलो दोनशेच्या घरात जाऊ लागल्यामुळे आता खायचे काय असा प्रश्नही काम करणाऱ्यांना पडला आहे. 

...म्हणून वाढले दरदेशात कडधान्याचे उत्पादन कमी झाले आहे. मागणीच्या तुलनेमध्ये आवक होत नसल्यामुळे दर वाढू लागले आहेत. कडधान्याची आयातही पुरेशा प्रमाणात होत नसून या सर्वांमुळे दर वाढले आहेत. 

कमी पावसामुळे वाढणार दर यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला. एक महिना सलग कोसळल्यानंतर पुन्हा गायब झाला आहे. यामुळे योग्य प्रमाणात पेरण्या झालेल्या नाहीत. पुरेसे उत्पादन होण्याची शक्यता नसल्यामुळे यापुढे दर अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई