शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

सामान्यांनी दिवाळीची खरेदी आताच करायची काय?, डाळी महाग; पुढील काही महिन्यांत आणखी भाववाढीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 12:31 IST

जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

नवी मुंबई : डाळी, कडधान्य हा सर्वसामान्य नागरिकांचा रोजचा आधार. भाजीपाला रोज खरेदी करणे शक्य होत नसल्यामुळे डाळी, कडधान्यावरच अनेकांना जीवन जगावे लागते. पण आता यांच्या किमतीही प्रचंड वाढत आहेत. पुढील काही महिन्यात यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे दिवाळीची खरेदी आताच करायची काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. रोज भाजीपाला खरेदी करणे सामान्य नागरिकांना परवडत नाही. एवढा पैसाही त्यांच्याजवळ नसतो. यामुळे डाळी, कडधान्याला सर्वाधिक पसंती दिली जाते. परंतु मागील काही महिन्यांपासून या वस्तूंचे दर वाढत आहेत. होलसेल मार्केटमध्ये तूरडाळ ९५ ते १४५ रुपये किलो झाली आहे. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर १५० ते १८० रुपयांवर पोहोचले आहेत. होलसेल मार्केटमध्ये उडीदडाळ ८० ते १२५ व मूगडाळ ८० ते १२८ रुपये किलो झाली आहे. डाळीही प्रतिकिलो दोनशेच्या घरात जाऊ लागल्यामुळे आता खायचे काय असा प्रश्नही काम करणाऱ्यांना पडला आहे. 

...म्हणून वाढले दरदेशात कडधान्याचे उत्पादन कमी झाले आहे. मागणीच्या तुलनेमध्ये आवक होत नसल्यामुळे दर वाढू लागले आहेत. कडधान्याची आयातही पुरेशा प्रमाणात होत नसून या सर्वांमुळे दर वाढले आहेत. 

कमी पावसामुळे वाढणार दर यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला. एक महिना सलग कोसळल्यानंतर पुन्हा गायब झाला आहे. यामुळे योग्य प्रमाणात पेरण्या झालेल्या नाहीत. पुरेसे उत्पादन होण्याची शक्यता नसल्यामुळे यापुढे दर अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई