शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! नव-यासोबत शॉपिंग करणा-या महिलेचे नवी मुंबईतून फिल्मी स्टाईलने अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 15:41 IST

नव-यासोबत शॉपिंगसाठी घराबाहेर पडलेल्या एका 23 वर्षीय महिलेचे नवी मुंबईतून दिवसाढवळया अपहरण करण्यात आले.

ठळक मुद्दे महिलेला खेचून गाडीत बसवले व गाडी सानपाडयाच्या दिशेने निघून गेली असे मोहम्मद इक्बाल मोहम्मद उमर चौधरीने (28) सांगितले.पोलिसांनी अपहरणामागे पीडित महिलेच्या कुटुंबावर संशय व्यक्त केला आहे.

नवी मुंबई - नव-यासोबत शॉपिंगसाठी घराबाहेर पडलेल्या एका 23 वर्षीय महिलेचे नवी मुंबईतून दिवसाढवळया अपहरण करण्यात आले. रविवारी संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास  ही धक्कादायक घटना घडली. चित्रपटात दाखवतात त्या प्रमाणे फिल्मी स्टाईलने हे अपहरण नाटय घडले. दोघे नवरा-बायको शॉपिंगसाठी इन ऑरबिट मॉलमध्ये गेले होते. तिथून बाहेर पडल्यानंतर दोघे रघुलीला मॉलच्या दिशेने निघाले. रस्त्यातून दोघे बोलत चालले असताना एक कार वेगात तिथे आली. त्यातून चौघे उतरले व त्यांनी नव-याला मारहाण सुरु केली. 

त्याचवेळी त्यांनी महिलेला खेचून गाडीत बसवले व गाडी सानपाडयाच्या दिशेने निघून गेली असे मोहम्मद इक्बाल मोहम्मद उमर चौधरीने (28) सांगितले. तू आमच्या बहिणीला घेऊन मुंबईला आलास, तिला सोडून दे, आम्ही तिला परत घेऊन चाललो आहोत असे मारहाण करणारे बोलत होते असे पती उमर चौधरीने सांगितले. रेश्मा अशोक कुमार कुनील (23) असे पीडित महिलेचे नाव आहे. उमर चौधरीने वाशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. 

पोलिसांनी अपहरणामागे पीडित महिलेच्या कुटुंबावर संशय व्यक्त केला आहे. रेश्मा मुळची मंगळुरुची असून तिथून पळून आल्यानंतर तिने मुंबईत येऊन मोहम्मद इक्बाल उमर चौधरी बरोबर विवाह केला. कुटुंबियांच्या इच्छेच्या विरोधात हे लग्न झाल्याने पोलिसांनी महिलेच्या कुटुंबावर संशय व्यक्त केला आहे. सातवर्षांपूर्वी रेश्मा आणि मोहम्मद इक्बालची फेसबुकवरुन ओळख झाली. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. यावर्षी जुलै महिन्यात दोघांनी गुप्तपणे लग्न केले. 

चौधरी नवी मुंबई येथील एका कंपनीत सहाय्यक इंजिनिअर म्हणून नोकरीला आहे. रेश्मा कायद्याचे शिक्षण घेत होती. कुटुंबाकडून विरोध होणार हे माहित असल्याने दोघांनी लग्नाबद्दल गुप्तता बाळगली होती. चौधरी रेश्माला भेटण्यासाठी अनेकदा मंगळुरुला जायचा. मागच्यावर्षीपर्यंत चौधरी कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. जुलै 2017 मध्ये चौधरी मंगळुरुला जाऊन रेश्माला मुंबईत घेऊन आला. रेश्माने इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर 15 जुलैला चेंबूरमध्ये त्यांचा निकाह झाला. त्यानंतर वांद्रे कोर्टात त्यांनी लग्नाची रीतसर नोंदणी केली.