शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

धक्कादायक! नव-यासोबत शॉपिंग करणा-या महिलेचे नवी मुंबईतून फिल्मी स्टाईलने अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 15:41 IST

नव-यासोबत शॉपिंगसाठी घराबाहेर पडलेल्या एका 23 वर्षीय महिलेचे नवी मुंबईतून दिवसाढवळया अपहरण करण्यात आले.

ठळक मुद्दे महिलेला खेचून गाडीत बसवले व गाडी सानपाडयाच्या दिशेने निघून गेली असे मोहम्मद इक्बाल मोहम्मद उमर चौधरीने (28) सांगितले.पोलिसांनी अपहरणामागे पीडित महिलेच्या कुटुंबावर संशय व्यक्त केला आहे.

नवी मुंबई - नव-यासोबत शॉपिंगसाठी घराबाहेर पडलेल्या एका 23 वर्षीय महिलेचे नवी मुंबईतून दिवसाढवळया अपहरण करण्यात आले. रविवारी संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास  ही धक्कादायक घटना घडली. चित्रपटात दाखवतात त्या प्रमाणे फिल्मी स्टाईलने हे अपहरण नाटय घडले. दोघे नवरा-बायको शॉपिंगसाठी इन ऑरबिट मॉलमध्ये गेले होते. तिथून बाहेर पडल्यानंतर दोघे रघुलीला मॉलच्या दिशेने निघाले. रस्त्यातून दोघे बोलत चालले असताना एक कार वेगात तिथे आली. त्यातून चौघे उतरले व त्यांनी नव-याला मारहाण सुरु केली. 

त्याचवेळी त्यांनी महिलेला खेचून गाडीत बसवले व गाडी सानपाडयाच्या दिशेने निघून गेली असे मोहम्मद इक्बाल मोहम्मद उमर चौधरीने (28) सांगितले. तू आमच्या बहिणीला घेऊन मुंबईला आलास, तिला सोडून दे, आम्ही तिला परत घेऊन चाललो आहोत असे मारहाण करणारे बोलत होते असे पती उमर चौधरीने सांगितले. रेश्मा अशोक कुमार कुनील (23) असे पीडित महिलेचे नाव आहे. उमर चौधरीने वाशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. 

पोलिसांनी अपहरणामागे पीडित महिलेच्या कुटुंबावर संशय व्यक्त केला आहे. रेश्मा मुळची मंगळुरुची असून तिथून पळून आल्यानंतर तिने मुंबईत येऊन मोहम्मद इक्बाल उमर चौधरी बरोबर विवाह केला. कुटुंबियांच्या इच्छेच्या विरोधात हे लग्न झाल्याने पोलिसांनी महिलेच्या कुटुंबावर संशय व्यक्त केला आहे. सातवर्षांपूर्वी रेश्मा आणि मोहम्मद इक्बालची फेसबुकवरुन ओळख झाली. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. यावर्षी जुलै महिन्यात दोघांनी गुप्तपणे लग्न केले. 

चौधरी नवी मुंबई येथील एका कंपनीत सहाय्यक इंजिनिअर म्हणून नोकरीला आहे. रेश्मा कायद्याचे शिक्षण घेत होती. कुटुंबाकडून विरोध होणार हे माहित असल्याने दोघांनी लग्नाबद्दल गुप्तता बाळगली होती. चौधरी रेश्माला भेटण्यासाठी अनेकदा मंगळुरुला जायचा. मागच्यावर्षीपर्यंत चौधरी कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. जुलै 2017 मध्ये चौधरी मंगळुरुला जाऊन रेश्माला मुंबईत घेऊन आला. रेश्माने इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर 15 जुलैला चेंबूरमध्ये त्यांचा निकाह झाला. त्यानंतर वांद्रे कोर्टात त्यांनी लग्नाची रीतसर नोंदणी केली.