शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शिवसेना - भाजपा आक्रमक

By admin | Updated: December 11, 2015 01:34 IST

राष्ट्रवादी काँगे्रसने बहुमताच्या जोरावर स्मार्ट सिटी स्पर्धेसाठीचा प्रस्ताव फेटाळला. देशात पहिला क्रमांक मिळविण्याची शक्यता असताना सत्ताधाऱ्यांच्या मनमानीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँगे्रसने बहुमताच्या जोरावर स्मार्ट सिटी स्पर्धेसाठीचा प्रस्ताव फेटाळला. देशात पहिला क्रमांक मिळविण्याची शक्यता असताना सत्ताधाऱ्यांच्या मनमानीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. शिवसेना - भाजपाने वाशीत मोर्चा काढून याचा निषेध केला असून, १८ डिसेंबरला नवी मुंबई बंदचे आयोजन केले आहे. स्मार्ट सिटी स्पर्धेमध्ये नवी मुंबईचा सहभाग झालाच पाहिजे यासाठी शिवसेना व भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसच्या मनमानीचा निषेध करण्यासाठी वाशीतील शिवाजी चौकात विद्यार्थ्यांचा निषेध मोर्चा काढण्यात आला. चार महिने प्रत्येक शाळेमध्ये कार्यक्रम घेण्यात आले. साडेतीन लाख विद्यार्थी व नागरिकांनी पालिकेकडे स्मार्ट सिटीविषयी संकल्पना पाठविल्या होत्या. चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी त्यांच्या संकल्पना कागदावर उतरविल्या होत्या. परंतु राष्ट्रवादी काँगे्रसने या प्रस्तावास विरोध केल्यामुळे या विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे. एनसीपीवाले काका आम्हाला का फसवलेत अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी स्मार्ट सिटीचा आग्रह धरला. शिवसेना नेत्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यप्रणालीवर सडकून टीका केली. शिवसेनेचे उपनेते व पालिकेचे माजी आयुक्त विजय नाहटा यांनीही सत्ताधाऱ्यांना शहराचा विकास नको आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांनी स्पर्धेतून शहरास बाद केले आहे. प्रशासनावर विनाकारण ठपका ठेवला जात असून शिवसेना व भाजपा सरकार आयुक्तांसह प्रशासनासोबत असल्याचे सांगितले. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनीही राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे शहरवासीयांची फसवणूक झाली आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी स्मार्ट सिटीसाठी अभिप्राय नोंदविणाऱ्या ४ लाख नागरिकांचा अपमान केला आहे. शहरवासीयांना स्मार्ट सिटी हवी आहे. ही संकल्पना आता घराघरामध्ये पोहचली आहे. सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यासाठी १८ डिसेंबरला नवी मुंबई बंदचे आयोजन केले असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. किशोर पाटकर यांनी राष्ट्रवादीला स्मार्ट सिटीचा प्रस्ताव समजलाच नसल्याचा टोला मारला. यावेळी बेलापूर संपर्क प्रमुख विठ्ठल मोरे, नगरसेवक नामदेव भगत, शिवराम पाटील, एम. के. मढवी, द्वारकानाथ भोईर, सरोज पाटील, मनोज हळदणकर, सोमनाथ वास्कर, रामचंद्र घरत, संपत शेवाळे, दीपक पवार, काशिनाथ पवार, कमलताई पाटील, विनया मढवी, मेघाली राऊत, प्रशांत पाटील, सुमित्र कडू, समीर बागवान, बबनदादा पाटील, महेश कोठीवाले व इतर पदाधिकारी उपस्थित होते. >>> शहरवासीयांना हवी स्मार्ट सिटी स्मार्ट सिटीसाठी घेण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये नवी मुंबईला देशात तिसरा व राज्यात प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळाले. देशातील ९८ शहरांच्या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक मिळविण्यासाठी पालिका प्रशासनासह नागरिकांनीही कंबर कसली होती. चार महिन्यांत ३ लाख ८७ हजार नागरिकांनी स्मार्ट सिटी कशी असावी याविषयी लेखी सूचना पाठविल्या होत्या. शाळेतील मुलांनीही चित्रकला स्पर्धेपासून वॉकेथॉनपर्यंत सहभाग घेतला होता. राष्ट्रवादीने प्रस्ताव फेटाळल्यामुळे शहरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असून देशात पहिला क्रमांक मिळविण्याची संधी हुकवल्याची खंत व्यक्त केली आहे. एनएमएमसीला मिळालेली संधी स्मार्ट सिटी म्हणून स्वीकारून चांगल्या पद्धतीने या शहराचा विकास करता येईल. विकास म्हणजे केवळ ड्रेनेज, रस्ते नव्हेत याच्याही पुढे भविष्यातील नवी मुंबईच्या गरजा लक्षात घेऊन रचनात्मक कामातून हे साध्य करता येईल आणि स्मार्ट सिटी या परियोजनेतून ते साकारही करता येईल.- संजय पालकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सानपाडा