शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे सुशोभीकरण व्हावे, पनवेल महापालिका आयुक्तांना दिले निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 02:28 IST

पनवेल शहर महानगरपालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका आहे. विशेष म्हणजे, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडाची विशेष ओळख आहे.

पनवेल : पनवेल शहर महानगरपालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका आहे. विशेष म्हणजे, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडाची विशेष ओळख आहे. या रायगडाचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहरात महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याची मागणी लक्षवेधीद्वारे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केली आहे. मात्र, ही लक्षवेधी महासभेत विचारात घेतली नसल्याने म्हात्रे यांनी आयुक्त डॉ. शिंदे यांना सोमवारी पत्र देऊन यासंदर्भात गांभीर्याने विचार करण्याची मागणी केली आहे.पनवेल शहरात महाराजांचा अश्वारूढ पुतळा सध्याच्या घडीला दिमाखात उभा आहे. शहरातील वाहतूक शाखेच्या चौकीलगत शिवाजी चौकात हा अश्वारूढ पुतळा १९८६-८७ साली उभारण्यात आला आहे. मात्र, संबंधित ठिकाणाबाबत कोणतेही सूचना फलक या परिसरात लावण्यात आलेले नाहीत. पनवेल शहर हे ऐतिहासिक शहर आहे. यासंदर्भात ठिकठिकाणी तशा प्रकारच्या नोंदी सापडतात. मात्र, अशा वेळी राज्याचे वैभव असलेल्या महाराजांच्या स्मारकाबाबत प्रशासनाची उदासीनता आजवर दिसून आली आहे. या ठिकाणी अद्याप सीसीटीव्ही बसविण्यात आले नाहीत. स्मारकाची योग्य पद्धतीने देखरेख केली नसल्याने या परिसरात घुशी आणि उंदरांचा वावर वाढत चालला आहे. या उद्यानातील फांद्यांची छाटणीही वेळेवर केली जात नसल्याने कोणत्याही क्षणी या ठिकाणची झाडे उन्मळून महाराजांच्या पुतळ्यावरही पडू शकतात. या गंभीर विषयाबाबत नुकत्याच पनवेल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत लक्षवेधी मांडून देखील ती विचारात न घेतल्यामुळे प्रशासनाला महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासंदर्भात गांभीर्य नसल्यामुळेच ही महत्त्वाची लक्षवेधी विचारात घेतली नसल्याचा आरोप म्हात्रे यांनी या वेळी केला.आयुक्तांची भेट घेऊन पुतळ्याच्या सुशोभीकरणासंदर्भात नवीन प्रस्ताव सादर करण्यात आला. सुशोभीकरणासंदर्भात नवीन कलाकृती (डिझाइन) सादर करण्यात आली. या वेळी छत्रपतींचा जीवनपट उलगडणारे चित्र, विद्युत रोषणाई, रायगड जिल्ह्याची प्रतिकृती साकारणारी पाहिजे, आबालवृद्धांसाठी वाचनालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय या ठिकाणी उभारावे, अशा प्रकारचा प्रस्ताव आयुक्तांसमोर सादर केला. टपालनाका परिसरातील महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचेही सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.