शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
3
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
4
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
6
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
7
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
8
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
9
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
10
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
11
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
12
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
13
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
15
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
16
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
17
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
18
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
19
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
20
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम

शिवसेनेचे विजय चौगुलेही भाजपाच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 06:38 IST

मुख्यमंत्र्यांनी दिला राज्यमंत्रीपदाचा दर्जा : कोळी, वडार समाजाच्या मतांवर लक्ष

नवी मुंबई : शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख व पालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना मुख्यमंत्र्यांनी वडार समाज समन्वय समितीचे प्रमुख म्हणून नियुक्त करून राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. यामुळे शिवसेनेत नाराज असलेले चौगुले समर्थकांसह भाजपात जाणार असल्याचे जवळपास निश्चित समजले जात आहे.

सोलापूरमध्ये ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संस्थेच्यावतीने १७ डिसेंबरला राज्यव्यापी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शविली. वडार समाज समन्वय समितीची घोषणा करण्यात आली. समितीच्या प्रमुखपदी विजय चौगुले यांची नियुक्ती केली व समाजाच्या विकासासाठी १०० कोटींची तरतूद केली. राज्यात वडार समाजाची लोकसंख्या ५० लाखपेक्षा जास्त असल्याचा दावा केला जात आहे.

सोलापूर, कोल्हापूर, यवतमाळ, नंदूरबार, उस्मानाबाद, पुणे, ठाणे, नांदेड, बीड, सातारा, लातूर जिल्ह्यात समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. राज्यातील वडार समाजाची मते भाजपाच्या पारड्यात पडावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही खेळी खेळली आहे. समन्वय समितीच्या प्रमुखपदी निवड झाल्यामुळे शिवसेनेत नाराज असलेले चौगुले निवडणुकांपूर्वी भाजपात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.शिवसेनेचे नवी मुंबईमधील जवळपास १५ नगरसेवक घेऊन ते भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोळी महासंघाचे अध्यक्ष व तळवली गावचे रहिवासी रमेश पाटील यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यात आली. राज्यातील १८ लोकसभा व ७२ विधानसभा मतदार संघामध्ये कोळी समाजाचे मतदान लक्षणीय आहे. महासंघाच्या प्रमुखास विधानपरिषदेची संधी दिल्यामुळे लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोळी महासंघाची मते भाजपाला मिळतील असा आशावाद व्यक्त केला जात आहे.महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस व राष्ट्रवादीचे नेते नरेंद्र पाटील यांनाही अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षपद दिले आहे. माथाडी कामगारांची नवी मुंबई, पनवेल, सातारा, पुणे, सांगली, सोलापूरमधील अनेक मतदार संघामध्ये निर्णायक मते आहेत.नवी मुंबईत भाजपाचे पारडे होणार जडरमेश पाटील, नरेंद्र पाटील यांच्यानंतर विजय चौगुलेंवर पदांचा वर्षाव करून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कोळी समाज, माथाडी कामगार व वडार समाजाची मते भाजपाकडे वळविण्याची खेळी खेळली आहे. चौगुले व नरेंद्र पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यास, त्यामुळे नवी मुंबईतही भाजपाचे पारडे जड होणार आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा