शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

शिवसेनेचे विजय चौगुलेही भाजपाच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 06:38 IST

मुख्यमंत्र्यांनी दिला राज्यमंत्रीपदाचा दर्जा : कोळी, वडार समाजाच्या मतांवर लक्ष

नवी मुंबई : शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख व पालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना मुख्यमंत्र्यांनी वडार समाज समन्वय समितीचे प्रमुख म्हणून नियुक्त करून राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. यामुळे शिवसेनेत नाराज असलेले चौगुले समर्थकांसह भाजपात जाणार असल्याचे जवळपास निश्चित समजले जात आहे.

सोलापूरमध्ये ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संस्थेच्यावतीने १७ डिसेंबरला राज्यव्यापी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शविली. वडार समाज समन्वय समितीची घोषणा करण्यात आली. समितीच्या प्रमुखपदी विजय चौगुले यांची नियुक्ती केली व समाजाच्या विकासासाठी १०० कोटींची तरतूद केली. राज्यात वडार समाजाची लोकसंख्या ५० लाखपेक्षा जास्त असल्याचा दावा केला जात आहे.

सोलापूर, कोल्हापूर, यवतमाळ, नंदूरबार, उस्मानाबाद, पुणे, ठाणे, नांदेड, बीड, सातारा, लातूर जिल्ह्यात समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. राज्यातील वडार समाजाची मते भाजपाच्या पारड्यात पडावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही खेळी खेळली आहे. समन्वय समितीच्या प्रमुखपदी निवड झाल्यामुळे शिवसेनेत नाराज असलेले चौगुले निवडणुकांपूर्वी भाजपात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.शिवसेनेचे नवी मुंबईमधील जवळपास १५ नगरसेवक घेऊन ते भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोळी महासंघाचे अध्यक्ष व तळवली गावचे रहिवासी रमेश पाटील यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यात आली. राज्यातील १८ लोकसभा व ७२ विधानसभा मतदार संघामध्ये कोळी समाजाचे मतदान लक्षणीय आहे. महासंघाच्या प्रमुखास विधानपरिषदेची संधी दिल्यामुळे लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोळी महासंघाची मते भाजपाला मिळतील असा आशावाद व्यक्त केला जात आहे.महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस व राष्ट्रवादीचे नेते नरेंद्र पाटील यांनाही अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षपद दिले आहे. माथाडी कामगारांची नवी मुंबई, पनवेल, सातारा, पुणे, सांगली, सोलापूरमधील अनेक मतदार संघामध्ये निर्णायक मते आहेत.नवी मुंबईत भाजपाचे पारडे होणार जडरमेश पाटील, नरेंद्र पाटील यांच्यानंतर विजय चौगुलेंवर पदांचा वर्षाव करून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कोळी समाज, माथाडी कामगार व वडार समाजाची मते भाजपाकडे वळविण्याची खेळी खेळली आहे. चौगुले व नरेंद्र पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यास, त्यामुळे नवी मुंबईतही भाजपाचे पारडे जड होणार आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा