शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

शिवसेनेचे विजय चौगुलेही भाजपाच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 06:38 IST

मुख्यमंत्र्यांनी दिला राज्यमंत्रीपदाचा दर्जा : कोळी, वडार समाजाच्या मतांवर लक्ष

नवी मुंबई : शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख व पालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना मुख्यमंत्र्यांनी वडार समाज समन्वय समितीचे प्रमुख म्हणून नियुक्त करून राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. यामुळे शिवसेनेत नाराज असलेले चौगुले समर्थकांसह भाजपात जाणार असल्याचे जवळपास निश्चित समजले जात आहे.

सोलापूरमध्ये ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संस्थेच्यावतीने १७ डिसेंबरला राज्यव्यापी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शविली. वडार समाज समन्वय समितीची घोषणा करण्यात आली. समितीच्या प्रमुखपदी विजय चौगुले यांची नियुक्ती केली व समाजाच्या विकासासाठी १०० कोटींची तरतूद केली. राज्यात वडार समाजाची लोकसंख्या ५० लाखपेक्षा जास्त असल्याचा दावा केला जात आहे.

सोलापूर, कोल्हापूर, यवतमाळ, नंदूरबार, उस्मानाबाद, पुणे, ठाणे, नांदेड, बीड, सातारा, लातूर जिल्ह्यात समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. राज्यातील वडार समाजाची मते भाजपाच्या पारड्यात पडावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही खेळी खेळली आहे. समन्वय समितीच्या प्रमुखपदी निवड झाल्यामुळे शिवसेनेत नाराज असलेले चौगुले निवडणुकांपूर्वी भाजपात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.शिवसेनेचे नवी मुंबईमधील जवळपास १५ नगरसेवक घेऊन ते भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोळी महासंघाचे अध्यक्ष व तळवली गावचे रहिवासी रमेश पाटील यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यात आली. राज्यातील १८ लोकसभा व ७२ विधानसभा मतदार संघामध्ये कोळी समाजाचे मतदान लक्षणीय आहे. महासंघाच्या प्रमुखास विधानपरिषदेची संधी दिल्यामुळे लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोळी महासंघाची मते भाजपाला मिळतील असा आशावाद व्यक्त केला जात आहे.महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस व राष्ट्रवादीचे नेते नरेंद्र पाटील यांनाही अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षपद दिले आहे. माथाडी कामगारांची नवी मुंबई, पनवेल, सातारा, पुणे, सांगली, सोलापूरमधील अनेक मतदार संघामध्ये निर्णायक मते आहेत.नवी मुंबईत भाजपाचे पारडे होणार जडरमेश पाटील, नरेंद्र पाटील यांच्यानंतर विजय चौगुलेंवर पदांचा वर्षाव करून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कोळी समाज, माथाडी कामगार व वडार समाजाची मते भाजपाकडे वळविण्याची खेळी खेळली आहे. चौगुले व नरेंद्र पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यास, त्यामुळे नवी मुंबईतही भाजपाचे पारडे जड होणार आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा