शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उरण विधानसभेत गद्दारांना धडा शिकविण्यासाठी शिवसेनेचाच शिलेदार पाठवा - शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 23:17 IST

केंद्र व राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे)  वतीने महाराष्ट्रात 'होऊ द्या चर्चा अभियान' प्रत्येक जिल्हा, तालुका व गावागावांमध्ये हाती घेण्यात आले आहे.

मधुकर ठाकूर -

उरण : उरण विधानसभा मतदार संघात सेनेची ताकद असतानाही फक्त खोट्या आश्वासनांच्या बळावर एक अपक्ष उमेदवार निवडून येतो. जनेतेला विकासाचे स्वप्न दाखवतो. मात्र मतदार संघात तर विकास झालेला दिसत नाही.त्यामुळे आता बोलघेवड्या सरकारच्या योजनांची खरी सत्यता कार्यकर्त्यांत होऊ द्या. याच चर्चेतून जनतेपर्यत सत्य माहिती पोहचवा आणि आगामी विधानसभा निवडणुकीत सेनेचे (उध्दव ठाकरे गट ) मनोहर भोईर यांना आमदार म्हणून निवडून आणा असे भावनिक आवाहन शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर यांनी उरण येथे केले.

   केंद्र व राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे)  वतीने महाराष्ट्रात 'होऊ द्या चर्चा अभियान' प्रत्येक जिल्हा, तालुका व गावागावांमध्ये हाती घेण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून उरण विधानसभा मतदार संघासाठी 'होऊ द्या चर्चा अभियान' कार्यक्रम उरण शहरातील श्रीराम मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला होता.उरण शिवसैनिकांच्या या आयोजित मेळाव्याने होऊ द्या चर्चा अभियानाचा शनिवारी शुभारंभ करण्यात आला.

   याप्रसंगी शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. शिवसैनिकांमध्ये विश्वास जागृत करतानाच उरण विधानसभा मतदार संघातील तसेच बोलघेवड्या सरकारच्या विविध फसव्या योजनांचा त्यांनी आपल्या भाषणातून चांगलाच समाचार घेतला.संपुर्ण उरण विधानसभा मतदार संघातील जनतेला सरकार करीत असलेली दिशाभूल नागरिकांच्या समोर आणण्यासाठी आता होऊ द्या चर्चा. गावा गावात सभा घेऊन जनतेत जागृती करा असे आवाहनही अहिर यांनी केले.यावेळी पालघर जिल्हा प्रवक्त्या मनीषा ठाकुर यांनी उरण मतदार संघातील केंद्र व राज्य सरकारच्या अमंलबजावणी न झालेल्या विविध योजनांची पोलखोल करीत दिशाभूल करणाऱ्या योजनांची होऊ दे आता खुली चर्चा असे आवाहन केले.

यावेळी माजी आमदार तथा विद्यमान रायगड जिल्हा प्रमुख मनोहर भोईर म्हणाले की मागील निवडणूकीत युती असताना युती धर्माचे पालन झाले नाही. त्यामुळेच आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु यावेळी आपल्या सोबत काॕग्रेस, राष्ट्रवाद,शेकाप असल्यामुळे  विरोधकांचा ५० हजार मतांनी पराभव करु असा विश्वास व्यक्त त्यांनी व्यक्त केला.त्यामुळे कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून गावागावात होऊ द्या चर्चा सभेतून बोलघेवड्या सरकारचा विरोधात  जनजागृती करा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना  केले.यावेळी रायगड जिल्हा संघटक बबनदादा पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांनीही मार्गदर्शन केले.

याप्रसंगी जिल्हा समन्वयक सावंत , विधानसभा संपर्कप्रमुख (मुंबई) धुरी, विधानसभा संपर्कप्रमुख   महादेव घरत, पनवेल तालुका प्रमुख रघुनाथशेठ पाटील,चौक जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष उत्तमशेठ भोईर, युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहीते, पंचायत समिती सदस्य दिपक ठाकुर,वसंत आगीवले, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका  ममता पाटील, विधानसभा संघटिका  ज्योती म्हात्रे, उरण तालुका संघटिका भावना म्हात्रे, पनवेल तालुका संघटिका मेघा दमडे, तालुका संपर्क संघटिका प्रणिता म्हात्रे, मुमताज भाटकर आणि शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक