शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिळफाटा-कळंबोली १९ किमी रस्ता होणार आठ पदरी, अपघात टाळण्यासाठी नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 00:46 IST

जागेच्या भूसंपादनाची खर्चिक प्रक्रिया टाळून, या रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक जागा कशी मिळवता येईल, यासह कामाच्या एकूणच व्यवहार्यता तपासणीसाठी सल्लागार नेमला जाणार आहे.

मुंबई : वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे चार पदरी शिळफाटा कळंबोली रस्त्याची दैना झाली असून, अपघातांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे हा सुमारे १९ किमी लांबीचा रस्ता सहा किंवा आठ पदरी करण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे.जागेच्या भूसंपादनाची खर्चिक प्रक्रिया टाळून, या रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक जागा कशी मिळवता येईल, यासह कामाच्या एकूणच व्यवहार्यता तपासणीसाठी सल्लागार नेमला जाणार आहे. सध्या हा रस्ता चार पदरी असून, त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये- जा सुरू असते. जेएनपीटीचा विस्तार, या भागातील एसईझेड, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सभोवतालच्या भागांत वाढणाºया निवासी संकुलांमुळे वाहनांची वर्दळ आणखी वाढणार आहे.सध्या अस्तित्वात असलेला चार पदरी रस्ता अत्यंत अरुंद असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्यात प्रवाशांचा वेळ, इंधन आणि पैशांचाही अपव्यय होत असून, प्रदूषणाच्या पातळीतही वाढ होत आहे. त्याशिवाय या रस्त्यावरील अपघातांची संख्याही दिवसागणिक वाढू लागली आहे. ही सर्व कोंडी फोडण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण प्रस्तावित करण्यात आले आहे. या रस्त्याचे काम कोणत्या पद्धतीने करणे किफायतशीर ठरेल, त्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे, या व्यवहार्यतेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सर्व आघाड्यांवर अभ्यास करून सल्लागारांना सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करायचा आहे.ज्या ठिकाणी रुंदीकरणासाठी आवश्यक असलेली जागा अपुरी असेल, तिथे बायपास, सर्व्हिस रोड, इंटरसेक्शनमध्ये बदल, मार्गिकेतला बदल सुचविण्याची जबाबदारीही या सल्लागारांवर असेल.स्थानिक आणि हलक्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका करण्याबाबतचा विचारही सल्लागारांना करावा लागणार आहे. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना या महामार्गावरील अपघात प्रणव क्षेत्र (ब्लँक स्पॉट) शोधून ते टाळण्यासाठी आवश्यक ते उपाय सुचविण्याचे निर्देशही सल्लागारांना दिले जाणार आहेत.हा सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर या कामाची पुढील कामाची दिशा ठरेल, असे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. टोलच्या माध्यमातून या रस्त्याची उभारणी आणि भविष्यातील देखभाल-दुरुस्तीसाठी टोल वसुलीचे तत्त्व स्वीकारले जाणार आहे. तीस वर्षांसाठी टोलवसुलीचे अधिकार दिल्यानंतर, त्याची व्यवहार्यता ठरविण्यासाठी या मार्गावरील संभाव्य वाहतुकीचा आढावा घेत, योग्य त्या टोलवसुलीचे गणित मांडले जाणार आहे. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकNavi Mumbaiनवी मुंबई