शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वाशीत राईट टू सर्व्हिस विषयावर चर्चासत्र: सेवा अधिकार कायद्यामुळे नागरी कामांना गती - स्वाधीन क्षत्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 04:14 IST

प्रशासकीय कामात गतिमानता व पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने राईट टू सर्व्हिस अर्थात सेवा अधिकार कायदा उपयुक्त ठरला आहे. या कायद्याअंतर्गत नागरिकांना घरबसल्या विविध सेवा उपलब्ध होत आहेत.

नवी मुंबई : प्रशासकीय कामात गतिमानता व पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने राईट टू सर्व्हिस अर्थात सेवा अधिकार कायदा उपयुक्त ठरला आहे. या कायद्याअंतर्गत नागरिकांना घरबसल्या विविध सेवा उपलब्ध होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी या सेवेविषयी अधिक जागरूक व साक्षर होणे गरजेचे असल्याचे मत सेवा अधिकार आयोगाचे अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांनी व्यक्त केले.नवी मुंबई फर्स्ट या सामाजिक संस्थेच्या वतीने वाशीत राईट टू सर्व्हिस या विषयावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून क्षत्रिय उपस्थित होते. तसेच सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे-वर्मा, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. व पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. सेवा अधिकार अधिनियमामुळे ना हरकत प्रमाणपत्र, जन्म दाखला, लग्न नोंदणी प्रमाणपत्र, मृत्यूचा दाखला तसेच बांधकामासाठी भोगवटा प्रमाणपत्र आदी जवळपास ४00 सेवा घरबसल्या आॅनलाइनवर मिळविता येणार आहेत. त्यासाठी मोबाइल अ‍ॅपही विकसित करण्यात आला असून कमीत कमी कागदपत्रांच्या आधारे नागरिकांना आपणाला हव्या त्या परवानग्या मिळविता येणार आहे. ही सेवा क्रांतिकारी स्वरूपाची असून यासंदर्भात सर्वसामान्य नागरिकांसह शासकीय स्तरावरही जागरूकता येणे गरजेचे असल्याचे मत स्वाधीन क्षत्रिय यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात व्यक्त केले. तर नागरिकांच्या सोयीसाठी लवकरच सिडकोत एसएएस सर्व्हिस सुरू करणार असल्याची माहिती सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिली. सेवा अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली असून त्यादृष्टीने नागरिकांत जागरूकता आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी दिली. तर पनवेल महापालिका नवीन असल्याने सध्या परवानग्यांसाठी येणारे प्रमाण कमी आहे. तथापि भविष्यात यात होणारी वाढ लक्षात घेवून सेवा अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात सकारात्मक कार्यवाही केली जाईल, असे पनवेलचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.