शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

...तरीही झाली निवड परीक्षा

By admin | Updated: September 14, 2015 03:49 IST

बिगर आदिवासींवर अन्याय करणारा कायदा रद्द करावा व तलाठी भरती प्रक्रियेला स्थगिती यावी, यासाठी बिगर आदिवासी हक्क परिषदेने मोर्चा काढूनही पालघरमध्ये रविवारी तलाठी भरती

हितेन नाईक, पालघरबिगर आदिवासींवर अन्याय करणारा कायदा रद्द करावा व तलाठी भरती प्रक्रियेला स्थगिती यावी, यासाठी बिगर आदिवासी हक्क परिषदेने मोर्चा काढूनही पालघरमध्ये रविवारी तलाठी भरती निवड परीक्षा घेण्यात आल्याने हक्क परिषदेने शासनाविरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. हा मोर्चा अडवून पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतले.राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय स्तरावरील ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, कृषी सहायक, आरोग्य कर्मचारी इ. महत्त्वाची वर्ग ३ व ४ मधील समकक्ष पदे स्थानिकांसाठीच आरक्षित करणारा अध्यादेश राज्यपालांनी ९ जून २०१४ रोजी मंजूर केला आहे. या अध्यादेशामुळे पालघर जिल्ह्यातील बिगर आदिवासींवर संकट आले आहे. ७ सप्टेंबरला बिगर आदिवासी हक्क परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करून बिगर आदिवासी समाजाला दिलेले आरक्षण कायम राखण्याची तसेच तलाठी भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु, शासनाने रविवारी पालघरमध्ये तलाठी भरती निवड परीक्षा जाहीर केल्याने बिगर आदिवासी समाजामधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ही भरती उधळून लावण्यात येणार असल्याचे मेसेज व्हॉट्सअ‍ॅप वरून पसरत असल्याने चौदा परीक्षा केंद्रांवर २० अधिकारी, २०० पोलीस इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीसांची तैनात केली होती.