शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

दहा लाख प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Updated: June 28, 2017 03:10 IST

सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण केल्यानंतर वाहतुकीचा प्रश्न सुटण्याऐवजी गंभीर बनला आहे. भुयारीमार्गाची दुरवस्था झाली आहे

नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण केल्यानंतर वाहतुकीचा प्रश्न सुटण्याऐवजी गंभीर बनला आहे. भुयारीमार्गाची दुरवस्था झाली आहे. रोडवर सर्वत्र खड्डे पडले असून, निकृष्ट कामामुळे रोज १० ते १५ अपघात होत आहेत. पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, एसपीटीपीएल व शासनाला शेकडो पत्रे दिली असून तीनही यंत्रणांनी दुरुस्तीचे काम करण्यास नकार दिला आहे. या मार्गावरून रोज प्रवास करणाऱ्या दहा लाख प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली असून, शासकीय यंत्रणा व टोलवेज कंपनीविरोधात असंतोष वाढू लागला आहे. महामार्गावर उरण फाट्याजवळ चंद्रकांत येशी यांच्या मोटारसायकलला रविवारी पहाटे कंटेनरने धडक दिली. या आपघातामध्ये चंद्रकांत येशी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे महामार्गावरील प्रवास व वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाने सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी व अपघात कमी करण्यासाठी करोडो रुपये खर्च करून रोडचे रुंदीकरण केले आहे; परंतु ठेकेदाराने अद्याप काम पूर्ण केलेले नाही. रोडवर खड्डे पडले असून, उरण फाट्यावरील उड्डाणपुलावरील निसरड्या रोडमुळे रोज अपघात होत आहेत. रुंदीकरण केल्यानंतर या मार्गावरील वाहतूककोंडी व अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. उरण फाट्यावरील उड्डाणपुलावर पाऊस सुरू झाल्यापासून रोज किमान दहा अपघात होत आहेत. वाशी गावाजवळ भुयारी मार्गाचे काम अर्धवट राहिले आहे. तुर्भे पोलीस स्टेशनजवळील पादचारी पुलाचे काम अर्धवट राहिले आहे. शिरवणे भुयारी मार्ग व बाजूचा पूर्ण रोड खड्डेमय झाला असून तेथून वाहने चालविणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देणे, अशी स्थिती आहे. उरण फाटा हा तर मृत्यूचा सापळाच बनला आहे. सीबीडी जंक्शनजवळ अद्याप सिग्नल बसविण्यात आलेला नाही. खारघर ते कामोठेपर्यंतची स्थितीही बिकट असून याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नाही. नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी महाराष्ट्र शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, एसपीटीपीएल कंपनी या सर्वांना आतापर्यंत शेकडो पत्रे दिली आहेत. प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. अपघात वाढत आहेत. जीवित व वित्तहानी होत आहे. भविष्यात गंभीर अपघात होऊ शकतात. वाहतूककोंडीमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. भुयारी मार्गांचा काहीही उपयोग होत नाही. महामार्गावरील खड्डे भरण्यात यावेत. आवश्यक ती दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी पत्रांद्वारे केली आहे. पोलीस उपआयुक्त नितीन पवार यांनी टोलवेज कंपनीसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी या सर्वांच्या अनेक वेळा बैठका घेतल्या आहेत; परंतु कोणीही या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाही. अखेर उरण फाट्याजवळील उड्डाणपुलावर खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून काम सुरू आहे.