शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
5
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
6
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
7
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
8
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
9
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
10
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
11
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
12
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
13
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
14
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
15
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
16
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
17
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
18
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
19
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
20
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'

बंद कारखान्यांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; इमारती बनल्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:44 AM

अवैध व्यवसायाला चालना, एमआयडीसीसह महापालिकेचेही दुर्लक्ष

नामदेव मोरे नवी मुंबई : ठाणे - बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील बंद कारखान्यांमुळे अवैध व्यवसायाला चालना मिळू लागली आहे. खंडरात रूपांतर झालेल्या इमारतींमध्ये मद्यपी व अमली पदार्थ ओढणाऱ्यांचे अड्डे तयार झाले आहेत. मद्य तस्करी करणारे, भंगार विक्रेते व गुन्हेगारांनी या इमारतींमध्ये आश्रय घेतल्याचे उघड झाले असून, बंद कारखान्यांमुळे या परिसरातील सुरक्षेला धोका निर्माण होऊ लागला आहे.

औद्योगिक वसाहतीमध्ये बोनसरीमधील बंद कंपनीमध्ये १३ जुलैला तिहेरी हत्याकांड झाले. याठिकाणी अनधिकृतपणे सुरू असलेल्या भंगार गोडावूनमध्ये ही घटना घडली. याच परिसरातील १० जुलैला भूखंड क्रमांक डी ८५ व ८६ वरील बंद कंपनीमध्ये १ कोटी १४ लाख रुपयांचा मद्यसाठा आढळला. सुरक्षारक्षकाच्या मदतीने कंपनीत साठा करण्यात आला होता. तुर्भे एमआयडीसीमध्ये २४ मार्चला साईनाथ ग्रेनाईड या कंपनीमध्ये गुन्हे शाखेने छापा टाकून तब्बल ७३ लाख रुपयांचा मद्यसाठा हस्तगत केला. पाच महिन्यामध्ये तीन गंभीर गुन्हे घडल्यामुळे बंद कारखान्यांमधील अवैध व्यवसायाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिघा ते बेलापूर दरम्यानच्या बंद कारखान्यांची व त्यामध्ये सुरू असलेल्या अवैध व्यवसायाची माहितीही पोलीस, एमआयडीसी व महापालिका प्रशासनालाही नाही. तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या जवळच कांचन इलेक्ट्रिकल कंपनी आहे. १९८३ मध्ये सुरू झालेली कंपनी काही वर्षांपूर्वी बंद झाली आहे. या कंपनीच्या सुरक्षेसाठी काहीही यंत्रणा उपलब्ध नाही. याठिकाणी अमली पदार्थ ओढणारे तरुण दिवसरात्र बसलेले असतात. सोमवारी याठिकाणी जावून पाहणी केली असता एक तरुण अमली पदार्थ ओढत असताना आढळून आला. कंपनीच्या बाहेर पदपथावर भंगार साहित्य ठेवण्यात आले असून भंगार विक्रीचा व्यवसाय सुरू आहे.

इंदिरानगर गणपतीपाडाकडे जाणाºया रोडवर दूध डेरीच्या समोर डी ५२ भूखंडावरील कंपनीही बंद झाली आहे. इमारतीचे बांधकाम अतिधोकादायक स्थितीमध्ये असून तेथे मसाल्याच्या पदार्थांचे पॅकिंग करण्याचा व्यवसाय सुरू आहे. इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. बीमलाही तडे गेले आहेत. बोनसरीमधील तिहेरी हत्याकांड झालेल्या कारखान्यामधील भंगार गोडावून बंद करण्यात आले असले तरी अद्याप तेथील सर्व भंगार साहित्य उचलण्यात आलेले नाही. याच परिसरामध्ये डी ५/२ भूखंडावर अग्रवाल ग्रुपने गॅरेज सुरू केले आहे. परंतु कारखान्यामध्ये ठिकठिकाणी पाणी साठले असून स्वच्छता ठेवली जात नसल्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. अनेक कंपन्यांमध्ये फक्त नावापुरतेच सुरक्षारक्षक ठेवले आहेत. अनेक सुरक्षारक्षक जागेवर नसल्याचे आढळून आले. काही सुरक्षारक्षकांना कंपनीचे नाव, भूखंड क्रमांक व मालकाचे नावही माहिती नाही. बंद कारखान्यांविषयी ठोस भूमिका घेतली नाही तर भविष्यात पुन्हा गंभीर घटना घडल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अमली पदार्थ ओढणाऱ्यांची दहशतइंदिरानगरमधील एव्हरेस्ट इलेक्ट्रिकल कंपनी बंद असून तेथे सुरक्षारक्षक नेमण्यात आला आहे. पण बंद इमारतीमध्ये व समोरील भूखंडावर अमली पदार्थ ओढणारे तरुण बसलेले असतात. त्यांची दहशत असून सुरक्षारक्षकालाही जुमानत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

अनधिकृतपणे गोडाऊन सुरूअनेक बंद कारखान्यांमध्ये अवैधपणे गोडाऊन सुरू आहे. काही ठिकाणी मसाल्याचे पदार्थ ठेवले आहेत. काही कारखान्यांमध्ये भंगाराची दुकाने सुरू केली आहेत. एमआयडीसी प्रशासनाची परवानगी न घेता हे सर्व व्यवसाय सुरू असून त्याकडे कोणीही लक्ष देत नाही.धोकादायक इमारतींची यादी नाही

महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली आहे. परंतु एमआयडीसी परिसरातील बंद कारखान्यांच्या वास्तूही धोकादायक असून त्यांची यादी प्रसिद्ध केलेली नाही. यामुळे अनेकांनी धोकादायक बंद कंपन्यांचा गोडावूनमधून वापर सुरू केला असून त्या इमारती कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.