शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

जागा वाटपाचे घोडे अडले

By admin | Updated: April 5, 2015 01:08 IST

महायुतीच्या पक्षश्रेष्ठींनी युतीचे संकेत दिल्यानंतर शिवसेना - भाजपाच्या स्थानिक नेत्यांत गुरुवारपासून बोलणी सुरू झाली असून आतापर्यंत चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत.

नवी मुंबई : महायुतीच्या पक्षश्रेष्ठींनी युतीचे संकेत दिल्यानंतर शिवसेना - भाजपाच्या स्थानिक नेत्यांत गुरुवारपासून बोलणी सुरू झाली असून आतापर्यंत चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत. गुरुवारच्या चर्चेत ६५ जागांची मागणी करणाऱ्या भाजपाने नमते घेऊन शुक्रवारी रात्री झालेल्या चर्चेप्रसंगी ५० जागांची गळ शिवसेनेस घातली. मात्र, भाजपाने तब्बल १५ जागांची माघार घेऊनही शिवसेना आपल्या काही नेत्यांच्या हट्टासाठी ठरावीक जागा सोडायला तयार नसल्याने युतीत तणाव निर्माण झाला आहे. तर शनिवारी रात्री पुन्हा चर्चेची फेरी होणार असून त्यात एकमत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आम्ही चर्चेला खेळीमेळीच्या वातावरण सुरुवात केली आहे. गुरुवारी दिलेला ६५ जागांचा प्रस्ताव मागे घेऊन नव्याने ५० जागांचा प्रस्ताव दिला. मात्र, तरीही शिवसेना त्यास मानायला तयार नाही. परंतु, मी अन् माझे कुटुंब हे त्या पक्षातील काही नेत्यांचे धोरण युतीच्या चर्चेला मारक असल्याचे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे. शुक्रवारची चर्चा रात्री उशिरा अडीच वाजेपर्यंत चालली. परंतु, प्रत्येक बाबतीत भाजपाने का म्हणून माघार घ्यावी. उलट नवी मुंबईत भाजपाचा एक आमदार आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेपेक्षा आम्ही जास्त प्रभागात आघाडीवर होतो. याची जाणीव त्या पक्षाने लक्षात घ्यायला हवी, असा भाजपाचा दावा आहे.या संदर्भात युतीच्या नेत्यांशी संपर्क साधला असता, महापालिकेत सत्ता आणण्यासाठी शिवसेना - भाजपाने दोघांनी एकेक पाऊल मागे यायला हवे. मात्र, आम्ही एक नव्हे तर दोन-तीन पावले घेतली आहेत. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता हैं, हे शिवसेनेने लक्षात घ्यायला हवे,असे भाजपा आमदार मंदा म्हात्रे लोकमतशी बोलताना म्हणाल्या. मात्र, युती होणारच, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. तर शिवसेना नेते विजय नाहटा आणि विठ्ठल मोरे यांच्याशी संपर्क साधला परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.(खास प्रतिनिधी)च्शिवसेना आपल्या काही नेत्यांच्या हट्टासाठी वाशी सेक्टर - ९ मधील एका जागेसह ऐरोली आणि नेरूळमधील काही जागा सोडण्यास तयास नसल्याचे सूत्रांनी सांगितले. च्भाजपाला ऐरोलीपेक्षा बेलापूर मतदार संघात जास्त जागा हव्या आहेत. यात सुरुवातीला पक्षाने बेलापुरातून ३५ तर ऐरोलीतून ३० जागांची मागणी केली होती. ती कमी करून ते ५० जागांवर आले आहेत.