शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

आक्सा बीचवरील समुद्री भिंत: मुंबई महापालिकेला सीआरझेड उल्लंघनांमध्ये चौकशी करण्याचे निर्देश

By नारायण जाधव | Updated: September 11, 2023 15:28 IST

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाला पुढच्या कारवाईसाठी पर्यावरण विभागाकडे (मुख्यत्वे प्रमुख सचिव, पर्यावरण आणि हवामान बदल) सोपवले आहे.

नवी मुंबई: आक्सा मुंबई समुद्री भिंत प्रकरणात आणखीन एक नवीन वळण आले आहे. राज्य पर्यावरण संचालकांनी बृहद मुंबई महानगर पालिकेला आणि उपनगर जिल्हा जिल्हाधिका-यांना समुद्री भिंतीच्या बांधकामामुळे सीआरझेड उल्लंघन होत असल्याच्या पर्यावरणवाद्यांच्या समुहाच्या तक्रारींची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.  महाराष्ट्र समुद्री बोर्डाने (एमएमबी) मढ, मुंबई येथील आक्सा बीचवरील “महाकाय समुद्री भिंती”च्या बांधकामात पर्यावरण नियमांचा भंग करण्याबद्दल नॅटकनेक्ट फाउंडेशनने मुख्यमंत्र्यांना तक्रार केल्यानंतर या कार्याला गती मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाला पुढच्या कारवाईसाठी पर्यावरण विभागाकडे (मुख्यत्वे प्रमुख सचिव, पर्यावरण आणि हवामान बदल) सोपवले आहे.

नॅटकनेक्टचे संचालक बी एन कुमार यांनी माहिती मिळवण्याच्या अधिकाराच्या (आरटीआय) अंतर्गत निवेदन सादर केले आहे, तसेच त्यांनी आपल्या पहिल्या निवेदनाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या ईमेलवर केलेल्या कारवाईची माहिती मिळवण्यासाठी पाठपुरावा देखील केला आहे. “मागच्या बुधवारी झालेल्या सुनावणीच्या अनुषंघाने, पर्यावरण संचालक अभय पिंपरकर यांनी बृहद मुंबई महानगर पालिका आणि उपनगर जिल्हा जिल्हाधिका-यांना सीआरझेड उल्लंघनांच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी पत्र लिहिले आणि त्यांनी एका आठवड्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत,” असे कुमार म्हणाले.   

पिंपरकर महाराष्ट्र किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन प्राधिकरणाचे (एमसीझेडएमए) सदस्य सचिव देखील आहेत. याच संस्थेने आक्सा बीचच्या सुशोभिकरणासाठी एमएमबीच्या नियोजनाला सशर्त मंजूरी दिली होती. ही परवानगी देताना सीआरझेड१ क्षेत्रावर कोणतेही बांधकाम होता कामा नये, ही अट देखील ठेवण्यात आली होती. कुमार आणि  पर्यावरणप्रेमी झोरु बथेना यांनी एमएमबीने बीचच्या मधोमध समुद्री भिंत बांधून मंजूरीचे उल्लंघन केल्याचे आरोप केले आहेत. पर्यावरण कार्यकर्त्यांनी आरोप केलेल्या उल्लंघनांच्या संदर्भात  राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (एनजीटी) धाव घेतली आहे.

एमसीझेडएमएने स्वत: नमुद केले आहे की बीचवर कोणतेही ठोस बांधकाम केल्यामुळे आंतरभरती जलप्रवाहावर परिणाम होऊ शकतो, तसेच उताराच्या भागात पूर देखील येऊ शकतो, हे पर्यावरणवाद्यांनी एनजीटीच्या निदर्शनास आणून दिले आहे.या आठवड्याच्या सुरुवातीला एनजीटी पीठाच्या सुनावणीच्या वेळी, पर्यावरण विभागाच्या वकीलांनी पर्यावरण कार्यकर्त्यांच्या निवेदनाच्या प्रतिसादाला सादर करण्यासाठी चार आठवड्यांची मागणी केली आहे.

संपूर्ण देशभरातील किना-यांवरच्या समुद्र भिंतींच्या विरुध्द ११ एप्रिल, २०२२च्या एनजीटीच्या आदेशांचे देखील आक्सा बीचच्या बांधकामाने उल्लंघन केले आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या किनारपट्टी व्यवस्थापन आराखड्यांची तयारी आणि अद्ययतन बाकी असल्याचे देखील पर्यावरणवाद्यांनी सांगितले आहे. या संदर्भातील दुस-या खटल्यामध्ये, सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे वर्सोवा बीचवरील बांधकामावर स्थगितीचे आदेश दिले होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई