शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

आक्सा बीचवरील समुद्री भिंत: मुंबई महापालिकेला सीआरझेड उल्लंघनांमध्ये चौकशी करण्याचे निर्देश

By नारायण जाधव | Updated: September 11, 2023 15:28 IST

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाला पुढच्या कारवाईसाठी पर्यावरण विभागाकडे (मुख्यत्वे प्रमुख सचिव, पर्यावरण आणि हवामान बदल) सोपवले आहे.

नवी मुंबई: आक्सा मुंबई समुद्री भिंत प्रकरणात आणखीन एक नवीन वळण आले आहे. राज्य पर्यावरण संचालकांनी बृहद मुंबई महानगर पालिकेला आणि उपनगर जिल्हा जिल्हाधिका-यांना समुद्री भिंतीच्या बांधकामामुळे सीआरझेड उल्लंघन होत असल्याच्या पर्यावरणवाद्यांच्या समुहाच्या तक्रारींची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.  महाराष्ट्र समुद्री बोर्डाने (एमएमबी) मढ, मुंबई येथील आक्सा बीचवरील “महाकाय समुद्री भिंती”च्या बांधकामात पर्यावरण नियमांचा भंग करण्याबद्दल नॅटकनेक्ट फाउंडेशनने मुख्यमंत्र्यांना तक्रार केल्यानंतर या कार्याला गती मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाला पुढच्या कारवाईसाठी पर्यावरण विभागाकडे (मुख्यत्वे प्रमुख सचिव, पर्यावरण आणि हवामान बदल) सोपवले आहे.

नॅटकनेक्टचे संचालक बी एन कुमार यांनी माहिती मिळवण्याच्या अधिकाराच्या (आरटीआय) अंतर्गत निवेदन सादर केले आहे, तसेच त्यांनी आपल्या पहिल्या निवेदनाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या ईमेलवर केलेल्या कारवाईची माहिती मिळवण्यासाठी पाठपुरावा देखील केला आहे. “मागच्या बुधवारी झालेल्या सुनावणीच्या अनुषंघाने, पर्यावरण संचालक अभय पिंपरकर यांनी बृहद मुंबई महानगर पालिका आणि उपनगर जिल्हा जिल्हाधिका-यांना सीआरझेड उल्लंघनांच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी पत्र लिहिले आणि त्यांनी एका आठवड्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत,” असे कुमार म्हणाले.   

पिंपरकर महाराष्ट्र किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन प्राधिकरणाचे (एमसीझेडएमए) सदस्य सचिव देखील आहेत. याच संस्थेने आक्सा बीचच्या सुशोभिकरणासाठी एमएमबीच्या नियोजनाला सशर्त मंजूरी दिली होती. ही परवानगी देताना सीआरझेड१ क्षेत्रावर कोणतेही बांधकाम होता कामा नये, ही अट देखील ठेवण्यात आली होती. कुमार आणि  पर्यावरणप्रेमी झोरु बथेना यांनी एमएमबीने बीचच्या मधोमध समुद्री भिंत बांधून मंजूरीचे उल्लंघन केल्याचे आरोप केले आहेत. पर्यावरण कार्यकर्त्यांनी आरोप केलेल्या उल्लंघनांच्या संदर्भात  राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (एनजीटी) धाव घेतली आहे.

एमसीझेडएमएने स्वत: नमुद केले आहे की बीचवर कोणतेही ठोस बांधकाम केल्यामुळे आंतरभरती जलप्रवाहावर परिणाम होऊ शकतो, तसेच उताराच्या भागात पूर देखील येऊ शकतो, हे पर्यावरणवाद्यांनी एनजीटीच्या निदर्शनास आणून दिले आहे.या आठवड्याच्या सुरुवातीला एनजीटी पीठाच्या सुनावणीच्या वेळी, पर्यावरण विभागाच्या वकीलांनी पर्यावरण कार्यकर्त्यांच्या निवेदनाच्या प्रतिसादाला सादर करण्यासाठी चार आठवड्यांची मागणी केली आहे.

संपूर्ण देशभरातील किना-यांवरच्या समुद्र भिंतींच्या विरुध्द ११ एप्रिल, २०२२च्या एनजीटीच्या आदेशांचे देखील आक्सा बीचच्या बांधकामाने उल्लंघन केले आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या किनारपट्टी व्यवस्थापन आराखड्यांची तयारी आणि अद्ययतन बाकी असल्याचे देखील पर्यावरणवाद्यांनी सांगितले आहे. या संदर्भातील दुस-या खटल्यामध्ये, सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे वर्सोवा बीचवरील बांधकामावर स्थगितीचे आदेश दिले होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई