शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
2
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
3
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
4
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
5
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
6
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
7
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
8
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
9
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
10
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
11
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
12
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
13
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
14
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
15
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
16
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
17
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
18
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
19
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
20
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 

नवरात्रोत्सव मंडळांच्या खिशाला कात्री

By admin | Updated: October 12, 2015 04:56 IST

नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी मैदानाचे भाडे भरताना आयोजक मंडळांच्या खिशाला कात्री लागणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा भाडेदरात चौपट वाढ झाली आहे

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईनवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी मैदानाचे भाडे भरताना आयोजक मंडळांच्या खिशाला कात्री लागणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा भाडेदरात चौपट वाढ झाली आहे. याबाबत आयोजकांकडून प्रशासनाप्रती नाराजी व्यक्त होत आहे.दोन दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. उत्साहात साजरा होणाऱ्या या उत्सवाची तरुण-तरुणींसह प्रौढांनाही उत्सुकता लागली आहे. मात्र उत्सवाची तयारी करीत असतानाच मंडळांना मात्र आर्थिक प्रश्न पडला आहे. यंदा प्रथमच मोकळ्या मैदानांच्या भाड्याच्या रकमेत दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवासाठी मैदान मिळवण्याकरिता मंडळांना १२ ते ३२ हजार रुपयांपर्यंतचे भाडे भरावे लागणार आहे. त्यामुळे मंडळांच्या खिशाला कात्री बसणार आहे. परिणामी वर्गणीच्या स्वरूपात परिसरातील व्यावसायिकांना मंडळांचा त्रास होण्याचीदेखील शक्यता नाकारता येत नाही. न्यायालयाच्या निर्देशानुसार यंदा प्रथमच रस्त्यावर उत्सव साजरा करण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे आयोजक मंडळांनी लगतच्या मैदानात धाव घेतली आहे. सध्या त्यांच्यापुढे उत्सवासाठी मैदान हाच एकमेव पर्याय आहे. याचाच फायदा संबंधित प्रशासनाकडून घेतला जात आहे. मैदाने भाड्याने मिळवण्यासाठी सिडको व पालिका प्रशासनाकडे अनेक मंडळांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानुसार मैदाणाचे भाडे दरपत्रक सदर मंडळांना देण्यात आले आहे. त्यामधील रकमेचा आकडा पाहूनच आयोजकांना घाम फुटला आहे. भाड्याच्या स्वरूपात १२ ते ३२ हजार रुपये भरल्यानंतरच मंडळांना मैदानावर ताबा मिळणार आहे. यामुळे मंडळाच्या खिशाला कात्री लागणार आहे. गतवर्षी ३०० ते ५ हजार रुपये भाडे भरून नवरात्रोत्सव साजरा केलेल्या मंडळांना हा आर्थिक फटका आहे.रस्त्यावर नवरात्रोत्सव साजरा करताना मंडळांना परवानगीसाठी सुमारे ३०० ते ५०० रुपये खर्च यायचा. तर पालिकेच्या अथवा सिडकोच्या मैदानावर २ ते ५ हजार रुपये भाडे आकारले जात होते. त्यामुळे अनेक मंडळे रस्त्यावरच नवरात्रोत्सव साजरा करायची. यंदा रस्त्यावर उत्सवाला पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे मंडळांपुढे मैदानांचा एकमेव पर्याय आहे. अशातच मैदानाच्या भाड्यात चौपट वाढ करून प्रशासनाने मंडळांची गळचेपी केल्याचा आरोप आयोजकांनी केला आहे. एकीकडे पोलीस उत्सवांसाठी मैदानांचा पर्याय सुचवत असताना, प्रशासन मैदानासाठी भरमसाठ भाडे आकारत आहे. त्यामुळे मंडळांनी उत्सव करायचे की नाही, हे देखील प्रशासनाने स्पष्ट करावे असेही त्यांचे म्हणणे आहे. तर सर्व परवानग्या घेऊन उत्सव साजरा करणाऱ्यांनाच हा भुर्दंड असून, विनापरवाना कार्यक्रम करणाऱ्या मंडळांकडे मात्र प्रशासनाची डोळेझाक होत असल्याचाही संताप व्यक्त होत आहे.