शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

सायन्स विद्यार्थी, पालकांसाठी बुधवारी सेमिनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 01:39 IST

वाढत्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट करिअर करण्याची युवकांची इच्छाशक्ती असते. तिला योग्य जोड मिळाली तर यश आपल्याच मुठीत असते.

नवी मुंबई : वाढत्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट करिअर करण्याची युवकांची इच्छाशक्ती असते. तिला योग्य जोड मिळाली तर यश आपल्याच मुठीत असते. या अनुषंगाने ११ वी, १२ वीच्या सायन्स विद्यार्थी व पालकांना करिअर संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे मनोबल व धैर्य उंचाविण्यासाठी चेन्नईतील ‘एसआरएम युनिव्हर्सिटी’ आणि ‘लोकमत’ प्रस्तुत ‘यशाचे मंत्र’ या सेमिनारचे आयोजन बुधवारी (दि. २४) केले आहे. जीवन विद्या मिशन हॉल, प्लॉट नं. २४ सेक्टर ६, कामोठे नवी मुंबई दुपारी ३:३० वा. हा सेमिनार होणार आहे.आज केवळ वैद्यकीय अधिकारी, अभियंता एवढ्यापुरतेच करिअर मर्यादित राहिलेले नाही. करिअरच्या अनेक नव्या वाटा, संधी विद्यार्थ्यांना खुणावीत आहेत. विद्यार्थ्यांना यशस्वी करिअर आणि जीवन घडविण्याचा मंत्र या सेमिनारमध्ये मिळणार आहे. यामध्ये सुप्रसिद्घ लेखक सुदीप नगरकर आपल्या आवडीनुसार क्षेत्राची निवड कशी करावी या बद्दल मार्गदर्शन करणार आहेत. आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.तसेच एसआरएम युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आणि आॅॅटोमोबाईल इंजिनिअरिग्ांचे हेड डॉ. एम. लिनस मार्टिन व डॉ. निमय मिश्रा सहप्राध्यापक केमिस्ट्री हे मार्गदर्शन करणार आहेत.या सेमिनारमध्ये उज्ज्वल भवितव्याची उत्तरे मिळणार आहेत. या सेमिनारच्या अगोदर विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा झाल्यानंतर सेमिनार होईल. त्यानंतर या चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यश मिळविलेल्यांना बक्षिसे देण्यात येणार आहे.तरी ‘यशाचे मंत्र ’या सेमिनारचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी ७७३८८७७२२४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.११ वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ५० बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा होणार असून, यासाठी एक तासाचा वेळ देण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर बुद्धिमता चाचणी, सामान्यज्ञान (जनरल नॉलेज) ही चाचणी परीक्षा दुपारी ३:३० ते ४:३० या वेळेत घेण्यात येणार आहे. प्रथम पारितोषिक एक टॅब, द्वितीय व तृतीय पारितोषिक मोबाईल आणि उत्तेजनार्थ दोन पेन ड्राईव्ह अशी भरघोस बक्षिसे मिळणार आहेत.करिअर घडविणारा उपयुक्त सेमिनार : ११ वी, १२ वीत शिक्षण घेणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांना ‘पुढे काय ?’ हा पडलेला प्रश्न सतावत असतो. त्यांच्याकडे आत्मविश्वास नसतो. अशावेळी आवश्यकता असते प्रोत्साहनाची व सुयोग्य मार्गदर्शनाची. त्यासाठी ‘एसआरएम युनिव्हर्सिटी’चा हा सेमिनार उपयुक्त ठरणार आहे.