शहरं
Join us  
Trending Stories
1
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
2
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
3
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
4
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
5
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
6
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
7
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
8
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
9
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
10
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
11
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
12
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
13
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
14
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
15
पाक हेर ज्योती व ओडिशाच्या यूट्यूबरच्या संबंधाची चौकशी
16
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
17
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
18
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
19
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
20
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...

महासभेत स्कूल व्हिजनचे वाभाडे, शाळांमध्ये शिक्षकांसह सुविधांची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 01:08 IST

प्रशासन मनपा शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहे. शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नाहीत. अनेक शाळांमध्ये प्राथमिक सुविधा उपलब्ध नाहीत. खासगी शाळा चालाव्या यासाठी जाणीवपूर्वक मनपा शाळांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा घणाघाती आरोप नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केला आहे.

नवी मुंबई : प्रशासन मनपा शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहे. शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नाहीत. अनेक शाळांमध्ये प्राथमिक सुविधा उपलब्ध नाहीत. खासगी शाळा चालाव्या यासाठी जाणीवपूर्वक मनपा शाळांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा घणाघाती आरोप नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केला आहे.महापालिका शाळांमधील गैरसोयींविषयी राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक सूरज पाटील यांनी लक्षवेधी मांडली होती. पालिकेने ऐरोली व नेरूळमध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. या शाळांना चांगला प्रतिसाद लाभला, परंतु प्रशासन पुरेसे शिक्षक उपलब्ध करून देत नाही. वारंवार मागणी करूनही विद्यार्थी हिताचे निर्णय घेण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. खासगी शिक्षण संस्था चांगल्या चालाव्या यासाठीच पालिका शाळांकडे दुर्लक्ष केले जात असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका असा इशारा सूरज पाटील यांनी यावेळी दिला. क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती विशाल डोळस यांनीही प्रशासनावर टीका केली. सीवूडमध्ये सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. इमारत बांधून तयार आहे, पण अद्याप शाळा सुरू झालेली नाही. प्रशासन शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. सीबीडी परिसरामध्ये माध्यमिकचे वर्ग सुरू करण्याची मागणी करूनही शिक्षणाधिकारी लक्ष देत नाहीत. शाळेला भेट देण्यासाठी येत नसल्याची टीका सुरेखा नरबागे यांनी केली. कोपरखैरणेमधील नगरसेविका मेघाली राऊत यांनीही प्रशासनाच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली. तीन वर्षे सातत्याने मनपा शाळांमध्ये चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी पाठपुरावा करत आहे. पण आम्ही केलेल्या पाठपुराव्याकडे लक्ष दिले जात नाही. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण व चांगल्या सुविधा देता येत नसल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखविली.माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनी गरीब घरातील मुलांना चांगल्या सुविधा देता येत नाहीत ही शोकांतिका आहे. लाभाचे पैसे थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. परंतु पालिकेमधील भ्रष्ट यंत्रणेमध्ये नगरसेवकांना काम करणे अवघड जाते. पालक एका विद्यार्थ्याच्या गणवेशाचे पैसे मिळविण्यासाठी किती पाठपुरावा करेल असा प्रश्न उपस्थित केला. शिक्षणासाठी अर्थसंकल्पात असलेली रक्कम खर्च करता येत नाही. अशीच स्थिती राहिली तरी विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला. माजी उपमहापौर अविनाश लाड यांनीही शिक्षण मंडळाच्या कारभारावर टीका केली. शाळांमध्ये शिक्षक नाहीत, गणवेश नाही, बेंच नाहीत, मुलांना अत्यावश्यक सुविधा नाहीत. स्कूल व्हिजनचे भजन झाले असून गरिबांच्या मुलांची थट्टा सुरू असल्याचा आरोप केला. शिक्षणाविषयी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी या वेळी केली.ठोक मानधनावरील शिक्षकांना कमी वेतनावर राबवून घेतले जात आहे. त्यांना वेतनवाढ देण्यात यावी.- ज्ञानेश्वर सुतार,नगरसेवक प्रभाग ८९स्कूल व्हिजनचे भजन झाले आहे. गरिबांच्या मुलांना वेठीस धरले जात आहे.- अविनाश लाड, माजी उपमहापौरशिक्षणासाठी अर्थसंकल्पात तरतूद असतानाही दुर्दैवाने खर्च केला जात नाही. विद्यार्थ्यांच्या हितासाठी वेळ पडल्यास आंदोलन केले जाईल.- सुधाकर सोनावणे, माजी महापौरशिक्षकांना कमी वेतन दिले जात आहे. शिक्षणाविषयी अपयशाचे खापर दुसºयावर फोडण्याचे प्रकार सुरू आहेत.- किशोर पाटकर, नगरसेवक, शिवसेनामुलांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. गरीब मुलांना चांगल्या सुविधा दिल्या जात नसतील तर त्याला सत्ताधारी जबाबदार आहेत.- द्वारकानाथ भोईर,गटनेते शिवसेनामनपा शाळांची स्थिती बिकट आहे. अनेक वर्गामध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुले बसविली जात आहेत.- घनश्याम मढवी,नगरसेवक राष्ट्रवादीघणसोलीमध्ये शाळेची नवीन इमारत बांधली आहे पण विद्यार्थ्यांना बेंच व इतर वस्तू जुन्याच असून चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत.- कमलताई पाटील,नगरसेविका प्रभाग ३४प्रशासनाने विद्यार्थ्यांची अडवणूक थांबविली पाहिजे. शिक्षण विभागाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.- संजू वाडे, नगरसेवक प्रभाग १२शिक्षण विभागातील ज्या त्रुटी सदस्यांनी निदर्शनास आणून दिल्या आहेत त्यांचा विचार करून योग्य उपाययोजना करण्यात याव्यात.- जयवंत सुतार, महापौरशिक्षण विभागाच्या कामकाजावर यापूर्वीच लक्षवेधी मांडली होती परंतु दुर्दैवाने ती पटलावर घेतली नव्हती. आतातरी सदस्यांनी सुचविलेले बदल करण्यात यावेत.- मंदाकिनी म्हात्रे, उपमहापौरविद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे. यासाठी वेळ पडली तर सर्वपक्षीय नगरसेवक मुख्यमंत्र्यांनाही भेटू.- विजय चौगुले, विरोधी पक्षनेतेशिक्षण विभागाची वाताहत होत असताना स्वत:ला शिल्पकार म्हणविणारे नेते काय करत होते. सत्ताधारी विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्यात अपयशी ठरले आहेत.- रामचंद्र घरत, गटनेते, भाजपाखासगी शिक्षण संस्था चांगल्या चालाव्या यासाठी प्रशासनाकडून मनपा शाळांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा संशय येत आहे.- सूरज पाटील, नगरसेवक राष्ट्रवादीशिक्षण विभागातील अनागोंदी हे सत्ताधाºयांचे अपयश असून सद्यस्थितीमध्ये संगीत शिक्षक, संगणक शिक्षक नाहीत. अभ्यासक्रम शिकविण्यासाठीही शिक्षकांची कमतरता आहे.- सोमनाथ वास्कर,नगरसेवक प्रभाग ७४

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई