शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
4
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
5
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
6
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
7
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
8
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
9
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
10
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
11
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
12
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
13
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
14
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
15
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
16
Gas Cylinder booking WhatsApp: व्हॉट्सअपवरून एलपीजी सिलेंडर बुक कसा करायचा, समजून घ्या प्रक्रिया
17
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...
18
एकाच कुटुंबातील १० जणांची आत्महत्या! २१ दिवसांपूर्वी काका, ४ महिन्यांपूर्वी बहिणी अन् आता...
19
"देवा! कसली परीक्षा घेतोयस...", एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू, काळजात चर्र करणारी घटना
20
पतीला आधी पेटवून दिलं, मग गाडीनं उडवलं, बरगड्याही मोडल्या! पत्नी इतकी क्रूर का झाली?

पनवेलमध्ये केशरी रेशनकार्डचा तुटवडा

By admin | Updated: January 30, 2017 02:15 IST

पनवेल तालुका पुरवठा विभागाकडे रेशन कार्डचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. मागणीच्या तुलनेत कार्ड उपलब्ध नसल्याचे कारण यंत्रणेकडून दिले जात आहे.

अरूणकुमार मेहत्रे , कळंबोलीपनवेल तालुका पुरवठा विभागाकडे रेशन कार्डचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. मागणीच्या तुलनेत कार्ड उपलब्ध नसल्याचे कारण यंत्रणेकडून दिले जात आहे. असे असले तरी एजंटकडून आलेल्या अर्जाला प्राधान्य दिले जात असल्याच्या अनेक तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. याबाबत उपाययोजना आणि पारदर्शकता कधी येणार, असा प्रश्न परिसरातील नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.पनवेल तालुका विस्ताराने व लोकवस्तीने मोठा असून दिवसेंदिवस लोकसंख्येत वाढच होत आहे. शहरीबहुलबरोबरच ग्रामीण भागही मोठा असून अनेक आदिवासी वाडे- पाडे आणि इतर गावांचा यात सहभाग आहे. उच्चभ्रू, मध्यमवर्गीयांबरोबर अल्प उत्पन्न गटातील लोकसंख्याही परिसरात मोठी आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांकडून पनवेल तहसील कार्यालयात रेशन कार्डकरिता अर्ज केला जातो. याशिवाय मूळ गावातून कार्ड रद्द करून येथे शिधापत्रिका मिळावी, यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. रहिवासी दाखल्यासाठीही अनेकदा रेशन कार्ड आवश्यक असते. पनवेल विभागात महिन्याला जवळपास ४०० अर्ज केशरी शिधापत्रिकेसाठी येतात. परंतु वारंवार हेलपाटे घालूनही त्यांना हे कार्ड उपलब्ध होत नाही. कार्ड संपले आहेत, चार दिवसांनी चक्कर मारा, असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असल्याचे अर्जदारांचे म्हणणे आहे. परंतु महिनाभर फेऱ्या मारूनही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. शेवटी कंटाळून काही जण एजंटकडून कार्ड बनवून घेत आहेत. शिधावाटप केंद्रात अडवणूक होत असल्याने नाइलाजास्तव दलालांकडे जावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एजंट आणि शिधावाटप विभागातील लिपिकाचे साटेलोटे असल्याने एजंटव्यतिरिक्त येणाऱ्या अर्जदारांना थाराच दिला जात नसल्याचे समोर येत आहे. पुरवठा अधिकारी आणि सह्या करण्याचे अधिकार असलेल्या अव्वल कारकून यांना अंधारात ठेवून सगळा गोलमाल केला जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे सर्वसामान्यांना केशरी कार्ड काय तर व्यवस्थित उत्तरे सुध्दा मिळत नाही. यासंदर्भात कारकून भरत गुंड यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता शासनाकडूनच शिधावाटप कार्ड येत नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत जिल्हाधिकारी तसेच शासनाला कळविण्यात आल्याचे ते म्हणाले. मग प्रजासत्ताक दिनाच्या आधी काही जणांना कार्ड कसे दिले गेले, असा सवाल केला असता आमच्याकडे काही कार्ड ठेवले आहेत. ते अर्जंट असणाऱ्यांनाच दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. एक महिना अगोदर आम्ही हा विषय हाताळला आहे. सर्वसामान्यांना रेशन कार्ड मिळविण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. मात्र दलालांमार्फत त्वरित मिळते ही खंत असल्याचे मनसेचे कामोठे शाखा अध्यक्ष अंकुश मोहिते यांनी व्यक्त केली. जलद प्रशासकीय प्रणालीच्या गप्पा एकीकडे मारल्या असताना अशा प्रकारे महिनोन्महिने केशरी कार्ड येत नसल्याबद्दल शिवसेनेचे सचिन गोडसे यांनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात प्रांताधिकारी व तहसीलदारांनी लक्ष घालावे, अशी मागणी गोडसे यांनी केली आहे.