शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
2
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
3
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
4
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
5
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
6
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
7
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
8
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
9
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
10
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
11
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
12
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
14
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
15
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
16
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
17
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
18
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
19
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
20
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'

कायद्यातील पळवाटा शोधून सरकारवर दरोडा

By admin | Updated: December 24, 2016 03:24 IST

ज्याच्या पाऊलखुणा सापडत नाहीत तो काळा पैसा याचा मागोवा घेता येतो. देशाला पोखरणारे व्यवहार रोखीत चालतात. सनदी

पनवेल : ज्याच्या पाऊलखुणा सापडत नाहीत तो काळा पैसा याचा मागोवा घेता येतो. देशाला पोखरणारे व्यवहार रोखीत चालतात. सनदी लेखापाल आपल्या पक्षकारावरील निष्ठेपायी कायद्यातील पळवाटा शोधून सरकारवर दरोडा घालतात, असे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ दीपक करंजीकर यांनी ‘कफ’च्या १७ व्या वर्धापनदिनी बोलताना संगितले.सिटीझन्स युनिटी फोरम (कफ) या संस्थेचा वर्धापन दिन फडके नाट्यगृहात साजरा करण्यात आला. दीपक करंजीकर यांनी बँक खात्यामुळे खातेदाराची ओळख निर्माण होते. त्याच्या आर्थिक व्यवहाराच्या नोंदी तयार होतात, त्याची पत तयार होते व आर्थिक शिस्त निर्माण होते. मात्र भारतातील बहुसंख्य जनता या नोंदीविनाच संपून जातात. यासाठीच जनधन योजनेमार्फत खाती निर्माण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भ्रष्टाचारामुळे पायाभूत सुविधांसाठी पैसा कमी उपलब्ध होतो. काळ्या पैशाचा राक्षस तयार होतो. भारताची समाज व्यवस्था श्रीमंत, मध्यम व गरीब अशी आहे. ७० टक्के जनता गरीब असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या अर्थक्र ांती संस्थेच्या वतीने पंतप्रधानांकडे सादर केलेल्या प्रस्तावाप्रमाणे १००० व ५०० च्या नोटा रद्द करण्यात आल्या असून कर व्यवस्थेच्या बदलावर विचार सुरू आहे.सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मदन मराठे, शैक्षणिक महेंद्र नाईक, क्रीडा क्षेत्र प्रिसिलिया मदन, शासकीय सेवा बबन म्हात्रे, कला क्षेत्र अनुपमा तकामोगे व युसुफ मेहरअली सेंटर यांना दीपक करंजीकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ‘मी अनिकेत सहस्त्रबुध्दे’ या नाटकातील कलाकार व तंत्रज्ञांचा गौरव केला. ‘कफ’चे अध्यक्ष अरु ण भिसे यांनी अहवाल वाचन केले. सूत्रसंचालन मनोहर लिमये व आभार संदीप शिंदे यांनी मानले.