शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

80,000 अमृत सरोवरांना अधिसूचित पाणथळ जागा म्हणून वाचवा, पर्यावरणप्रेमींची पंतप्रधानांना विनंती

By नारायण जाधव | Updated: September 21, 2023 14:32 IST

Navi Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत सरोवर प्रकल्पाचे कौतुक करून नॅशनल वेटलँड्स ॲटलासने सूचित केलेल्या 2 लाखांहून अधिक पाणथळ जागांसह सुमारे 80,000 अमृत सरोवरांना पाणथळ जागा म्हणून अधिसूचित करावे, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.

- नारायण जाधव नवी मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत सरोवर प्रकल्पाचे कौतुक करून नॅशनल वेटलँड्स ॲटलासने सूचित केलेल्या 2 लाखांहून अधिक पाणथळ जागांसह सुमारे 80,000 अमृत सरोवरांना पाणथळ जागा म्हणून अधिसूचित करावे, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे. ॲटलासनने सूचित केलेल्या पाणथळ जागांची यादी करणे आणि त्यानंतर अधिसूचित करण्याबाबत स्पष्टता नसल्याने एवढा संभ्रम निर्माण झाला आहे की, बेशिस्त नागरी विकासामुळे देश मौल्यवान जलस्त्रोत गमावत आहे, याकडे ग्रीन ग्रुप ने लक्ष वेधले आहे.

इस्रोच्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटरने (एस.ए.सी ने) तयार केलेल्या यादी प्रमाणे 7.57 लाख पाणथळ क्षेत्रांपैकी केवळ 1,255 पाणथळ जागा अधिसूचित केल्या आहेत अशी माहिती केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान नियंत्रण मंत्रालय (एम.ओ.इ.एफ.सी.सी) ने प्रायोजित केलेल्या इंडियन वेटलँड्स वेबसाइट वरून स्पष्ट होत आहे. या 7.57 लाख पाणथळ क्षेत्रांपैकी दोन लाखांहून अधिक पाणथळ जागा आहेत ज्या 2.25 हेक्टरपेक्षा मोठ्या आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांचे संरक्षण केले गेले पाहिजे. 

या पाणथळ जागांचे संरक्षण करण्यासाठी अधिसूचित करण्यात फारशी प्रगती झालेली नाही, असे नमूद करून नॅटकनेक्ट फाउंडेशनने पंतप्रधानांना कळवले आहे की, त्यांच्या आवडत्या 80,000 अमृत सरोवरांना पाणथळ जागा म्हणून अधिसूचित न केल्यास ते पुरल्या जाण्याचा आणि नामशेष होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार म्हणाले, “2006-07 च्या वेटलॅंड ॲटलास आणि 2016-17 च्या दशकीय बदल ॲटलास अनुसार पाणथळ जागांची यादी करण्यात आणि अधिसूचित करण्यात मोठ्या प्रमाणात विलंब होत असल्याच्या विशिष्ट मुद्द्याकडे आम्ही आपले लक्ष वेधत आहोत.” पंतप्रधानांच्या वेबसाइट वर सादर केलेल्या नॅटकनेक्टच्या याचिकेची स्थिती अशी दर्शवित आहे की त्यावर प्रक्रिया सुरू आहे आणि एम.ओ.इ.एफ.सी.सी मधील राजशेखर रत्ती (वैज्ञानिक डी) यांच्याकडे संदर्भित केली आहे.

कुमार म्हणाले की, बहुतेक लहान-मोठ्या पाणथळ जागा विकासाच्या नावाखाली गाडल्या जाण्याचा धोका सतत भेडसावत आहे आणि त्यांनी अशी भीती व्यक्त केली आहे की पाणथळ जागा म्हणून अधिसूचित न केल्यास 80,000 अमृत सरोवरांचे सुद्धा मोठ्या शहरांमध्ये पुरल्या गेलेल्या पाणथळ जागांसारखेच हाल होतील.  

कुमार म्हणाले, "सरकारने अलीकडेच पाण्याचे स्त्रोत, पूर आणि वादळ प्रत्यारोधी (बफर्स), पाणी शुद्ध करणारे (वॉटर प्युरिफायर), मनोरंजन आणि पर्यटन स्थळे, निसर्ग-समाज परस्परसंवाद, कार्बन सिंक, स्थलांतरित पक्ष्यांसाठी अधिवास आणि जैवविविधतेचे हॉटस्पॉट्स यावर बहुआयामी अभ्यासासाठी उपयुक्त ठिकाणे म्हणून आपल्या वेबसाइटवर भारतीय पाणथळ जागांचे महत्त्व अधोरेखित केले आहे."

"पाणथळ जागांच्या रचनेतून गोड्या पाण्याचा मुख्य पुरवठा केला जातो. जलपर्णींमध्ये सामावलेल्या भूजलमध्ये उपलब्ध गोड्या पाण्यापैकी 95% हून अधिक पाणी असते आणि पिण्याच्या पाण्याचा आणि हा सिंचनाचा सर्वात महत्त्वाचा स्त्रोत आहे. अनेक पाणथळ जागा पावसाचे पाणी मुरविण्यास आणि भूजल पुनर्भरण करण्यास मदत करतात," असे सरकारी वेबसाइटवर म्हटले गेले आहे.

खारघर येथील सामाजिक कार्यकर्ते नरेशचंद्र सिंह यांनी अमृत सरोवरांना पाणथळ जागांचा दर्जा देऊन त्यांना केंद्र व राज्य पाणथळ प्राधिकरणाच्या अखत्यारीत आणले पाहिजे, असे मान्य केले. ॲटलास ने ओळखलेल्या किंवा अन्यथा पाणथळ जागांचे संरक्षण करण्याबाबत अधिकारी सामान्यत: बेफिकीर राहत असल्याचे नवी मुंबईतील अनेक भागांतील अनुभवावरून दिसून येत आहे, अशी खंत सिंह यांनी व्यक्त केली आहे. श्री एकविरा आई प्रतिष्ठानचे प्रमुख नंदकुमार पवार म्हणाले, “गेल्या चार वर्षांत तथाकथित पायाभूत सुविधांच्या विकासामुळे उरण मधील पाणथळ जागा आपण गमावली असून संबंधित अधिकारी बेजबाबदार राहत आहेत.”

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई