शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

आपत्तीसाठी सॅटेलाइट फोन सुविधा

By admin | Updated: May 24, 2017 01:37 IST

आपत्तीच्या कालावधीमध्ये विनाखंडित जलद संवाद साधून, तातडीने मदतकार्य घटनास्थळी पोहोचवता यावे, यासाठी केंद्र सरकारने देशातील ३६ राज्य आणि ८१ जिल्ह्यांमध्ये नव्याने

आविष्कार देसाई । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : आपत्तीच्या कालावधीमध्ये विनाखंडित जलद संवाद साधून, तातडीने मदतकार्य घटनास्थळी पोहोचवता यावे, यासाठी केंद्र सरकारने देशातील ३६ राज्य आणि ८१ जिल्ह्यांमध्ये नव्याने हायटेक तंत्रज्ञानाने युक्त अशी सॅटेलाइट फोन सुविधा उपलब्ध केली आहे. महाराष्ट्रातील रायगड, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत रायगड जिल्ह्यातील सॅटेलाइट फोन कार्यान्वितही झाले आहेत. या पथदर्शी प्रकल्पासाठी केंद्र सरकारला तब्बल १९ कोटी ५४ लाख रुपयांचा खर्च आला आहे.भारत संचार निगम लिमिटेड आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. आपत्तीच्या कालावधीमध्ये संवाद हे प्रमुख माध्यम आहे. त्यामुळे ते सक्षम असणे गरजेचे आहे; परंतु आपत्तीच्या कालावधीत दूरध्वनी, भ्रमणध्वनी (मोबाइल) ही संवाद साधण्याची महत्त्वाची साधणे कोलमडून पडतात. त्यामुळे संपर्क तुटल्याने घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य करताना असंख्य अडथळ््यांचा सामना आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसह अन्य यंत्रणांना करावा लागतो. योग्य वेळेत मदत न पोहोचल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानीसह वित्तहानी होऊन, देशाचे न भरून येणारे नुकसान होते.यावर उपाय म्हणून देशातील संवाद यंत्रणा मजबूत करण्यासाठी केंद्र सरकराने देशातील ३६ राज्य आणि ८१ जिल्ह्यांमध्ये सॅटेलाइट फोनची सुविधा उपलब्ध केली आहे. महाराष्ट्रातील रायगड, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांचा त्यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील सॅटेलाइट फोन यंत्रणा कार्यान्वितही झाली आहे. पुणे आणि रत्नागिरी या जिल्ह्यात अद्यापही ती प्रगतिपथावर आहे. यंत्रणा कार्यान्वित करून, रायगड जिल्ह्याने मात्र बाजी मारली आहे. या पथदर्शी प्रकल्पासाठी तब्बल १९ कोटी ५४ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.रायगड जिल्ह्यासाठी सॅटेलाइट क्रमांक 81272, 81273इंटरनेट सुविधा बंद पडल्यावर सॅटेलाइट फोनच्या माध्यमातून इंटरनेट सेवा विनाखंडित वापरणे सोपे होणार आहे. त्या माध्यमातून १६ संगणक जोडून सॅटेलाइट इंटरनेटचा वापरही करता येणार आहे. त्यामुळे माहितीची देवाण-घेवाण कोणत्याही अडथळ््याशिवाय होणार आहे.दिल्ली गृहमंत्रालय, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (दिल्ली) राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (दिल्ली) आपत्तीचा सामना करण्यास मदत १सध्या गृहमंत्रालय- दिल्ली, मंत्रालय- मुंबई आणि रायगड असे संभाषण होऊ शकते. सॅटेलाइट फोनवरून नागरिकांकडे असणाऱ्या मोबाइल, दूरध्वनीवर कॉल करता येणार आहे; परंतु नागरिकांना उलटा कॉल करता येणार नाही. २काही दिवसांनी तीही सुविधा उपलब्ध होणार असल्याचे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. २००५नंतर सॅटेलाइट फोन सुविधा बंद पडली होती. ३आता नव्या हायटेक तंत्रज्ञानाने ती पुन्हा सुरू करण्यात आल्याने आपत्तीचा सामना करण्यास मदत मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.