शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

एसटी प्रवाशांची तीच तीच कारणे ; लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडण्यासाठी सुरू असतो आटापिटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 23:16 IST

लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडण्यासाठी सुरू असतो आटापिटा

अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : कोरोना संसर्गात वाढ झाल्याने राज्यभरात संचारबंदीचे निर्बंध लावले आहेत. त्यानुसार बाह्य जिल्ह्यात प्रवास सर्वांसाठी नाकारत अत्यावश्यक सेवेसाठी एसटी बस सेवा सुरू ठेवण्यात आली आहेत. असे असतानाही पनवेल आगारात अनेक प्रवासी रुग्णालयात जायचे आहे. नातलगाच्या अंत्यसंस्काराला जायचे आहे. यासाठी वाहक बरोबर वादावादी केली जात आहे. अशी अनेक कारणे देत बसेसमधून प्रवास करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे बस वाहकाची डोकेदुखी वाढली आहे.

राज्य शासनाकडून वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेता ३० एप्रिलपर्यंत संचारबंदीसह लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर हा लॉकडाऊन पुढे १५ तारखेपर्यंत वाढविण्यात आला आहे. या कालावधीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी एसटी बसने प्रवास करण्यास महामंडळाची सेवा बंद करण्यात आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना प्रवासास मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार पनवेल बसस्थानक येथून उरण, दादर, ठाणे, अलिबाग, कर्जत, कल्याण या शहरात अत्यावश्यक सेवा देण्यात येत आहे.

बसमधून २१ प्रवासी सोशल डिस्टन्सिंगनुसार प्रवास केला जातो आहे. इतर आगारातून पनवेल बसस्थानकात आलेल्या बसमधून अत्यावश्यक सेवेतील नागरिक प्रवास करत आहेत. इतर प्रवासीदेखील अत्यावश्यक सेवेचे कारण सांगत प्रवासासाठी येत आहेत. अंत्यसंस्काराला जायचे आहे, असे कारण सांगत बसमध्ये प्रवेश करतात. नागरिकांनी बाहेर पडू नये यासाठी शासनाकडून वारंवार सांगितले जात आहे. तरीदेखील काही जण याकडे दुर्लक्ष करत आहेत.

दादर मार्गावर अधिक गर्दीपनवेल बसस्थानकातून दादरला जाण्यासाठी गर्दी आहे. रुग्णालय कर्मचारी, पोलीस, पालिका कर्मचारी असे अनेक जण बसचा आधार घेत आहेत. त्यापाठोपाठ ठाणे येथे जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. दुपारी प्रवासी संख्या कमी असते. तर सकाळ-संध्याकाळ प्रवास करण्याची संख्या लक्षणीय आहे.

 पनवेल येथून दादर, ठाणे, कल्याण, अलिबाग येथे अत्यावश्यक सेवा देण्यात येत आहे.  ओळखपत्र तपासून त्यांना बसमध्ये प्रवेश दिला जात आहे. सर्वसामान्य नागरिक सहसा प्रवास करत नाहीत. आले तर वाद होतात; परंतु त्यांना समजावून सांगितले जात आहे.            - विलास गावडे, पनवेल आगार प्रमुख

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई